शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

'माझी पेन्शन थांबवली तरी मी पोट भरू शकतो', 'ते' सध्या शेती करतायेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2019 09:58 IST

जस्टी चेमलेश्वर सध्या आंध्र प्रदेशच्या कृष्णा जिल्ह्यातील आपल्या मूळगावी सुख-समाधानाने जगत आहेत.

नवी दिल्ली - देशातील न्यायव्यवस्थेच्या इतिहासात प्रथमच 12 जानेवारी 2017 रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या चार न्यायाधीशांनी पत्रकार परिषद घेतली. त्यानंतर, न्यायव्यवस्थेवर प्रश्न विचारले जाऊ लागले. या चार न्यायाधीशांमध्ये एक होते, न्यायमूर्ती जस्टी चेमलेश्वर. आता, चेमलेश्वर सेवानिवृत्त झाले असून ते आपल्या गावी शेती करत आहेत. तर, भारत सरकार कसं काम करतेय किंवा न्यायव्यवस्था कशी चालतेय? याचा मला काहीही फरक पडत नसल्याचं चेमलेश्वर यांनी म्हटलंय. 

जस्टी चेमलेश्वर सध्या आंध्र प्रदेशच्या कृष्णा जिल्ह्यातील आपल्या मूळगावी सुख-समाधानाने जगत आहेत. येथे ना कोर्टाची कटकट आहे, ना संसदेतला गोंधळ, अस त्यांचं म्हणणं आहे. गेल्यावर्षी 12 जानेवारी रोजी सर्वोच्च न्यायालयातील चार न्यायमूर्तींनी एकत्र येत मुख्य न्यायाधीश दिपक मिश्रा यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. त्यानंतर, न्यायमूर्ती चेमलेश्वर देशभरात चर्चेत आले होते. आता, पुन्हा एकदा चेमलेश्वर चर्चेत आले आहेत. कारण, निवृत्त झाल्यानंतर कुठल्याही सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाला हजर न राहता, चेमलेश्वर यांनी थेट आपले गाव गाठले. आता, आपण वडिलोपार्जित शेती करणार आहे. विशेष म्हणजे आता त्यांनी माझी पेन्शन जरी थांबवली तरी मी शेती करून माझं पोट भरू शकतो, असेही चेमलेश्वर म्हणाले. मात्र, मी ज्या न्यायव्यवस्थेतील कामकामजाविरुद्ध आवाज उठवला, तेथे अद्यापही परिस्थिती जैसे थेच, असल्याचं दु:खही चेमलेश्वर यांनी व्यक्त केल. 

टॅग्स :Andhra Pradeshआंध्र प्रदेशSupreme Courtसर्वोच्च न्यायालयFarmerशेतकरी