शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

झारखंडच्या चक्रधरपूरमध्ये हावडा मुंबई मेलला अपघात, ३ डबे रुळावरून घसरले, ६ जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2024 08:13 IST

झारखंडच्या चक्रधरपूर रेल्वे विभागातील बारांबो रेल्वे स्थानकाजवळ हावडा मुंबई मेल एक्सप्रेसला अपघात झाला आहे.

झारखंडमधील चक्रधरपूर रेल्वे विभागातील बारांबो रेल्वे स्थानकाजवळ हावडा मुंबई मेल एक्सप्रेसला अपघात झाला आहे. रेल्वेचे तीन डबे रुळावरून घसरल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातात ६ जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांसह एआरएम, एडीआरएम आणि सीकेपीचे पथक घटनास्थळी पोहोचले आहे.

पाकने जम्मू-काश्मीरमध्ये घुसवले ६००पेक्षा अधिक कमांडो; माजी पोलिस महासंचालकांचा खळबळजनक दावा 

या घटनेबाबत माहिती देताना रेल्वे अधिकारी म्हणाले, १२८१० हावडा-सीएसएमटी एक्स्प्रेसचे तीन डबे रुळावरून घसरल्याची माहिती चक्रधरपूर विभागातील राजखरस्वान वेस्ट आउट आणि बारांबो दरम्यान चक्रधरपूरजवळ पहाटे ३.४५ वाजता मिळाली. एसईआरच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, "बाराबांबोजवळ मुंबई-हावडा मेलचे अनेक डबे रुळावरून घसरले. या अपघातात सहा प्रवासी जखमी झाले असून त्यांना बारांबो येथे वैद्यकीय मदत देण्यात आली. आता त्यांना चांगल्या उपचारांसाठी चक्रधरपूरला नेण्यात आले आहे. मदतकार्य अजूनही सुरूच आहे.

स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिलेली माहिती अशी, सेराईकेला-खरसावन जिल्ह्यातील खरसावन ब्लॉकमधील पोटोबेडा येथे हा रेल्वे अपघात झाला.  या अपघातात मुंबई-हावडा मेल आणि मालगाडीचा समावेश आहे. जखमींची माहिती घेण्याच काम सुरू आहे.

'घटनेची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा प्रशासनाकडून चक्रधरपूर रेल्वे विभागाचे अधिकारी, रिलीफ ट्रेन आणि अनेक रुग्णवाहिका घटनास्थळी पाठवण्यात आल्या आहेत. या घटनेत ६ जण जखमी झाल्याचीही माहिती मिळाली आहे. याशिवाय, बारांबोजवळ ट्रेन क्रमांक १२८१० रुळावरून घसरल्याच्या घटनेसाठी प्रशासनाने हेल्पलाइन क्रमांक ०६५१-२७-८७११५ जारी केला आहे.

टॅग्स :Accidentअपघातrailwayरेल्वे