शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

कसे उघडले ‘दक्षिणेचे दार’? भारत जाेडाे यात्रा ठरली टर्निंग पाॅइंट...! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2023 06:44 IST

रणदीप सुरजेवाला यांनी आपले विश्वासू प्रोफेसर गौरव वल्लभ यांच्याकडे मीडियातील प्रचाराची रणनीती ठरवण्याचे काम सोपविले होते. यातूनच ४० टक्के कमिशन, पाच आश्वासने, नंदिनी दूध तसेच महागाई आदी स्थानिक मुद्द्यांना केंद्रस्थानी धरून प्रचाराची रणनीती आखली होती.

आदेश रावल -नवी दिल्ली : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला जोरदार विजय मिळाला आहे. प्रचाराची सारी सूत्रे काँग्रेसच्या ‘वॉररूम’मधून निवडणूक रणनीतीकार सुनील कानूगोलू आणि पक्षाचे महासचिव तसेच कर्नाटकचे प्रभारी रणदीप सुरजेवाला हलवित होते. रणदीप सुरजेवाला यांनी आपले विश्वासू प्रोफेसर गौरव वल्लभ यांच्याकडे मीडियातील प्रचाराची रणनीती ठरवण्याचे काम सोपविले होते. यातूनच ४० टक्के कमिशन, पाच आश्वासने, नंदिनी दूध तसेच महागाई आदी स्थानिक मुद्द्यांना केंद्रस्थानी धरून प्रचाराची रणनीती आखली होती. निवडणूक प्रचारात उद्योगपती गौतम अदानी आणि चीनसारख्या राष्ट्रीय मुद्द्यांचा उल्लेखही करायचा नाही, यासाठी राहुल गांधी यांना राजी करण्यात आले होते. काँग्रेसने जाहीरनाम्यात बजरंग दलावर बंदीचे आश्वासन दिले होते. काँग्रेसकडून ही मोठी चूक झाली, असे मानले जात होते. परंतु हा काँग्रेसच्या रणनीतीचा एक भाग होता. दलित समाजाची मते मिळविण्यासाठी काँग्रेसने जाणीवपूर्वक ही खेळी केली होती. कर्नाटकमध्ये अनेक दलित युवकांची हत्या केल्याचा आरोप बजरंग दलाच्या नेत्यांवर होता. यामुळे दलित समाजात या संघटनेविषयी कमालीचा राग होता. 

स्ट्राइक रेट ६६% - मतदारांना भावली भारत जोडो यात्रा काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा कर्नाटकमध्ये २१ दिवस होती. तिचा प्रवास झालेल्या सात जिल्ह्यांमध्ये ४८ विधानसभा जागा आहेत. त्यातील ३२ जागा नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांत काँग्रेसने जिंकल्या. म्हणजे काँग्रेसचा तेथील स्ट्राइक रेट ६६ टक्के आहे. २०१८च्या विधानसभा निवडणुकांत या सात जिल्ह्यांमध्ये काँग्रेसने फक्त १५ तर भाजपने १७ जागा जिंकल्या होत्या. पण, यंदा काँग्रेसने हे सर्व जिल्हे काबीज केले आहेत.

५११ किलाेमीटरचा प्रवास २१ दिवसांमध्येदेशात सध्या लोकांमध्ये द्वेष पसरविण्याचे काम सुरु आहे, समाजामध्ये फूट पा़डली जात आहे. पण, मी जनतेमध्ये प्रेम वाटण्यासाठी आलो आहे, असा संदेश राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान दिला होता. यामुळे प्रभावित झालेल्या लोकांनाही २१ दिवसांत या यात्रेला भरभरून प्रतिसाद दिला होता. 

काँग्रेसचे अभिनंदन -काँग्रेसला कर्नाटक विधानसभा निवडणुकांत विजय मिळाला. त्याबद्दल त्या पक्षाचे मन:पूर्वक अभिनंदन. जनतेच्या आशा-आकांक्षा पूर्ण करण्यासाठी काँग्रेस करणार असलेल्या प्रयत्नांकरिता मी शुभेच्छा देतो.    - नरेंद्र मोदी, पंतप्रधान

टॅग्स :Karnataka Electionकर्नाटक विधानसभा निवडणूकKarnatakकर्नाटकKarnatak Politicsकर्नाटक राजकारणcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीMallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गे