शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
3
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
4
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
5
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
6
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
7
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
8
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
10
Uddhav Thackeray: "नशीब..., नाही तर फडणवीस म्हणून 20वे आले असते...!"; मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत उद्धव ठाकरेंनी भरसभेत नेमकं काय वाचलं?
11
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
12
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
13
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
14
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
15
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
16
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  
17
“लोकशाहीवर चौफेर हल्ले, चीनला शक्य ते भारत करू शकत नाही”; कोलंबियातून राहुल गांधींची टीका
18
याला म्हणतात ढासू परतावा...! ₹1 च्या शेअरमध्ये तुफान तेजी, ₹184 वर पोहोचला भाव; आता कंपनीनं केली मोठी डील
19
...अन्यथा महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही; मनोज जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा थोपटले दंड, कोणत्या मागण्या केल्या?
20
IAS Srishti Dabas : शाब्बास पोरी! दिवसा काम अन् रात्री अभ्यास; सुंदर IAS चा नेत्रदीपक प्रवास, अडचणींवर केली मात

अतूट प्रेम! पतीच्या मृत्यूनंतर 5 तासांत पत्नीनेही सोडला जीव; एकाच चितेवर दोघांना मुखाग्नी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2022 10:27 IST

एका जोडप्याने तब्बल 80 वर्षे एकमेकांना साथ दिली आणि आता सोबतच शेवटचा श्वास घेतला असल्याची घटना घडली आहे.

नवी दिल्ली - प्रेमात अनेकजण एकत्र जगण्याची आणि मरण्याची शपथ घेतात. पण फार कमी लोक ते शेवटपर्यंत निभावू शकतात. अशीच एक हृदयस्पर्शी घटना आता समोर आली आहे. एका जोडप्याने तब्बल 80 वर्षे एकमेकांना साथ दिली आणि आता सोबतच शेवटचा श्वास घेतला असल्याची घटना घडली आहे. पतीच्या मृत्यूनंतर 5 तासांत पत्नीनेही जीव सोडला. त्यामुळे एकाच चितेवर दोघांना मुखाग्नी देण्यात आला आहे. 105 वर्षांचा पती आणि 101 वर्षांची पत्नी ही जोडी प्रेमाचं एक अनोखं उदाहरण ठरली. लग्नानंतर हे जोडपं 80 ​​वर्षे एकत्र राहिलं. अवघ्या पाच तासांच्या अंतराने दोघांचाही मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानच्या अजमेर शहरातील श्रीनगर गावातील या जोडप्याची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. भैरू सिंह रावत आणि त्यांची पत्नी हिरादेवी असं या जोडप्याचं नाव होतं. रावत यांच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांचं 80 वर्षांपूर्वी लग्न झालं होतं. दोघांनाही एकमेकांबद्दल खूप जिव्हाळा होता. हे जो़डपं त्यांचा 70 वर्षीय मुलगा शंकरसोबत राहत होते. तीन दिवसांपूर्वी दोघांनी एकत्रच जगाचा निरोप घेतला.

गावकऱ्यांनी या दोघांनीही आपलं जीवन अत्यंत साधेपणानं जगल्याचं सांगितलं. दोघंही एकत्र शेती करायचे. भैरू सिंह यांनी शेतीच्या कामानंतर गावातच किराणा मालाचं दुकान सुरू केलं. काही वर्षांपूर्वी भैरू सिंह यांना अर्धांगवायू झाला होता. भैरू सिंह यांचं दुपारी अचानक निधन झालं. पतीच्या निधनाचा धक्का पत्नी हिरादेवी यांना सहन न झालं नाही. पती भैरू सिंह यांच्या निधनानंतर अवघ्या पाच तासांत हिरादेवी यांनीही जगाचा निरोप घेतला.

एकाच दिवशी एका वृद्ध दाम्पत्याचा मृत्यू झाल्याने परिसरात हा चर्चेचा विषय ठरला आहे. ग्रामस्थांनी त्यांच्या घरी जाऊन दोघांनाही श्रद्धांजली वाहिली. मृत्यूनंतर दोघांवर एकाच चितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. एकाच चितेवर दोघांचे अंत्यसंस्कार पाहून स्मशानभूमीतील सर्वांचेच लोकांचे डोळे पाणावले. अंत्ययात्रेत आजूबाजूच्या गावातील ग्रामस्थ उपस्थित होते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :marriageलग्नDeathमृत्यूRajasthanराजस्थान