शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', ऑपरेशन सिंदूरवरुन PM मोदींची बोचरी टीका
2
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
3
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
4
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
5
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
6
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
7
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
8
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
9
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
10
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
11
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
12
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
13
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
14
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?
15
मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, देशातील सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक
16
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
17
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
18
चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!
19
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रालयाने केला खुलासा...
20
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?

डोळ्यासमोर पतीला जिवंत जळताना पाहिलं, फोटोसमोर रात्रंदिवस रडत राहिली अखेर ३५ दिवसांनी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2021 08:44 IST

शुक्रवारी कुटुंबाने रिजवानाला उठवलं आणि तयार व्हायला सांगत तिच्या रुममधून बाहेर पडले. खूप वेळ झाला तरी रिजवाना बाहेर येत नाही त्यामुळे कुटुंबातील व्यक्ती तिच्या रुममध्ये परत गेले.

ठळक मुद्देशाहगड पोलीस घटनास्थळी पोहचले त्यानंतर मृतदेह ताब्यात घेऊन त्याचं पोस्टमोर्टम केले रिजवानाचे लग्न जवळपास ६ वर्षापूर्वी साजिद खान या काजी टीकमगड येथे राहणाऱ्या युवकाशी झालं होतं. काही दिवसांपूर्वीच रिजवाना बरी झाल्यानंतर तिला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला.

सागर – ३५ दिवसापूर्वी सागर जिल्ह्यातील एनएच २६ महामार्गावर रोड अपघातात कारमध्ये जिवंत जळाल्याने पतीचा मृत्यू झाला. या धक्क्यातून न सावरणाऱ्या पत्नीनं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या प्रकरणात सध्या पोलीस तपास सुरू आहे. माहितीनुसार, रिजवाना खान हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर शाहगढ येथील तिच्या वडिलांच्या घरीच राहायला होती.

शुक्रवारी कुटुंबाने रिजवानाला उठवलं आणि तयार व्हायला सांगत तिच्या रुममधून बाहेर पडले. खूप वेळ झाला तरी रिजवाना बाहेर येत नाही त्यामुळे कुटुंबातील व्यक्ती तिच्या रुममध्ये परत गेले. परंतु रुममध्ये जे दृश्य पाहिलं ते पाहून कुटुंबांला मोठा धक्का बसला. रिजवानाचा मृतदेह पंख्याला गळफास घेऊन लटकलेल्या अवस्थेत असल्याचं दिसून आलं. त्यानंतर तातडीनं कुटुंबाने याबाबत पोलिसांना माहिती दिली.

शाहगड पोलीस घटनास्थळी पोहचले त्यानंतर मृतदेह ताब्यात घेऊन त्याचं पोस्टमोर्टम केले आणि पुन्हा मृतदेह कुटुंबाच्या स्वाधीन केला. मृतक रिजवानाच्या मृतदेहाशेजारी सुसाईड नोटही सापडली नाही. रिजवानाचे वडील लियाकत खां यांनी सांगितले की, रिजवानाचे लग्न जवळपास ६ वर्षापूर्वी साजिद खान या काजी टीकमगड येथे राहणाऱ्या युवकाशी झालं होतं. एक महिन्यापूर्वी साजिद आणि रिजवाना कारमधून घराच्या दिशेने येत होते. तेव्हा अचानक कारचा अपघात झाला. या अपघातात कारमध्ये आग लागली आणि जावई साजिद खानचा जळाल्यामुळे मृत्यू झाला.

तर रिजवाना गंभीर जखमी झाली होती. तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते. काही दिवसांपूर्वीच रिजवाना बरी झाल्यानंतर तिला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर तिला शाहगड येथील घरी आणलं. डोळ्यासमोर पतीचा जळून मृत्यू झाल्यानं तिला मोठा धक्का बसला होता. रिजवाना रोज तिच्या पतीचा फोटो पाहून दिवसभर रडत होती. तिला हे दु:ख सहन झालं नाही.

३५ दिवसापूर्वी झालेल्या अपघातात पतीचा मृत्यू

३० एप्रिलला सागर जिल्ह्यातील साईखेडा ते लिधौरा या दरम्यान कारचं नियंत्रण सुटल्याने कार दुभाजकावर चढली. हा अपघात इतका भीषण होता की, कारला आग लागली. या अपघातात साजिद खान यांचा जिवंत जळाल्याने मृत्यू झाला. तर पत्नी रिजवाना खान आगीच्या चपाट्यात सापडल्यानं गंभीररित्या जखमी झाली होती.

टॅग्स :Accidentअपघातhospitalहॉस्पिटलPoliceपोलिस