शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
5
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
6
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
7
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
8
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
9
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
10
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
11
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
12
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
13
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
14
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
15
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
16
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
17
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
18
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
19
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
20
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Politics : लोकसंख्येपेक्षा मतदार जास्त कसे? विरोधकांच्या प्रश्नाला अजितदादा गटाच्या प्रवक्त्याने दिले उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2025 16:30 IST

Supriya Sule vs Ajit Pawar : दिल्ली निवडणुकीत पराभव डोळ्यासमोर दिसत असल्याने शिळ्या कढीला ऊत आणण्याचा प्रयत्न सुरु असल्याचाही केला आरोप

Supriya Sule vs Ajit Pawar : राज्यातील विधानसभा निवडणूक झाल्यानंतर चार महिन्यांपेक्षा जास्त कालावधी उलटला आहे. मात्र अजूनही विरोधकांकडून या निकालावर संशय व्यक्त केला जात आहे. आज काँग्रेस खासदार राहुल गांधी, उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. त्यात, ईव्हीएममध्ये फेरफार झाल्याचा पुन्हा एकदा आरोप केला. "आम्हाला निवडणूक आयोगाने लोकसभा आणि विधानसभेची मतदार यादी द्यावी. नाव, पत्ता आणि फोटोग्राफसह द्यावी," अशा आशयाची मागणी करणारी संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात आली. या आरोपांना राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने प्रत्युत्तर दिले. "दिल्ली निवडणूकीत काँग्रेसला पराभव डोळ्यासमोर दिसत असल्यानेच पुन्हा एकदा शिळया कढीला ऊत आणण्याचा प्रयत्न सुरु आहे," अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसअजित पवार गटाचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनी टीका केली.

लोकसभेनंतर मतदार यादी सदोष नव्हती का?

"लोकसभेच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रात ३१ खासदार निवडून आल्यानंतर कधीही मतदारयादी सदोष आहे अशाप्रकारची पत्रकार परिषद घेतली नव्हती. २०१९ च्या विधानसभेनंतर २०२४ च्या लोकसभेपर्यंत ३२ लाखच मतदार मतदारयादीत वाढले. आणि लोकसभेनंतर विधानसभेपर्यंत ३९ लाख मतदार वाढल्याचा आरोप केलात. पण लोकसभेनंतर मतदार नोंदणीसाठी प्रत्येक राजकीय पक्ष आणि ज्यांना-ज्यांना विधानसभा लढायची आहे, तो प्रत्येक कार्यकर्ता कामाला लागला व नवीन मतदारांची नोंदणी केली. त्यात काँग्रेसही मागे नव्हती. वाढलेले मतदान हे लोकसभेनंतर विधानसभेला वाढत असते याची जाणीव ठेवा," असे आनंद परांजपे यांनी सुनावले.

लोकसंख्येपेक्षा मतदार जास्त कसे?

लोकसंख्येपेक्षा मतदार जास्त आहेत असा आरोप पत्रकार परिषदेत करण्यात आला. त्यावर बोलताना ते म्हणाले, "कोविडमुळे २०२० मध्ये जनगणना झाली नाही. त्यामुळे मतदार आकडेवारीमध्ये तफावत असू शकते. लोकसभेला जी मतदान केंद्रे होती, त्यापेक्षा जास्त २५-३० मतदानकेंद्रे निवडणूक आयोगाने अधिक वाढवली होती. महाराष्ट्रातील शहरी भागात मतदान केंद्रे वाढवण्यात आली होती. त्यामुळे मतदारांची यादी देखील वाढली हे स्पष्ट होते," असेही आनंद परांजपे यांनी सांगितले.

दरम्यान, महाराष्ट्रात लोकसभेनंतर मिळालेल्या यशानंतर मतदार यादीबद्दल किंवा ईव्हीएमबद्दल कधीही काँग्रेसने किंवा त्यांच्या घटक पक्षाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले नाही याबद्दलही आनंद परांजपे यांनी काँग्रेसला फटकारले.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारSupriya Suleसुप्रिया सुळेRahul Gandhiराहुल गांधीSanjay Rautसंजय राऊत