शहरं
Join us  
Trending Stories
1
कोट्यवधींची गुंतवणूक, १६ लाखांहून अधिक रोजगारनिर्मिती; मुंबईसाठी CM फडणवीसांचा अजेंडा
2
'या' स्कीममध्ये तुमच्या मुलीसाठी उभा करू शकता ४७ लाख रुपयांचा फंड; सरकार देतेय ८.२% चं व्याज, जाणून घ्या
3
जयपूरमध्ये कारचं मृत्यूतांडव! रेसिंगच्या नादात १६ जणांना चिरडलं; एकाचा जागीच मृत्यू, शहरात खळबळ
4
सुझुकीने अखेर ईलेक्ट्रीक स्कूटर e-Access लाँच केली, ९५ किमी रेंजसाठी किंमत एवढी ठेवली की...
5
"मी गरीब आहे, मला डॉक्टर व्हायचंय..."; मुख्यमंत्र्यांना भेटता न आल्याने विद्यार्थिनीला कोसळलं रडू
6
ट्रम्प टॅरिफबाबत अमेरिकन सर्वोच्च न्यायालयात काय-काय झालं? भारतावर किती परिणाम, जाणून घ्या
7
पाकिस्तानच्या कुरापती सुरूच! सांबाच्या फ्लोरा गावात ड्रोनने पाडलं पॅकेट; बीएसएफने उधळला पाकचा डाव
8
जपानच्या अधिकाऱ्याचा फोन चीनच्या विमानतळावर चोरीला गेला; अणुऊर्जा प्रकल्पांसह अत्यंत गोपनीय माहिती लीक होण्याचा धोका...
9
परभणी-जिंतूर मार्गावर पहाटे भीषण अपघात; कीर्तनाहून परतणाऱ्या तीन वारकऱ्यांचा मृत्यू
10
डोनाल्ड ट्रम्प यांची तेल कंपन्यांसोबत बैठक, अमेरिका भारताला व्हेनेझुएलाचे तेल देण्यास तयार; पण एका अटीवर...
11
ठाकरेंनी एक तरी ठोस विकासकाम दाखवावे; मुख्यमंत्री फडणवीस यांचे युतीच्या प्रचारसभेत आव्हान
12
भयंकर प्रकार! 'द राजा साब'च्या स्क्रीनिंगदरम्यान प्रभासच्या चाहत्यांनी कागदाचे तुकडे जाळले, व्हिडीओ व्हायरल
13
बांगलादेशात नव्या युगाची नांदी! खालिदा जिया यांच्यानंतर आता सुपुत्र तारिक रहमान यांच्याकडे बीएनपीची धुरा
14
आजचे राशीभविष्य १० जानेवारी २०२६ : धनु राशीला पदोन्नतीचे योग, तर तूळ राशीने राहावे सतर्क; वाचा काय सांगते तुमचे नशीब!
15
आमच्या अस्तित्वासाठी नव्हे, राज्यातील भावी पिढीच्या भवितव्यासाठी एकत्र आलो: ठाकरे बंधू
16
वडापाव-दाल पकवानचे महागठबंधन सत्तेवर येणार: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मराठी-सिंधीवर भाष्य
17
कुठे, कोणत्या मुद्द्यांवर निवडणूक? मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, पनवेलमध्ये काय गाजतेय?
18
अजित पवारांची मिळाली साथ; अंबरनाथमध्ये शिंदेसेनेने भाजपचे ‘सत्तास्वप्न’ लावले उधळून
19
अमेरिका : मोदींनी फोन न केल्याने करार रखडला; भारत : मोदी-ट्रम्प यांच्यात ८ वेळा फोनवर संवाद
20
यंदा अर्थसंकल्प रविवारी मांडणार? अधिवेशन सुरू होणार २८ जानेवारीपासून; १३ फेब्रुवारीला संपेल
Daily Top 2Weekly Top 5

"मी सर्वात पहिले पलायन करणाऱ्या बॅचमधील...!"; मैथिली ठाकूरच्या निवडणूक लढण्यासंदर्भात वडिलांची पहिली प्रतिक्रिया, तुम्हीही भावूक व्हाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 17:55 IST

"लालू यादव सत्तेत आल्यानंतर वातावरण खूपच बिघडले. ब्राह्मणांवर हल्ले सुरू झाले आणि लोक त्यांच्या शेत-जमिनींवर कब्जा करू लागले. त्याचबरोबर खोटे गुन्हे दाखल होण्याचे प्रकारही सुरू झाले होते."

देशासह परदेशातही आपल्या गायनामुळे लोकप्रिय झालेली लोकगायिका मैथिली ठाकूर बिहार विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची चर्चा सध्या सुरू झाली आहे. यासंदर्भात आता खुद्द मैथिलीचे वडील रमेश ठाकूर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आरपली मुलगी राजकारणात उतरली, तर आनंदच होईल, असे त्यांनी म्हटले आहे.

जबलपूर येथे मंगळवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना रमेश ठाकूर म्हणाले, "जेव्हा बिहारमधून पलायन सुरू झाले, तेव्हा आम्ही पहिल्या बॅचमधील पलायनकर्ते होतो. तेव्हापासून जे बाहेर पडलो, ते अद्यापही बाहेरच आहेत."

जातीय संघर्षामुळे सोडावा लागला बिहार -या पलायनाचे कारण सांगताना ते म्हणाले, राज्यात अचानकच जातीय उन्माद आणि संघर्ष प्रचंड वाढला होता. मी 1995 मध्ये बिहार सोडला आणि गेल्या 30 वर्षांपासून बाहेरच आहे." त्यांनी तत्कालीन परिस्थितीसाठी बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू यादव यांना जबाबदार धरले. "लालू यादव सत्तेत आल्यानंतर वातावरण खूपच बिघडले. ब्राह्मणांवर हल्ले सुरू झाले आणि लोक त्यांच्या शेत-जमिनींवर कब्जा करू लागले. त्याचबरोबर खोटे गुन्हे दाखल होण्याचे प्रकारही सुरू झाले होते." असेही ते म्हणाले.

यावेळी रमेश ठाकूर यांनी बिहारमधील विद्यमान नेतृत्वाकडून एक महत्त्वाची अपेक्षा व्यक्त केली आहे. ते म्हणाले, "बिहारमधून जे लोक पलायन करून गेले आहेत, त्यांची दखल घेणारे अजून कुणी नाही. त्यावर थोडे काम व्हायला हवे. जेणेकरून राज्याबाहेर गेलेले लोक पुन्हा बिहारमध्ये परत येऊन येथे काम करू शकतील. 1995 मध्ये सुरू झालेले हे पलायन आजही सुरूच आहे," असेही ते म्हणाले. याशिवाय, एनडीए (NDA) सरकार आल्यापासून बिहारमध्ये काहीसा विकास झाला असून, परिस्थिती सुधारली आहे, असे म्हणत त्यांनी एनडीएचे कौतुकही केले.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Maithili Thakur's election: Father's emotional reaction to migration from Bihar.

Web Summary : Folk singer Maithili Thakur's potential Bihar election bid prompts her father's reaction. He recounts their family's migration from Bihar in 1995 due to caste-based violence under Lalu Yadav's rule and expresses hope for the return of migrants with improved conditions under the NDA government.
टॅग्स :BiharबिहारElectionनिवडणूक 2024Madhya Pradeshमध्य प्रदेशNational Democratic Allianceराष्ट्रीय लोकशाही आघाडीLalu Prasad Yadavलालूप्रसाद यादव