शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

माझी एकच जात आहे ती म्हणजे 'गरिबी' - नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2019 13:38 IST

मी कधीही गरिबांचे पैसे लुटण्याचं पाप केलं नाही, आमच्यासाठी गरिबांचे रक्षण करणं हेच जीवन आहे. जे दुख गरीब सहन करतात ते दुखं मी स्वत: सहन केलं आहे.

काशी - मी कधीही गरिबांचे पैसे लुटण्याचं पाप केलं नाही, आमच्यासाठी गरिबांचे रक्षण करणं हेच जीवन आहे. जे दुख गरीब सहन करतात ते दुखं मी स्वत: सहन केलं आहे. मी गरिबांचे दुखं दूर करण्यासाठी जगतो. माझी फक्त एक जात आहे गरिबी. त्यामुळे या गरिबीपासून मुक्त होण्याचा संकल्प आपल्याला यशस्वी करेल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.

यावेळी बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले की, पहिल्याचे सरकार 2 जी घोटाळ्यात व्यस्त होती. मात्र आता 4 जी देशातील गरिबांपर्यंत पोहचलं आहे. आज जगात सर्वाधिक इंटरनेटचा वापर भारतात केला जातो. पराभवाच्या भितीपोटी महामिलावटी लोकं मला शिव्या देण्याचं काम करत आहेत. मात्र यांच्या शिव्या माझ्यासाठी आर्शीवाद बनला आहे असं त्यांनी सांगितले. 

मतदान करण्यासाठी घराबाहेर पडा, स्वत: मतदान करा, इतर लोकांना मतदान करण्यासाठी प्रवृत्त करा, पहिल्यांदा मतदान करा आणि जेवण करा. मतदान केल्यानंतर स्वत:चा सेल्फी सोशल मिडीयावर अपलोड करा आणि दुसऱ्या लोकांनाही मतदान करण्यासाठी प्रोत्साहन द्या असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मतदारांना केलं. 

काशीमधील लोकांना मला सांगितलं इथं येऊ नका, आम्ही सांभाळून घेतो. आज प्रत्येक काशीतील रहिवाशी मोदी बनून निवडणूक लढवत आहे. जनसहभागातून काशी विकासाच्या मार्गावर जात आहे. काशीसोबत जोडल्याने मी धन्य झालो. माझं जीवन काशीच्या कामी आलं त्यामुळे मी संतुष्ट झालो आहे असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. 

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराचा अंतिम टप्पा आला आहे. काँग्रेस-भाजपाकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. निवडणुकीत काँग्रेसकडूनही गरिबांना आकर्षित करण्यासाठी न्याय योजना आणली. या योजनेतंर्गत देशातील 20 कोटी गरीब जनतेला वर्षाला 72 हजार रुपये देण्याचं आश्वासन जनतेला देण्यात आलं. मात्र काँग्रेसने इतकी वर्ष गरिबी नव्हे तर गरिबांना हटविण्याचं काम केलं. ज्या लोकांना 70 वर्षांत देशातील जनतेवर अन्याय केला ते लोकांना न्याय काय देणार असा प्रश्न भाजपाने काँग्रेसवर उपस्थित केला होता. त्यामुळे निवडणुकीत गरिबांना केंद्रबिंदू बनवत भाजपा-काँग्रेसच्या राजकारणात देशातील जनता कोणाला साथ देते हे निवडणुकीच्या निकालानंतर कळेल.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकUttar Pradesh Lok Sabha Election 2019उत्तरा प्रदेश लोकसभा निवडणूक 2019Narendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेस