शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

झारखंडच्या चक्रधरपूरमध्ये हावडा मुंबई मेलला अपघात, ३ डबे रुळावरून घसरले, ६ जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2024 08:13 IST

झारखंडच्या चक्रधरपूर रेल्वे विभागातील बारांबो रेल्वे स्थानकाजवळ हावडा मुंबई मेल एक्सप्रेसला अपघात झाला आहे.

झारखंडमधील चक्रधरपूर रेल्वे विभागातील बारांबो रेल्वे स्थानकाजवळ हावडा मुंबई मेल एक्सप्रेसला अपघात झाला आहे. रेल्वेचे तीन डबे रुळावरून घसरल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातात ६ जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांसह एआरएम, एडीआरएम आणि सीकेपीचे पथक घटनास्थळी पोहोचले आहे.

पाकने जम्मू-काश्मीरमध्ये घुसवले ६००पेक्षा अधिक कमांडो; माजी पोलिस महासंचालकांचा खळबळजनक दावा 

या घटनेबाबत माहिती देताना रेल्वे अधिकारी म्हणाले, १२८१० हावडा-सीएसएमटी एक्स्प्रेसचे तीन डबे रुळावरून घसरल्याची माहिती चक्रधरपूर विभागातील राजखरस्वान वेस्ट आउट आणि बारांबो दरम्यान चक्रधरपूरजवळ पहाटे ३.४५ वाजता मिळाली. एसईआरच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, "बाराबांबोजवळ मुंबई-हावडा मेलचे अनेक डबे रुळावरून घसरले. या अपघातात सहा प्रवासी जखमी झाले असून त्यांना बारांबो येथे वैद्यकीय मदत देण्यात आली. आता त्यांना चांगल्या उपचारांसाठी चक्रधरपूरला नेण्यात आले आहे. मदतकार्य अजूनही सुरूच आहे.

स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिलेली माहिती अशी, सेराईकेला-खरसावन जिल्ह्यातील खरसावन ब्लॉकमधील पोटोबेडा येथे हा रेल्वे अपघात झाला.  या अपघातात मुंबई-हावडा मेल आणि मालगाडीचा समावेश आहे. जखमींची माहिती घेण्याच काम सुरू आहे.

'घटनेची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा प्रशासनाकडून चक्रधरपूर रेल्वे विभागाचे अधिकारी, रिलीफ ट्रेन आणि अनेक रुग्णवाहिका घटनास्थळी पाठवण्यात आल्या आहेत. या घटनेत ६ जण जखमी झाल्याचीही माहिती मिळाली आहे. याशिवाय, बारांबोजवळ ट्रेन क्रमांक १२८१० रुळावरून घसरल्याच्या घटनेसाठी प्रशासनाने हेल्पलाइन क्रमांक ०६५१-२७-८७११५ जारी केला आहे.

टॅग्स :Accidentअपघातrailwayरेल्वे