शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

कारमधून रिल्स बनवण्याच्या नादात भीषण अपघात, भजन गायिकेसह २ महिलांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2023 12:43 IST

मिळालेल्या माहितीनुसार, अंजू, शशी आणि त्यांची आणखी एक सहकारी महिला सेक्टर ६ येथील साई मंदिरात आरतीसाठी गेल्या होत्या.

हरयाणा - राज्याच्या करनाल जिल्ह्यातील सेक्टर ६ ग्रीन बेल्ट येथे फिरण्यास गेलेल्या ३ महिलांपैकी दोघींचा कारअपघातात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. कारने धडक दिल्याने अपघातातमहिला जागीच ठार झाली, दुसऱ्या महिलेनं रुग्णालयात उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. तर, तिसरी महिला या अपघातात किरकोळ जखमी झाली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असून मृत महिलांचे पार्थिव शवविच्छेदनासाठी करनालच्या मर्चरी हाऊस येथे ठेवण्यात आले आहेत. पोलिसांकडून घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अंजू, शशी आणि त्यांची आणखी एक सहकारी महिला सेक्टर ६ येथील साई मंदिरात आरतीसाठी गेल्या होत्या. आरतीनंतर या महिला जवळ फिरण्यासाठी जात असताना जोराच्या वेगात आलेल्या कारने या तिन्ही महिलांना उडवले. त्यामध्ये, अंजू आणि शशी यांचा मृत्यू झाला असून एक महिला किरकोळ जखमी आहे. या दुर्घटनेनंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांचा रोष पाहताच कारचालकाने गाडी तिथेच सोडून धूम ठोकली. कारमध्ये काहीजण मोबाईल रिल्स बनवत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली. 

दरम्यान, या अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर, गंभीर जखमी महिलांना कल्पना चावला मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. जेथे डॉक्टरांनी अंजू साई यांना मृत घोषित केले, तर शशी यांनीही उपचारादरम्यान जीव सोडला. या तिन्ही महिला दररोज मंदिर जात होत्या. त्यापैकी मृत्यु झालेल्या अंजू या भजन गायिका होत्या, अशी माहिती स्थानिकांनी दिली. या घटनेनंतर करनाल शहरावर शोककळा पसरली आहे.   

 

टॅग्स :carकारAccidentअपघातWomenमहिलाhospitalहॉस्पिटल