शहरं
Join us  
Trending Stories
1
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
2
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
3
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
4
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
5
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
6
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

Accident:...अन् एकाच चितेवर पती-पत्नी दोघांवर अंत्यसंस्कार; कुटुंबावर कोसळला दुखा:चा डोंगर  

By प्रविण मरगळे | Published: February 18, 2021 2:51 PM

Sidhi Bus Accident News: तपस्याचा मृतदेह मंगळवारी दुपारी ३ वाजता सापडला तर अजयचा मृतदेह ५ वाजता सापडला.

ठळक मुद्देअजयचे वडील गुजरातमध्ये असल्याने त्यांना मुलगा-सुनेच्या अंत्यसंस्कारालाही उपस्थित राहता आलं नाहीमध्य प्रदेशातील सीधी बस अपघातात आतापर्यंत या दुर्घटनेत ५१ जणांचा मृत्यू२३ वर्षीय पत्नी तपस्यासाठी एएनएम पेपर देण्यासाठी ते सीधीहून सतना येथे जात होते

मध्य प्रदेशात सीधी येथे बसचा भीषण अपघात घडला, जे विसरणं कोणालाही शक्य नाही. आतापर्यंत या दुर्घटनेत ५१ जणांचा मृत्यू झाला आहे. तर दुसरीकडे या अपघातात पती-पत्नीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. या दोघांचा विवाह ८ जून २०२० मध्ये झाला होता, अखेरच्या श्वासापर्यंत एकत्र राहू असं एकमेकांना वचन दिलं होतं, अखेर या वचनाची आठवण सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आणते. (Sidhi Bus Accident in Madhya Pradesh)

या दोघा पती-पत्नीवर काळाने झडप घातली आहे. सीधी जिल्ह्यातील शमी येथील गैवटाच्या देवरी गावात राहणारा २५ वर्षीय अजय पनिका, सीधीमध्ये रूम घेऊन राहत होता. २३ वर्षीय पत्नी तपस्यासाठी एएनएम पेपर देण्यासाठी ते सीधीहून सतना येथे जात होते, याचवेळी झालेल्या रस्ते अपघातात या दोघांचा जीव गेला. या घटनेची माहिती कुटुंबाला मिळताच सगळ्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली, दोघांच्या मृत्यूने कुटुंबावर दुखा:चा डोंगर कोसळला होता.

तपस्याचा मृतदेह मंगळवारी दुपारी ३ वाजता सापडला तर अजयचा मृतदेह ५ वाजता सापडला. पोस्टमोर्टमनंतर दोघांचा मृतदेह रुग्णवाहिकेतून रात्री १० च्या सुमारास देवरी गावात पोहचला. या दोघांच्या मृत्युमुळे गावावर शोककळा पसरली होती. सर्वांचे डोळे पाण्याने भरले होते, अजयचे वडील गुजरातमध्ये असल्याने त्यांना मुलगा-सुनेच्या अंत्यसंस्कारालाही उपस्थित राहता आलं नाही. त्यांना गुजरामधून यायचं झालं असतं तरी ३ दिवसांचा कालावधी लागला असता. पोर्स्टमोर्टममुळे मृतदेह इतके दिवस ठेवणे शक्य नव्हतं.

८ महिन्यांपूर्वीच या दोघांचे लग्न झालं होतं, अजयची पत्नी तपस्याला शिक्षण देऊन तिला काहीतरी बनवण्याची इच्छा होती, त्यासाठी परीक्षेचा पेपर देण्यासाठी दोघं सतना येथे जात होते, मात्र दुर्दैवी अपघातात त्यांना जीव गमवावा लागला. त्यानंतर अजय आणि तपस्या दोघांचे मृतदेह सापडल्यावर एकत्र त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या दोघांना एकाच चितेवरून गावकऱ्यांनी अखेरचा निरोप दिला.    

अपघातातील जखमींना केंद्र आणि राज्य सरकारकडून मदत

अपघातानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दु:ख व्यक्त केले पंतप्रधानांनी मृतांच्या नातेवाईकांना दोन लाख रुपये तर राज्य सरकारने पाच लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. जखमींना ५० हजार रुपयांची मदत देण्यात येणार असल्याची घोषणा केली.

टॅग्स :AccidentअपघातMadhya Pradeshमध्य प्रदेश