शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
2
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
3
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
4
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
5
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
6
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
7
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
8
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
9
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
10
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
11
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
12
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
13
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
14
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
15
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
16
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
17
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
18
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
19
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
20
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'

ऑपरेशन सिंदूर ऐन बहरात असताना अचानक युद्धविराम कसा काय झाला? CDS अनिल चौहान यांनी सांगितलं नेमकं कारण  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2025 13:28 IST

India Pakistan Ceasefire: ऑपरेशन सिंदूरदरम्यान, टोकाचा संघर्ष सुरू झाला असतानाच १० मे रोजी संध्याकाळी अचानक युद्धविरामाची घोषणा झाली होती. त्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. एवढ्या लवकर आणि अचानक युद्धविराम कसा काय झाला, असा सवाल लोकांच्या मनात आला होता. दरम्यान, युद्धविरामाला २० दिवस पूर्ण झाल्यानंतर आता या प्रश्नाचं उत्तर मिळालं आहे.

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला भारतानेऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त करत प्रत्युत्तर दिलं होतं. त्यानंतर पाकिस्ताननेभारतावर प्रतिहल्ला करण्याचा प्रयत्न केल्यावर भारतीय सैन्यदलांनी पाकिस्तानमधील हवाई तळांवर हल्ला करत त्यांचं जबर नुकसान केलं होतं. दोन्ही देशांमध्ये टोकाचा संघर्ष सुरू झाला असतानाच १० मे रोजी संध्याकाळी अचानक युद्धविरामाची घोषणा झाली होती. त्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. एवढ्या लवकर आणि अचानक युद्धविराम कसा काय झाला, असा सवाल लोकांच्या मनात आला होता. दरम्यान, युद्धविरामाला २० दिवस पूर्ण झाल्यानंतर आता या प्रश्नाचं उत्तर मिळालं आहे.

भारताचे चिफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) जनरल अनिल चौहान यांनी शनिवारी सिंगापूर येथील शांगरी-ला डायलॉगमध्ये याचं नेमकं कारण सांगितलं. ते म्हणाले की, भारताने आपल्या रणनीतीनुसार हे पाऊल उचललं आहे. भारताने तीन दिवसांमध्येच आपले सर्व लक्ष्य साध्य केले होते. त्यामुळे लष्करी कारवाई थांबवणे ही योग्य रणनीती होती.

सीडीएस जनरल अनिल चौहान पुढे म्हणाले की, भारताने या संपूर्ण मोहिमेदरम्यान, पूर्णपणे स्पष्टता आणि स्वायत्ततेसोबत काम केलं. त्यांनी सांगितलं की, भारताने १९४७ मध्ये मिळालेल्या स्वातंत्र्यानंतर दीर्घ धोरण अवलंबलं होतं. त्यावेळी पाकिस्तान प्रत्येक बाबतीत भारताच्या पुढे होता. मात्र आज भारत आर्थिक, सामाजिक आणि मानव विकासाच्या बाबतीत पाकिस्तानपेक्षा खूप पुढे गेला आहे. हा धोरणात्मकतेचाच परिणाम आहे.

जनरल चौधरी पुढे म्हणाले की, भारताने पाकिस्तानसोबतचे संबंध सुधारण्याचा प्रयत्न केला होता. २०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवाज शरीफ यांना शपथविधीसाठी बोलावलं होतं. मात्र पाकिस्तानकडून बदल्यात केवळ शत्रुत्वच मिळालं. त्यामुळे आता पाकिस्तानपासून योग्य अंतर राखणं हेच योग्य धोरण ठरेल, असेही त्यांनी सांगितले.दरम्यान, शस्त्रसंधीनंतरही भारत सतर्क आहे. तसेच पाकिस्तानने पुन्हा काही आगळीक केली, तर कठोर प्रत्युत्तर दिलं जाईल, असं लष्कराने स्पष्ट केलं आहे. ऑपरेशन सिंदूरने भारताची ताकद दाखवली आहे. तसेच दहशतवादाविरोधात भारत आता गप्प बसणार नाही, हेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

भारताने ऑपरेशन सिंदूर राबवल्यानंतर पाकिस्ताननेही हल्ले करण्याचा प्रयत्न केला होता. पाकिस्तानने ७ ते १० मे दरम्यान, नियंत्रण रेषेवर मोठ्या प्रमाणात गोळीबार केला होता. या गोळीबारात १५ भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला होता. तर एका जवानाला वीरमरण आले होते. त्यानंतर भारतानेही प्रत्युत्तरदाखल कारवाई केली होती. १० मे रोजी सकाळी भारतीय हवाई दलाने ब्राह्मोस क्षेपणास्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात पाकिस्तानमधील नूर खान-चकलाला विमानतळाला लक्ष्य केले होते. त्यात नूर खान-चकलाला विमानतळाचं जबर नुकसान झालं होतं. हा विमानतळ पाकिस्तानची राजधानी असलेल्या रावळपिंडीजवळ असल्याने या हल्ल्याने पाकिस्तानचे अवसान गळाले होते. तसेच त्यांनी युद्धविरामासाठी विनवणी सुरू केली होती. तसेच भारतानेही ही युद्धविरामाची विनवणी स्वीकार केली होती.  

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरIndiaभारतPakistanपाकिस्तान