शहरं
Join us  
Trending Stories
1
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
2
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
3
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
4
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
5
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
6
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
7
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
8
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
9
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
10
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
11
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
12
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
13
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
14
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
15
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
16
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
17
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
18
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
19
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
20
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ

दलितांच्या घरी जेवायला मी काही श्रीराम नाही- उमा भारती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2018 10:41 IST

त्यामुळेच मी सामाजिक समरसता वाढवण्यासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या भोजन समारंभांमध्ये सहभागी होत नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वारंवार इशारे देऊनही भाजपाचे वाचाळवीर काही शांत बसायला तयार नाहीत. केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी नुकत्याच केलेल्या एका वक्तव्यावरून याचा प्रत्यय आला. त्या मंगळवारी छतरपूर येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या. यावेळी त्यांनी म्हटले की, मी कधीच दलितांच्या घरी जेवायला जात नाही. परंतु, यासाठी माझ्याकडे ठोस असे कारण आहे. त्यामुळेच मी वेगळ्या ठिकाणी जेवते किंवा दलित समाजातील लोकांना भोजनासाठी घरी बोलावते. त्यांच्या घरी जाऊन जेवायला मी काही प्रभू रामचंद्र नव्हे. मी घरी जेवायला गेल्याने ते पवित्र होणार नाहीत. किंबहुना दलित लोक जेव्हा आपल्या घरात येऊन जेवतील तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने पवित्र होऊ. त्यामुळेच मी सामाजिक समरसता वाढवण्यासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या भोजन समारंभांमध्ये सहभागी होत नाही, असे उमा भारती यांनी म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे भाजपाला पुन्हा विरोधकांच्या टीकेचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. काही वेळाने आपण काय बोलून बसलो याची उपरती उमा भारती यांना झाली. या गावात समरसता भोजन कार्यक्रमाचे आयोजन केले आहे, हे मला माहिती नव्हते. दलित समाजाच्या लोकांच्या घरी जाऊन त्यांना भेटणे, त्यांची विचारपूस करणे त्यांच्या घरी जेवण करणे या सगळ्या गोष्टी आता मागे पडल्या आहेत, असेही मत उमा भारती यांनी नोंदवले. राजकारणातही दलितांसोबत भेदभाव केला जातो तो दूर झाला पाहिजे, दलितांच्या आर्थिक समृद्धीसाठी आणि त्यांना समाजात एक चांगले स्थान मिळवून देण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत, अशी सारवासारव उमा भारती यांनी करावी लागली.गेल्या काही दिवसांतील घटनांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दलित समाजातील पक्षाविषयीची नाराजी दूर करण्याचे आदेश नेत्यांना दिले आहेत. त्यासाठी दलितबहुल गावांमध्ये एका रात्रीसाठी वास्तव्य करा, असे मोदींनी भाजपाच्या नेत्यांना सांगितले आहे.  

टॅग्स :Uma Bhartiउमा भारतीDalit assaultदलितांना मारहाण