शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
5
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
6
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
7
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
8
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
9
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
10
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
11
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
12
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
13
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
14
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
15
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
16
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
17
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
18
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
19
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
20
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
Daily Top 2Weekly Top 5

भारताला 'प्रेमपत्र' लिहिणे सुरुच ठेवणार, 'टू इंडिया' वादावर वीर दासचे स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2021 12:03 IST

वॉशिंग्टनमधील केनेडी सेंटरमध्ये सादर केलेल्या कवितेवरुन वीर दासवर टीकेची झोड उठत आहे.

नवी दिल्ली: वॉशिंग्टनमधील केनेडी सेंटरमध्ये नुकत्याच झालेल्या 'टू इंडिया' या कवितेवरुन तीव्र टीकेचा सामना करणारा स्टँड-अप कॉमेडियन वीर दासने स्पष्टीकरण दिलं आहे. 'विनोद करणे हे माझे काम आहे आणि जोपर्यंत विनोद करण्यास सक्षम असेल, तोपर्यंत भारताला 'प्रेमपत्र' लिहीत राहीन', असे मत वीर दासने व्यक्त केले आहे. 

वीर दासने मागच्या आठवड्यात यूट्यूबवर एक व्हिडिओ पोस्ट केला. त्यात त्याने भारताच्या दोन बाजू मांडल्या. त्याचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी त्याच्यावर भारताचा अपमान केल्याचा ठपका ठेवला आणि त्याच्या या कवितेचा जोरदार विरोध केला. या वादानंतर पहिल्यांदाच वीर दासने समोर येऊन आपले मत मांडले. एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला, 'मी माझे काम करण्यासाठी येथे आलो आहे आणि पुढेही काम सुरुट ठेवेल. माझे काम लोकांना हसवणे आहे आणि जर तुम्हाला ते विनोदी वाटत नसेल तर हसू नका. ती कविता म्हणजे व्यंग होते आणि माझा विश्वास आहे की, सेंस ऑफ ह्यूमर असलेल्या कोणत्याही भारतीयाला या कवितेमागची विनोदाची भावना समजेल.'

तो पुढे म्हणतो की, 'मला वाटत की, विनोद एखाद्या सणासारखा असतो. जेव्हा एका खोलीत बसलेले शेकडो लोक हसतात आणि टाळ्यांचा आवाज येतो तेव्हा तो गर्वाचा क्षण असतो. मला वाटतं की, ज्याला विनोद कळतो आणि ज्याने माझा तो संपूर्ण व्हिडिओ पाहिला आहे, त्याला त्यामागची भावना समजेल. एक कलाकार म्हणून मला अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया मिळतात, लाखो लोकांनी माझे कौतुक केले आहे. मी टीकेकडे गांभीर्याने पाहत नाही, माझ्यासाठी कौतुक महत्वाचं आहे.'

व्हिडिओमध्ये काय आहे ?अमेरिकेतील केनेडी सेंटरमध्ये अभिनेता-कॉमेडियन वीर दासने एक कविता सादर केली होती. त्यात त्याने भारताच्या दोन बाजू दाखवल्या. यामध्ये दिल्लीतील सामूहिक बलात्कारापासून शेतकऱ्यांचे आंदोलन आणि प्रदूषणासारख्या महत्वाच्या मुद्द्यांवर भर दिला आहे. यात काही वादग्रस्त विषयांचाही उल्लेख आहे. त्याच्या या व्हिडिओनंतर काहीजण त्याच्यावर टीका करत आहेत, तर काहीजण त्याचे कौतुक करत आहेत.  

टॅग्स :IndiaभारतAmericaअमेरिका