शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

'जीवनाचे सत्य जाणून घेण्यासाठी घर सोडले', संन्यासी बनलेल्या IIT इंजीनिअरची कहाणी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2025 16:53 IST

Abhay Singh Viral Baba Maha Kumbh  2025 : प्रयागराज येथील कुंभमेळ्यात आलेल्या अभय सिंह यांची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.

Abhay Singh Viral Baba Maha Kumbh  2025 : कधी समाजाने वेड्यात काढले, तर कधी घरच्यांनीही वेडा ठरवले. ही गोष्ट आहे IIT मुंबईमधून एअरनॉटिकल इंजीनिअरींग करणाऱ्या अभय सिंह यांची. मूळ हरियाणाच्या हिस्सारचा रहिवासी असलेले अभय सिंह सध्या कुंभमेळ्यात बाबा झालेत. अभयला जीवनाचे सत्य जाणून घेण्याची उत्कट इच्छा होती, म्हणूनच त्यांनी भक्तीच्या मार्गावर जाण्याचा निर्णय घेतला.

काशीतील जुना आखाड्याच्या संतांनी अभयला कुंभमेळ्यात आणले. एका हिंदी वृत्तवाहिनीने सर्वात आधी अभयची मुलाखत घेतली, त्यानंतर सोशल मीडियावर त्यांची जोरदार चर्चा सुरू आहे. IIT सारख्या संस्थेत अनेकांना अॅडमिशन मिळत नाही. अशा संस्थेतून शिक्षण घेतलेल्या अभयने हा मार्ग निवडल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. आयुष्यात अनेक गोष्टी केल्या, पण सत्याचा शोध लागला नाही. याच सत्याच्या शोधात भक्तीमार्ग निवडल्याचे अभय सांगतात. 

'मी सधू-संत नाही...'आयुष्यात पैसा अन् भौतिक सुखाच्या मागे धावणाऱ्यांसाठी अभय सिंहची कहानी प्रेरणादायी ठरू शकेल. हिंदी वृत्तवाहिनीशो बोलताना अभय सांगतात की, ते कुंभमेळ्यात फक्त शिकण्यासाठी आणि नवीन अनुभव घेण्यासाठी आले आहेत. ते कुठल्याही पंथाशी, आखाड्याशी संबंधित नाहीत. त्यांनी कोणत्याही महाराजांकडून दीक्षाही घेतलेली नाही. मी साधू-संत नाही, मला फक्त आयुष्याचे सत्य जाणून घ्यायचे आहे, म्हणून इथे आलोय, असं अभय सांगतात. 

कधीकाळी डिप्रेशनमध्ये गेलेअभयने सांगितले की, आयआयटी मुंबईमध्ये गेल्यानंतर त्याला आपल्या आयुष्याची काळजी वाटू लागली. कोणत्याही प्रवासाची सुरुवात प्रश्नांनी होते, माझ्याही मनात अनेक प्रश्न होते. आयुष्यात नेमकं काय हवंय, हा प्रश्न मला पडला होता. मला आयुष्यभर करता येईल, मनाला सुख देईल, अशी गोष्ट शोधायची होती. IIT नंतर मी डिप्रेशनमध्ये गेलो होतो. झोप येत नव्हती, रात्रभर मनात प्रश्नांचे वादळ उठायचे...मग मला वाटले की, माझी अशी अवस्था का झालीये? मला झोप येत नाहीये, कुठेच मन लागत नाहीये...त्यानंतर मी मानसशास्त्राचा अभ्यास केला. पुढे इस्कॉनकडे वळलो अन् श्रीकृष्णाबद्दल वाचण सुरू केले.

लोकांनी वेड्यात काढले...हळुहळू मी अध्यात्माकडे वळालो, ध्यान करू लागलो, मला आयुष्याचा अर्थ समजू लागला. तेव्हा अनेकांनी मला वेड्यात काढले. घरच्यांनीही मला वेडा समजले. त्यांचे विचार वेगळे होते, माझे विचार वेगळे होते. मला कुठेच अडकायचे नव्हते, म्हणून मी घर सोडले अन् देशभर प्रवास केला. पायी चारधाम यात्रा केल्या, अनेक पवित्र स्थळांना भेटी दिल्या अन्  शेवटी काशी गाठली. काशीला येऊन बाबा सोमेश्वर पुरींना भेटलो अन् त्यांनीच पुढे आध्यात्माचा मार्ग दाखवला. 

टॅग्स :Kumbh Melaकुंभ मेळाUttar Pradeshउत्तर प्रदेशIIT Mumbaiआयआयटी मुंबई