शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

पतीने पोलीस कॉन्स्टेबल पत्नीसह आई आणि मुलांची केली हत्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, समोर आलं धक्कादायक कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2024 15:27 IST

Bihar Crime News: बिहारमधील भागलपूर येथील पोलीस लाइनमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे कौटुंबिक वादातून एका तरुणाने पोलीस कॉन्स्टेबल पत्नीसह आई आणि दोन मुलांची हत्या केली. त्यानंतर या तरुणाने स्वत:ही जीवन संपवल्याचं समोर आलं आहे.

बिहारमधील भागलपूर येथील पोलीस लाइनमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे कौटुंबिक वादातून एका तरुणाने पोलीस कॉन्स्टेबल पत्नीसह आई आणि दोन मुलांची हत्या केली. त्यानंतर या तरुणाने स्वत:ही जीवन संपवल्याचं समोर आलं आहे. या घटनेची माहिती मिळताच अनेक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल झालं. 

मृत महिला कॉन्स्टेबल नीतू कुमारी ही बक्सर येथील रहिवासी होती. तर पंकज कुमार हा आरा जिल्ह्यातील रहिवासी होता. दोघांचाही प्रेमविवाह झालेला होता. दरम्यानस नीतू हिची दोन वर्षांपूर्वी भागलपूर येथे बदली झाली होती. तेव्हापासून हे कुटुंब येथील सरकारी पोलीस क्वार्टरमध्ये राहत होते. दरम्यान, नीतूचा पती हा बेरोजगार असल्याची माहिती समोर आली आहे.

पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, आजूबाजूच्या लोकांकडे चौकशी केली असता, या पती-पत्नीमध्ये वाद सुरू होता. दरम्यान हा वाद इतका विकोपाला गेला की अखेरीस त्याची परिणती या भयंकर हत्याकांडामध्ये झाली. घटनास्थळावरून एक चिठ्ठीही सापडली आहे. मात्र पोलीस सध्या सगळ्या शक्यता विचारात घेऊन पुढील तपास करत आहेत. 

या प्रकरणी तपासासाठी एफएसएलच्या पथकालाही घटनास्थळी बोलावण्यात आलं आहे. तर हत्याकांडामधील मृतांचे मृतदेह पोस्टमार्टेमसाठी पाठवण्यात आले आहेत.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBiharबिहारFamilyपरिवारPoliceपोलिस