शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
9
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
10
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
11
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
12
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
13
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
14
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
15
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
16
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
17
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
18
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
19
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
20
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  

पाच वर्षात नेते कोट्याधीश कसे काय झाले ? सर्वोच्च न्यायालयाला पडला प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2017 10:25 IST

आमदार आणि खासदार झाल्यानंतर नेत्यांच्या संपत्तीत होणा-या भरमसाट वाढीवरुन सर्वोच्च न्यायालयाने कडक भूमिका घेतली आहे.

नवी दिल्ली, दि. 7 - आमदार आणि खासदार झाल्यानंतर नेत्यांच्या संपत्तीत होणा-या भरमसाट वाढीवरुन सर्वोच्च न्यायालयाने कडक भूमिका घेतली आहे. आमदार किंवा खासदार झाल्यानंतर ज्या नेत्यांच्या संपत्तीत आश्चर्यकारक वाढ झाली आहे त्यांच्यावर सर्वोच्च न्यायालयाची नजर पडली आहे. बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला आदेश देत यासंबंधी सविस्तर रिपोर्ट सादर करण्यास सांगितलं आहे. अशा प्रकरणांमध्ये आतापर्यंत काय कारवाई करण्यात आली आणि त्यांचा तपास कुठपर्यंत पोहोचला आहे याची माहिती रिपोर्टमध्ये द्यायची आहे. 

एकूण 289 नेत्यांची नावं यामध्ये सामील आहेत. प्रत्येक राजकीय पक्षामधील कोणी ना कोणीतरी या यादीमध्ये आहे. विशेष म्हणजे काही प्रकरणे तर अशी आहेत, जिथे नेत्यांची संपत्ती गेल्या पाच वर्षात तब्बल 500 टक्क्यांनी वाढली आहे. नेत्यांची वाढती संपत्ती हा नेहमीच वादाचा विषय राहिला आहे. मात्र काही खासदारांनी तर्क लावला आहे की, त्यांच्या संपत्तीचं मूल्यमापन वर्तमान बाजारभावाने केलं जात. शिवाय आपल्या व्यवसायातून ही संपत्ती निर्माण केली आहे असाही दावा नेते करतात. न्यायालयाने मात्र सर्व स्तरांवर आणि प्रत्येक गोष्टीचा तपास झाला पाहिजे असं स्पष्ट सांगितलं आहे. यामुळे नेत्यांची वाढलेली संपत्ती कायदेशीर आहे का याचीही पडताळणी होईल. 

न्यायाधीश डे चेलामेश्वर आणि न्यायाधीश एस अब्दुल नजीर यांच्या खंडपीठाने सांगितलं आहे की, 'याप्रकरणी संपत्तीचे स्त्रोत काय आहेत याचा तपास होणं गरजेचं आहे. सोबतच संपत्तीचं जे आकलन करण्यात आलं आहे ते कितपत कायदेशीर आणि योग्य आहे याची माहिती मिळवणंही महत्वाचं आहे'. 

सर्वोच्च न्यायालयात एका एनजीओने याचिका दाखल केली होती. याचिकेवरील सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने हे आदेश दिले आहेत. एनजीओने न्यायालयात विनंती केली आहे की, निवडणुकीदरम्यान प्रतिज्ञापत्रात उत्पन्नाचा स्त्रोत सांगणारा एक कॉलम असावा जेणेकरुन निवडणूक लढणा-या उमेदवाराच्या उत्पन्न स्त्रोताची माहिती मिळावी.

याप्रकरणी केंद्र सरकारची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकिल के राधाकृष्णन यांनी न्यायालयात सांगितलं की, 'अशा प्रकरणांमध्ये सामील असणारे जे लोक निवडणूक लढत आहेत त्यांची चौकशी सुरु आहे'. न्यायालयाने यासंबंधी प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा आदेश केंद्र सरकारला दिला आहे.  

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयMLAआमदार