शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
2
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
3
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
4
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
5
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
6
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
7
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
8
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
9
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
10
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
11
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
12
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
13
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
14
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
15
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
16
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
17
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
18
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
19
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस

भाजपाला आंध्रात विस्ताराची आशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 01:48 IST

तेलुगू देसमच्या दोन मंत्र्यांनी मोदी सरकारचा राजीनामा दिल्याचे भाजपाला फारसे दु:ख दिसत नसून, ही इष्टापत्तीच वाटत आहे. आंध्र प्रदेशमध्ये पक्षाचा विस्तार करता येईल, असेच भाजपाला वाटत आहे.

नवी दिल्ली - तेलुगू देसमच्या दोन मंत्र्यांनी मोदी सरकारचा राजीनामा दिल्याचे भाजपाला फारसे दु:ख दिसत नसून, ही इष्टापत्तीच वाटत आहे. आंध्र प्रदेशमध्ये पक्षाचा विस्तार करता येईल, असेच भाजपाला वाटत आहे.आंध्र प्रदेश भाजपाचे अध्यक्ष के. हरि बाबू म्हणाले की, तेलुगू देसम वेगळी वाट धरेल, हे ध्यानात आले होते. आम्ही स्वतंत्रपणे लढलो तर भाजपाच्या जागा वाढूही शकतील. निवडणुकांत दोघांनी मिळून लोकसभेच्या २५पैकी १७ जागा तर विधानसभेच्या १७५ जागांपैकी १०६ जागा जिंकल्या होत्या. लोकसभेत भाजपाला ७ तर विधानसभेत २ टक्के मते मिळाली होती.राजीनामे स्वीकारले : तेलुगू देसम पार्टीचे खासदार अशोक गजपती राजू व वाय. एस. चौधरी यांच्या मंत्रिपदाचे राजीनामे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शुक्रवारी स्वीकारले. मोदी सरकारमध्ये राजू हे नागरी उड्डयन मंत्री तर, चौधरी हे विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे मंत्री होते. नागरी विमान मंत्रालयाचे काम पंतप्रधान पाहतील.मोदींच्या फोनमुळेच रालोआमध्ये टीडीपी- हरिश गुप्तानवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंध्रचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना फोन केल्याने तेलुगू देसमने रालोआतून बाहेर पडण्याचा निर्णय टाळला, असे समजते.तेलुगू देसमच्या दोन मंत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतर राजीनामे मागे घ्यावेत, अशी विनंती मोदी यांनी नायडूंना केली. त्यावर आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्यासंदर्भात तसेच जी इतर आश्वासने देण्यात आली ती पूर्ण होण्याची आम्ही चार वर्षे वाट पाहिली. पण त्या दिशेने काही न झाल्याने आता माझ्या पक्षाच्या मंत्र्यांनी राजीनामे दिले असून ते मागे घेता येणार नाहीत, असे नायडू म्हणाले. मात्र आंध्र प्रदेशसाठी काही पावले उचलण्याचे आश्वासन दिल्यानंतर चंद्राबाबू नायडू यांचा रालोआतून बाहेर पडण्याचा विचार बदलला. मंत्र्यांच्या राजीनाम्यापुरताच असंतोषाचा आवाका त्यांनी मर्यादित ठेवला.

टॅग्स :BJPभाजपाAndhra Pradeshआंध्र प्रदेशPoliticsराजकारण