शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवाल कधीही भाजपासोबत जातील; BJP च्या जुन्या मित्राचा दावा, काँग्रेसचाही आरोप
2
मोठी बातमी! मोदी-राज यांच्या सभेनंतर उद्धव ठाकरे मुंबईत एकाच दिवशी घेणार ४ सभा
3
...तेव्हापासून संजय राऊत पिसाळलेत; राज ठाकरेंवरील टीकेवरून मनसेचा खोचक पलटवार
4
Arvind Kejriwal : "मी 4 जूनला जेलमध्ये असेन, TV पाहत असताना..."; अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
5
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
6
कॅफे म्हैसूरच्या मालकावर फिल्मी स्टाईल दरोडा; पोलिसांची व्हॅन वापरुन पळवले २५ लाख
7
Investment Tips : निवृत्तीनंतर हात पसरायचे नसतील तर काय कराल? 'या' योजनांमध्ये गुंतवणुकीचा करू शकता विचार
8
३ राजयोग, दुप्पट लाभ: ७ राशींना शुभ फलदायी, नोकरीत प्रगती; धनलाभ योग, उत्तम अनुकूल काळ!
9
धक्कादायक! घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत कार्तिक आर्यनच्या मामा-मामीचा मृत्यू, ३ दिवसांनी सापडले मृतदेह
10
Priyanka Gandhi : "राहुल गांधींनी लग्न करावं, त्यांना मुलं व्हावीत"; भावासाठी प्रियंका गांधींनी जाहीर केली इच्छा
11
अजित पवारांचे माहित नाही, पण भुजबळ नाराज असल्याचे ऐकले, त्यांना अंदाज आलाय; जयंत पाटलांचे स्पष्ट संकेत
12
उद्धव ठाकरे तुम्ही पंज्याला मत द्यायला जाताय, काहीच वाटत नाही का? गुलाबराव पाटलांचा बोचरा सवाल
13
"मी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा कार्यकर्ता, पण शेतकरी म्हणून मोदींच्या सभेला गेलो"
14
या निवडणुकीनंतर राज्यातील काही दुकाने बंद होतील, त्यात राज ठाकरेंचेही दुकान; राऊतांची टीका
15
८४ वर्षांपूर्वी दोन भावांनी McDonald'sची केलेली सुरुवात; आज ११९ देशांत ४२००० पेक्षा अधिक आऊटलेस्ट
16
सावधान! इंटरनेटलाच डॉक्टर मानता?; तर तुम्हीही ठरू शकता Idiot Syndrome चे बळी
17
Kangana Ranaut Edcuation : निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या बॉलिवूडच्या 'क्वीन'चं शिक्षण ऐकून बसेल धक्का
18
Swati Maliwal : "माझं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न..."; स्वाती मालीवाल यांनी मारहाण प्रकरणावर मांडली व्यथा
19
ठाणे, अहमदाबाद अन् शेवटी हॉटेल बदलण्यासाठी तयारी...; भावेश भिंडे पोलिसांना कसा सापडला?
20
Narendra Modi : "मुलाला 99 गुण मिळाले तर..."; 400 पार करण्याच्या टार्गेटवर नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं

मी आता काँग्रेसच्या अध्यक्षपदी नाही, राहुल गांधी यांनी केले स्पष्ट 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2019 3:48 PM

लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर नव्या अध्यक्षाची निवड अद्याप न झाल्याने पक्षात निर्नायकी अवस्था निर्माण झाली आहे.

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर नव्या अध्यक्षाची निवड अद्याप न झाल्याने पक्षात निर्नायकी अवस्था निर्माण झाली आहे.  पक्षात नेतृत्वावरून सुरू असलेल्या अनिश्चिततेदरम्यान मी आता काँग्रेसच्या अध्यक्षपदी नाही, मी अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला आहे, असे राहुल गांधी यांनी स्पष्ट केले आहे. तसेच नव्या अध्यक्षाची निवड काँग्रेसची कार्यकारी समिती करेल, असेही त्यांनी सांगितले. बुधवारी प्रसारमाध्यमांनी संवाद साधताना राहुल गांधी यांनी आपल्या राजीनाम्याविषयी भूमिका स्पष्ट केली. मी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे पक्षाच्या अध्यक्षपदावर आता मी नाही. आता काँग्रेसचा पुढील अध्यक्ष कोण असेल याचा निर्णय पक्षाची कार्यकारी समिती घेईल. तसेच पक्षाने अध्यक्षपदासाठी  विनाविलंब निवडणूक घेऊन नव्या अध्यक्षाची निवड केली पाहिजे. आधीच राजीनामा दिलेला असल्याने मी या प्रकियेमध्ये सहभागी नसेन.''असे राहुल गांधी यांनी सांगितले. 

दरम्यान, राहुल गांधी यांनी यासंदर्भात एक पत्र प्रसिद्ध केले आहे. काँग्रेसचा अध्यक्ष या नात्याने लोकसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी मी स्वीकारली आहे. पक्षाच्या वाढीच्या दृष्टीने या पराभवाचे उत्तरदायित्व स्वीकारून मी राजीनामा देत आहे,'''असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. 

 मे महिन्यात आटोपलेल्या 17 व्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला दारुण पराभव पत्करावा लागला होता. राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली लढणाऱ्या काँग्रेसला केवळ 52 जागांवर समाधान मानावे लागले होते. या पराभवामुले व्यथित झालेल्या राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. तसेच काँग्रेसचा यापुढील अध्यक्ष हा गांधी कुटुंबाबाहेरील व्यक्ती असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले होते. मात्र राहुल गांधी यांनी आपला निर्णय बदलावा यासाठी काँग्रेसच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांकडून त्यांची मनधरणी सुरू होती. मात्र आज त्यांनी ज्याप्रकारे आपण काँग्रेसचे अध्यक्ष नाही, असे सांगितले त्यावरून ते आपला निर्णय बदलणार नाहीत, असे स्पष्ट होत आहे. दरम्यान, आज राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी सुमारे 40 मिनिटे चर्चा केली होती. तसेच सोमवारी काँग्रेसच्या पाच राज्यांतील मुख्यमंत्र्यांनी राहुल गांधी यांची भेट घेत त्यांना अध्यक्षपदावर कायम राहण्याची विनंती केली होती. मात्र राहुल गांधी यांनी या मुख्यमंत्र्यांची मागणी धुडकावून लावत पक्षासाठी नवा अध्यक्ष शोधण्यास सांगितले होते.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसPoliticsराजकारण