शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
2
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
3
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, म्हणाली- "सगळे मला ट्रोल करत सुटलेत..."
4
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
5
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
6
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
7
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण
8
₹450 कोटींचा बंगला अन् ₹639 कोटींचा डुप्लेक्स..; धनकुबेरांना आकर्षित करतेय वरळी 'सी फेस'
9
फक्त १० वर्षांत १ कोटीचा फंड कसा तयार करायचा? SIP मध्ये दरमहा किती गुंतवणूक करावी लागेल?
10
कंडोम बनवणाऱ्या कंपनीची कमाल...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; गेल्या महिन्यातच बाजारात उतरली, दिला बंपर परतावा
11
"मी सर्वात पहिले पलायन करणाऱ्या बॅचमधील...!"; मैथिली ठाकूरच्या निवडणूक लढण्यासंदर्भात वडिलांची पहिली प्रतिक्रिया, तुम्हीही भावूक व्हाल
12
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर; राज्य सरकारने केली मोठी घोषणा
13
माझी पत्नी रात्रीच्या वेळी बनते नागीण आणि..., भयभीत पतीने थेट DM यांनां केली अशी विनंती, प्रकरण काय  
14
"सगळेच लोक अत्यंत...!"; विरोधकांच्या 'मत चोरी'च्या आरोपांवर मैथिली ठाकुरचं मोठं विधान, स्पष्टच बोलली
15
जॉन क्लार्क, मिशेल एच. डेवोरेट आणि जॉन एम. मार्टिनिस यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर
16
न्यायाधीशाची न्यायालयातच गोळ्या घालून हत्या; पिता-पुत्रही जखमी, सुनावणी सुरू असताना घडली घटना
17
Chaitanyananda Saraswati : स्वयंघोषित बाबाचं 'फाईव्ह स्टार' सीक्रेट; डीनने मुलींना दिली हॉटेलमध्ये रात्र घालवण्याची धमकी
18
VIDEO: वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात राडा! खूपच संतापला, भरमैदानात पंचांशी वाद घातला...
19
लोनवर Hero Splendor खरेदी करण्यासाठी किती डाउन पेमेंट करावं लागेल? किती लागेल मंथली EMI, जाणून घ्या
20
"सरकारने आज घोषित केलेली मदत म्हणजे शेतकऱ्यांची थट्टा, शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी देणार?’’, काँग्रेसचा सवाल   

"मी सर्वात पहिले पलायन करणाऱ्या बॅचमधील...!"; मैथिली ठाकूरच्या निवडणूक लढण्यासंदर्भात वडिलांची पहिली प्रतिक्रिया, तुम्हीही भावूक व्हाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 17:55 IST

"लालू यादव सत्तेत आल्यानंतर वातावरण खूपच बिघडले. ब्राह्मणांवर हल्ले सुरू झाले आणि लोक त्यांच्या शेत-जमिनींवर कब्जा करू लागले. त्याचबरोबर खोटे गुन्हे दाखल होण्याचे प्रकारही सुरू झाले होते."

देशासह परदेशातही आपल्या गायनामुळे लोकप्रिय झालेली लोकगायिका मैथिली ठाकूर बिहार विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची चर्चा सध्या सुरू झाली आहे. यासंदर्भात आता खुद्द मैथिलीचे वडील रमेश ठाकूर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आरपली मुलगी राजकारणात उतरली, तर आनंदच होईल, असे त्यांनी म्हटले आहे.

जबलपूर येथे मंगळवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना रमेश ठाकूर म्हणाले, "जेव्हा बिहारमधून पलायन सुरू झाले, तेव्हा आम्ही पहिल्या बॅचमधील पलायनकर्ते होतो. तेव्हापासून जे बाहेर पडलो, ते अद्यापही बाहेरच आहेत."

जातीय संघर्षामुळे सोडावा लागला बिहार -या पलायनाचे कारण सांगताना ते म्हणाले, राज्यात अचानकच जातीय उन्माद आणि संघर्ष प्रचंड वाढला होता. मी 1995 मध्ये बिहार सोडला आणि गेल्या 30 वर्षांपासून बाहेरच आहे." त्यांनी तत्कालीन परिस्थितीसाठी बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू यादव यांना जबाबदार धरले. "लालू यादव सत्तेत आल्यानंतर वातावरण खूपच बिघडले. ब्राह्मणांवर हल्ले सुरू झाले आणि लोक त्यांच्या शेत-जमिनींवर कब्जा करू लागले. त्याचबरोबर खोटे गुन्हे दाखल होण्याचे प्रकारही सुरू झाले होते." असेही ते म्हणाले.

यावेळी रमेश ठाकूर यांनी बिहारमधील विद्यमान नेतृत्वाकडून एक महत्त्वाची अपेक्षा व्यक्त केली आहे. ते म्हणाले, "बिहारमधून जे लोक पलायन करून गेले आहेत, त्यांची दखल घेणारे अजून कुणी नाही. त्यावर थोडे काम व्हायला हवे. जेणेकरून राज्याबाहेर गेलेले लोक पुन्हा बिहारमध्ये परत येऊन येथे काम करू शकतील. 1995 मध्ये सुरू झालेले हे पलायन आजही सुरूच आहे," असेही ते म्हणाले. याशिवाय, एनडीए (NDA) सरकार आल्यापासून बिहारमध्ये काहीसा विकास झाला असून, परिस्थिती सुधारली आहे, असे म्हणत त्यांनी एनडीएचे कौतुकही केले.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Maithili Thakur's election: Father's emotional reaction to migration from Bihar.

Web Summary : Folk singer Maithili Thakur's potential Bihar election bid prompts her father's reaction. He recounts their family's migration from Bihar in 1995 due to caste-based violence under Lalu Yadav's rule and expresses hope for the return of migrants with improved conditions under the NDA government.
टॅग्स :BiharबिहारElectionनिवडणूक 2024Madhya Pradeshमध्य प्रदेशNational Democratic Allianceराष्ट्रीय लोकशाही आघाडीLalu Prasad Yadavलालूप्रसाद यादव