शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
3
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
4
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
5
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
6
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
7
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
8
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
9
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
10
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
11
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
12
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
13
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
14
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
15
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
16
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
17
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
18
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
19
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
20
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही

डोळ्यासमोर पतीला जिवंत जळताना पाहिलं, फोटोसमोर रात्रंदिवस रडत राहिली अखेर ३५ दिवसांनी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2021 08:44 IST

शुक्रवारी कुटुंबाने रिजवानाला उठवलं आणि तयार व्हायला सांगत तिच्या रुममधून बाहेर पडले. खूप वेळ झाला तरी रिजवाना बाहेर येत नाही त्यामुळे कुटुंबातील व्यक्ती तिच्या रुममध्ये परत गेले.

ठळक मुद्देशाहगड पोलीस घटनास्थळी पोहचले त्यानंतर मृतदेह ताब्यात घेऊन त्याचं पोस्टमोर्टम केले रिजवानाचे लग्न जवळपास ६ वर्षापूर्वी साजिद खान या काजी टीकमगड येथे राहणाऱ्या युवकाशी झालं होतं. काही दिवसांपूर्वीच रिजवाना बरी झाल्यानंतर तिला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला.

सागर – ३५ दिवसापूर्वी सागर जिल्ह्यातील एनएच २६ महामार्गावर रोड अपघातात कारमध्ये जिवंत जळाल्याने पतीचा मृत्यू झाला. या धक्क्यातून न सावरणाऱ्या पत्नीनं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या प्रकरणात सध्या पोलीस तपास सुरू आहे. माहितीनुसार, रिजवाना खान हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर शाहगढ येथील तिच्या वडिलांच्या घरीच राहायला होती.

शुक्रवारी कुटुंबाने रिजवानाला उठवलं आणि तयार व्हायला सांगत तिच्या रुममधून बाहेर पडले. खूप वेळ झाला तरी रिजवाना बाहेर येत नाही त्यामुळे कुटुंबातील व्यक्ती तिच्या रुममध्ये परत गेले. परंतु रुममध्ये जे दृश्य पाहिलं ते पाहून कुटुंबांला मोठा धक्का बसला. रिजवानाचा मृतदेह पंख्याला गळफास घेऊन लटकलेल्या अवस्थेत असल्याचं दिसून आलं. त्यानंतर तातडीनं कुटुंबाने याबाबत पोलिसांना माहिती दिली.

शाहगड पोलीस घटनास्थळी पोहचले त्यानंतर मृतदेह ताब्यात घेऊन त्याचं पोस्टमोर्टम केले आणि पुन्हा मृतदेह कुटुंबाच्या स्वाधीन केला. मृतक रिजवानाच्या मृतदेहाशेजारी सुसाईड नोटही सापडली नाही. रिजवानाचे वडील लियाकत खां यांनी सांगितले की, रिजवानाचे लग्न जवळपास ६ वर्षापूर्वी साजिद खान या काजी टीकमगड येथे राहणाऱ्या युवकाशी झालं होतं. एक महिन्यापूर्वी साजिद आणि रिजवाना कारमधून घराच्या दिशेने येत होते. तेव्हा अचानक कारचा अपघात झाला. या अपघातात कारमध्ये आग लागली आणि जावई साजिद खानचा जळाल्यामुळे मृत्यू झाला.

तर रिजवाना गंभीर जखमी झाली होती. तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते. काही दिवसांपूर्वीच रिजवाना बरी झाल्यानंतर तिला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर तिला शाहगड येथील घरी आणलं. डोळ्यासमोर पतीचा जळून मृत्यू झाल्यानं तिला मोठा धक्का बसला होता. रिजवाना रोज तिच्या पतीचा फोटो पाहून दिवसभर रडत होती. तिला हे दु:ख सहन झालं नाही.

३५ दिवसापूर्वी झालेल्या अपघातात पतीचा मृत्यू

३० एप्रिलला सागर जिल्ह्यातील साईखेडा ते लिधौरा या दरम्यान कारचं नियंत्रण सुटल्याने कार दुभाजकावर चढली. हा अपघात इतका भीषण होता की, कारला आग लागली. या अपघातात साजिद खान यांचा जिवंत जळाल्याने मृत्यू झाला. तर पत्नी रिजवाना खान आगीच्या चपाट्यात सापडल्यानं गंभीररित्या जखमी झाली होती.

टॅग्स :Accidentअपघातhospitalहॉस्पिटलPoliceपोलिस