शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान-सौदी अरेबियात डील, भारताची पहिली प्रतिक्रिया; "आम्ही देशहिताचं रक्षण करण्यासाठी..."
2
कर्नाटकमध्ये मतचोरीचा डाव काँग्रेसवरच उलटला, आमदार संशायाच्या भोवऱ्यात, हायकोर्टाने निकाल रद्द केला
3
दीड कोटींच्या जमिनीवर सगळ्यांचा डोळा; सावत्र भावांनी कट रचला, ८ लाख दिले तरी प्लॅन कसा फसला?
4
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
5
फक्त ५००० रुपयांच्या कर्जातून उभारले १३,५०० कोटींचे साम्राज्य! तुमच्या घरातही वापरली जाते 'ही' वस्तू
6
BAN vs AFG Live Streaming : अफगाणिस्तानसमोर मोठं चॅलेंज! लढत श्रीलंकेविरुद्ध अन् चितपट करायचंय बांगलादेशला! जाणून घ्या समीकरण
7
महामार्गावर अचानक भूस्खलन, पळाले म्हणून थोडक्यात वाचले भाजप खासदार; व्हिडीओ केला शेअर
8
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
9
पहिल्याच प्रयत्नात नीरज पोहोचला अंतिम फेरीत; जागतिक अजिंक्यपद : सचिन यादवही ठरला पात्र
10
तासाभराचं नाट्य, बहिष्काराची धमकी, ६ ईमेल आणि..., पाकिस्तान असा आला वठणीवर, त्या बैठकीत काय घडलं?
11
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
12
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
13
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी
14
Share Market: US Fed च्या निर्णयानंतर देशांतर्गत शेअर बाजारात मोठी तेजी, सेन्सेक्स ३०० अंकांनी वधारला; 'या' शेअर्समध्ये तेजी
15
पुतण्या तलावात बुडाला, वाचवण्यासाठी चुलतीसह भावाची पाण्यात उडी, शेवट भयंकर!
16
१२ वर्षांच्या संसाराची काडीमोड! लोकप्रिय टीव्ही अभिनेत्याचा घटस्फोट, बायकोशी असलेलं नातं मोडलं
17
Crime: ट्यूशनसाठी गेली, नंतर तुकड्या-तुकड्यांमध्ये मिळाला मुलीचा मृतदेह; आईवडिलांचा आक्रोश, शिक्षकानेच...
18
पितृपक्ष २०२५: स्वतःचे आणि कुटुंबाचे पिंडदान केल्यावरच नागा साधू बनता येते; सविस्तर वाचा
19
आईकडे संपत्ती नसली, तरीही मुलांच्या संगोपनाचा तिला हक्क; जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचा निर्णय
20
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर

रेल्वेसेवा कधीपर्यंत बंद राहणार?; रेल्वे खात्याने दिले स्पष्ट संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2020 15:27 IST

अडकलेल्या मजुरांना रेल्वेने विशेष ट्रेन चालवत त्यांच्या गावी पोहोचविलेले आहे. यामुळे देशात ट्रेन कधी सुरु होतील याकडेच साऱ्यांचे लक्ष लागले आहे. अशात ट्रेन सुरु होण्यासाठी मोठा कालावधी लागण्याची शक्यता आहे. 

भारतीय रेल्वेने प्रवाशांना मोठा दिलासा दिला आहे. रेल्वेने 14 एप्रिल किंवा त्यापूर्वी आरक्षित केलेली नियमित ट्रेनच्या रद्द केलेल्या तिकिटांचा संपूर्ण पैसा प्रवाशांना परत करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच 14 एप्रिल 2020 किंवा त्या आधी 120 दिवस ट्रेनचे तिकिट बुक केले असेल आणि त्याची ट्रेन रद्द झाली असेल तर तिकिटाचे पैसे परत केले जाणार आहेत. रेल्वेच्या निर्णयामुळे भविष्यात रेल्वेसेवा कधीपर्यंत बंद राहिल याचेही संकेत देण्यात आले आहेत.  

 रेल्वे मंत्रालयाने सर्व झोनला एक पत्र पाठविले आहे. याबाबतचे वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिले असून या पत्रानुसार संकेत मिळत आहेत की, 15 ऑगस्टच्या आधी ट्रेन सुरु होणार नाहीत. कोरोनामुळे जवळपास तीन महिन्यांपासून सामान्य ट्रेनची वाहतूक बंद आहे. सध्यातरी देशातील कोरोनाची स्थिती सामान्य होण्याची शक्यता नाही. अडकलेल्या मजुरांना रेल्वेने विशेष ट्रेन चालवत त्यांच्या गावी पोहोचविलेले आहे. यामुळे देशात ट्रेन कधी सुरु होतील याकडेच साऱ्यांचे लक्ष लागले आहे. अशात ट्रेन सुरु होण्यासाठी मोठा कालावधी लागण्याची शक्यता आहे. 

आयआरसीटीसीने प्रवाशांना त्यांचे तिकिट रद्द न करण्याचे आवाहन केले आहे. आयआरसीटीसीनुसार रेल्वे जेव्हा ट्रेनच रद्द करेल तेव्हा आपोआपच तिकिटे रद्द होतील आणि त्याचा रिफंड प्रवाशांना दिला जाईल. ऑनलाईन तिकिट बुक केलेल्यांसाठी ही सूचना देण्यात आली आहे.

230 ट्रेन सुरुच राहणारकोरोना व्हायरसमुळे रेल्वेने 15 एप्रिलपासून नियमित ट्रेनचे बुकिंग बंद केले होते. यामुळे पुढे बुकिग करता आले नाही. यानंतर केंद्राच्या सुचनेनुसार मे महिन्यापासून अडकलेल्या मजुरांना त्यांच्या गावी पोहोचविण्यासाठी रेल्वेने 230 विशेष रेल्वे सुरु केल्या होत्या. त्या पुढेही सुरुच राहणार आहेत. 

रेल्वेच्या कमाईत ५८ टक्के घटकाटकसरीच्या उपायातहत रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांचा नवीन भरती न करण्याचा, तसेच माध्यमातून कंत्राटाने करता येणारी कामे सीएसआरच्या (कंपनी सामाजिक जबाबदारी) माध्यमातून करण्याचा आणि मनुष्यबळ तर्कसंगत करण्याचा इरादा आहे. रेल्वेमंत्र्यांच्या निर्देशांत वित्तीय आयुक्तांना १९ जून रोजी रेल्वे विभागाच्या सर्व सरव्यवस्थापकांना मेअखेर मागील वर्षाच्या तुलनेत रेल्वेच्या कमाईत ५८ टक्के घट झाली आहे. त्यामुळे नियंत्रित खर्च करून उत्पन्न वाढविण्याचे नवे मार्ग शोधावे लागतील, असे कळविले आहे. सोबत त्यांनी रेल्वेच्या सर्व विभागांना कंत्राटाचा फेरविचार करण्याचे आणि विजेचा वापर कमी करण्यास सांगितले आहे, तसेच सुरक्षेशी संबंधित पदे वगळता नवीन पद निर्मिती केली जाणार नाही, तसेच सर्व संचिकांचे काम डिजिटल पद्धतीने करण्याचा आणि सर्व पत्रव्यवहार सुरक्षित ई-मेलच्या माध्यमातून करण्याचा सल्लाही दिला आहे.या आधी मोदी सरकारने २०२०-२१ दरम्यान सर्व अधिकाऱ्यांचे परदेशातील नियोजित प्रशिक्षण स्थगित केले होते, तसेच अपवादात्मक स्थितील आवश्यक परदेशी प्रशिक्षणाला मुभा दिली जाईल; परंतु यासाठी कार्मिक अािण प्रशिक्षण विभागाची पूर्वपरवानगी घ्यावी लागेल, असे १५ जून रोजीच्या आदेशात म्हटले आहे.

अन्य महत्वाच्य़ा बातम्या...

"रामदेव बाबांना नोबेल द्या"! ट्विटरवर 'कोरोनिल'वरून गट 'सक्रीय'

'हे तर टोपी नसलेले तबलिगी'; जगन्नाथ रथयात्रेवरून मोदींच्या खास मित्राचे वादग्रस्त विधान

"नेपाळला संकटात खायला घातले, आता आम्हालाच डसला"; बिहारचे नागरिक संतप्त

4000 कोटींचा पाँझी घोटाळा दडपला; IAS विजय शंकर यांचा घरातच मृतदेह सापडला

India China FaceOff: पुन्हा डोकलाम? लडाखमध्ये फेल झालेल्या चीनचा नवा डाव; भूतानला जाळ्यात ओढणार

न भूतो! पहिल्यांदाच पेट्रोलपेक्षा डिझेल महागले; राजधानीत विक्रम

 

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेcorona virusकोरोना वायरस बातम्या