शहरं
Join us  
Trending Stories
1
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
2
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
3
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
4
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
5
एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
6
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
7
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
8
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
9
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
10
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
11
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
12
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
13
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
14
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
15
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
16
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
17
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
18
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
19
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
20
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण

आणखी किती काळ आपण भांडणार? शहा-राऊत यांची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2018 04:34 IST

राज्यसभेच्या उपसभापती पदाच्या निवडणुकीत प्रत्येक मत महत्वाचे आहे. शिवसेनेची ३ मते रालोआच्या बाजूने आहेत की नाहीत, याविषयी अमित शहांना शंका होती.

- सुरेश भटेवरानवी दिल्ली : राज्यसभेच्या उपसभापती पदाच्या निवडणुकीत प्रत्येक मत महत्वाचे आहे. शिवसेनेची ३ मते रालोआच्या बाजूने आहेत की नाहीत, याविषयी अमित शहांना शंका होती. त्यासंबंधी शहा आणि संजय राऊत यांच्या खास भेटीची रंजक माहिती हाती आली आहे.जद (यु)चे हरिवंश यांना सत्ताधारी आघाडीने उमेदवार बनवल्यावर शंकेचे निरसन करण्यासाठी शहा थेट उध्दव ठाकरेंशी फोनवर बोलले. यावेळी संजय राऊत यांच्याशी बोला, असे त्यांनी शहांना सुचवले. मंगळवारी संसदेच्या आवारात शहा सकाळपासून राऊतांना शोधत होते. जेटलींच्या दालनात शहा तुमची वाट पहात आहेत असा निरोप एका दूतामार्फत राऊत यांना पाठवला. पण राऊत तिथे पोहोचेपर्यंत शहा राज्यसभा सभागृहात गेले होते. मग राऊतही तिथे गेले. राऊत यांना पहाताच शहांनी त्यांना आसनाजवळ बोलावले. शहा राऊतांना म्हणाले, ‘आणखी कितीकाळ आपण भांडणार आहोत? परवा हरिवंश यांची निवडणूक आहे. तुमची भूमिका नेमकी काय?’ त्यावर राऊत म्हणाले, ‘आपले भांडण आहे कुठे? काही मुद्यांवर मतभेद असलेच तर ते सोडवण्याचा फॉर्म्युला काय? ते तुम्हीच सांगा’. त्यावर शहा म्हणाले, ‘बाकीचे आपण नंतर पाहू, तूर्त उपसभापती पदाची महत्वाची निवडणूक आहे.’ राऊत त्यावर तत्परतेने म्हणाले ‘महाराष्ट्रातला मराठी उमेदवार जर मैदानात असेल तर शिवसेना त्याच्या बाजूने ठामपणे उभी राहिल याचे कारण आमची परंपरागत भूमिका तीच आहे’. यावेळी मागे बसलेल्या थावरचंद गहलोतांच्या समोरच्या माईकमुळे हे संभाषण अन्य सदस्यांनाही ऐकू येत होते. गहलोतांनी तसे दोघांना सांगितलेही. दरम्यान राऊतांचे उत्तर ऐकल्यावर शहा अस्वस्थ झालेले दिसले.>उपसभापती पदासाठी काँग्रेसचे बी. के. हरिप्रसादराज्यसभेच्या उपसभापती पदाची ९ आॅगस्टला होणारी निवडणूक सत्ताधारी आघाडीबरोबरच विरोधकांच्या एकजुटीचीही एकप्रकारे लिटमस टेस्टच आहे. रालोआतर्फे जद (यु)चे हरिवंश नारायण प्रसाद, तर विरोधकांतर्फे काँग्रेसचे बी. के. हरिप्रसाद अशी सरळ लढत आहे. गुप्त मतदान नसल्याने कोणता पक्ष कोणाच्या बाजूने आहे, हे गुरुवारी स्पष्ट होणार आहे.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतAmit Shahअमित शाह