शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

महाराष्ट्र किती मोठा आहे, कल्पना आहे का?; सर्वोच्च न्यायालयाने सुनावले खडे बोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2020 07:21 IST

राष्ट्रपती राजवट लागू करण्याबद्दलची याचिका फेटाळली

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील कायदा-सुव्यवस्थेची स्थिती बिघडली असून त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे महाविकास आघाडी सरकार बरखास्त करावे व तेथे राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळली. या वेळी याचिकाकर्त्यांना खडे बोल सुनावताना सरन्यायाधीश बोबडे म्हणाले की, तुम्ही याचिकेत उल्लेख केलेले प्रसंग मुंबईत घडले आहेत. मुंबई म्हणजे सर्व महाराष्ट्र असे समजू नका. महाराष्ट्र किती मोठा आहे याची कल्पना आहे का?

दिल्लीतील वकील ऋषभ जैन, गौतम शर्मा व सामाजिक कार्यकर्ते विक्रम गेहलोत या तिघांनी मिळून ही जनहित याचिका सादर केली होती. सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या नेतृत्वाखालील व न्या. ए. एस. बोपण्णा, न्या. व्ही. रामासुब्रमणियन यांचा समावेश असलेल्या खंडपीठापुढे या याचिकेची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी झाली.

मुंबईत अभिनेता सुशांतसिंह राजपूत याने केलेली आत्महत्या, मुंबई महापालिकेने अभिनेत्री कंगना रनौत हिच्या बंगल्यातील काही बांधकाम पाडल्याचा प्रकार, माजी नौदल अधिकारी मदनलाल शर्मा यांना झालेली मारहाण आदी घटनांचा उल्लेख या याचिकेत करण्यात आला होता. या घटनांवरून महाराष्ट्रातील कायदा-सुव्यवस्थेची स्थिती बिघडली असल्याचे सिद्ध होते, असेही याचिकेत म्हटले होते.तुम्ही राष्ट्रपतींकडे जाण्यास मोकळे आहात ही याचिका फेटाळताना सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी याचिकाकर्त्यांना खडे बोल सुनावले. बोबडे म्हणाले की, महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावू नका. या मागणीसाठी तुम्ही राष्ट्रपतींकडे जाण्यास मोकळे आहात.केवळ काही उदाहरणांवर विसंबू नकाबॉलीवूडचे काही अभिनेते मरण पावले. अशा काही उदाहरणांवर विसंबून महाराष्ट्रात राज्यघटनेनुसार कारभार होत नसल्याचा निष्कर्ष तुम्ही कसा काय काढला, असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना केला. या याचिकेत म्हटले होते की, कायदा हातात घेण्याचे प्रकार महाराष्ट्रात झाले आहेत.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयbollywoodबॉलिवूड