शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
2
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
3
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
4
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
6
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
7
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
8
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
9
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
10
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
11
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
12
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
13
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
14
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
15
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
16
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
17
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
18
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
19
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
20
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस

भाजपाला आंध्रात विस्ताराची आशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 01:48 IST

तेलुगू देसमच्या दोन मंत्र्यांनी मोदी सरकारचा राजीनामा दिल्याचे भाजपाला फारसे दु:ख दिसत नसून, ही इष्टापत्तीच वाटत आहे. आंध्र प्रदेशमध्ये पक्षाचा विस्तार करता येईल, असेच भाजपाला वाटत आहे.

नवी दिल्ली - तेलुगू देसमच्या दोन मंत्र्यांनी मोदी सरकारचा राजीनामा दिल्याचे भाजपाला फारसे दु:ख दिसत नसून, ही इष्टापत्तीच वाटत आहे. आंध्र प्रदेशमध्ये पक्षाचा विस्तार करता येईल, असेच भाजपाला वाटत आहे.आंध्र प्रदेश भाजपाचे अध्यक्ष के. हरि बाबू म्हणाले की, तेलुगू देसम वेगळी वाट धरेल, हे ध्यानात आले होते. आम्ही स्वतंत्रपणे लढलो तर भाजपाच्या जागा वाढूही शकतील. निवडणुकांत दोघांनी मिळून लोकसभेच्या २५पैकी १७ जागा तर विधानसभेच्या १७५ जागांपैकी १०६ जागा जिंकल्या होत्या. लोकसभेत भाजपाला ७ तर विधानसभेत २ टक्के मते मिळाली होती.राजीनामे स्वीकारले : तेलुगू देसम पार्टीचे खासदार अशोक गजपती राजू व वाय. एस. चौधरी यांच्या मंत्रिपदाचे राजीनामे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शुक्रवारी स्वीकारले. मोदी सरकारमध्ये राजू हे नागरी उड्डयन मंत्री तर, चौधरी हे विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे मंत्री होते. नागरी विमान मंत्रालयाचे काम पंतप्रधान पाहतील.मोदींच्या फोनमुळेच रालोआमध्ये टीडीपी- हरिश गुप्तानवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंध्रचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना फोन केल्याने तेलुगू देसमने रालोआतून बाहेर पडण्याचा निर्णय टाळला, असे समजते.तेलुगू देसमच्या दोन मंत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतर राजीनामे मागे घ्यावेत, अशी विनंती मोदी यांनी नायडूंना केली. त्यावर आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्यासंदर्भात तसेच जी इतर आश्वासने देण्यात आली ती पूर्ण होण्याची आम्ही चार वर्षे वाट पाहिली. पण त्या दिशेने काही न झाल्याने आता माझ्या पक्षाच्या मंत्र्यांनी राजीनामे दिले असून ते मागे घेता येणार नाहीत, असे नायडू म्हणाले. मात्र आंध्र प्रदेशसाठी काही पावले उचलण्याचे आश्वासन दिल्यानंतर चंद्राबाबू नायडू यांचा रालोआतून बाहेर पडण्याचा विचार बदलला. मंत्र्यांच्या राजीनाम्यापुरताच असंतोषाचा आवाका त्यांनी मर्यादित ठेवला.

टॅग्स :BJPभाजपाAndhra Pradeshआंध्र प्रदेशPoliticsराजकारण