शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
3
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
4
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
5
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
6
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
7
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
8
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
9
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
10
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
11
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
12
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
13
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
14
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
15
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
16
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
17
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
18
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
19
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
20
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाला आंध्रात विस्ताराची आशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 01:48 IST

तेलुगू देसमच्या दोन मंत्र्यांनी मोदी सरकारचा राजीनामा दिल्याचे भाजपाला फारसे दु:ख दिसत नसून, ही इष्टापत्तीच वाटत आहे. आंध्र प्रदेशमध्ये पक्षाचा विस्तार करता येईल, असेच भाजपाला वाटत आहे.

नवी दिल्ली - तेलुगू देसमच्या दोन मंत्र्यांनी मोदी सरकारचा राजीनामा दिल्याचे भाजपाला फारसे दु:ख दिसत नसून, ही इष्टापत्तीच वाटत आहे. आंध्र प्रदेशमध्ये पक्षाचा विस्तार करता येईल, असेच भाजपाला वाटत आहे.आंध्र प्रदेश भाजपाचे अध्यक्ष के. हरि बाबू म्हणाले की, तेलुगू देसम वेगळी वाट धरेल, हे ध्यानात आले होते. आम्ही स्वतंत्रपणे लढलो तर भाजपाच्या जागा वाढूही शकतील. निवडणुकांत दोघांनी मिळून लोकसभेच्या २५पैकी १७ जागा तर विधानसभेच्या १७५ जागांपैकी १०६ जागा जिंकल्या होत्या. लोकसभेत भाजपाला ७ तर विधानसभेत २ टक्के मते मिळाली होती.राजीनामे स्वीकारले : तेलुगू देसम पार्टीचे खासदार अशोक गजपती राजू व वाय. एस. चौधरी यांच्या मंत्रिपदाचे राजीनामे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शुक्रवारी स्वीकारले. मोदी सरकारमध्ये राजू हे नागरी उड्डयन मंत्री तर, चौधरी हे विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे मंत्री होते. नागरी विमान मंत्रालयाचे काम पंतप्रधान पाहतील.मोदींच्या फोनमुळेच रालोआमध्ये टीडीपी- हरिश गुप्तानवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंध्रचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना फोन केल्याने तेलुगू देसमने रालोआतून बाहेर पडण्याचा निर्णय टाळला, असे समजते.तेलुगू देसमच्या दोन मंत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतर राजीनामे मागे घ्यावेत, अशी विनंती मोदी यांनी नायडूंना केली. त्यावर आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्यासंदर्भात तसेच जी इतर आश्वासने देण्यात आली ती पूर्ण होण्याची आम्ही चार वर्षे वाट पाहिली. पण त्या दिशेने काही न झाल्याने आता माझ्या पक्षाच्या मंत्र्यांनी राजीनामे दिले असून ते मागे घेता येणार नाहीत, असे नायडू म्हणाले. मात्र आंध्र प्रदेशसाठी काही पावले उचलण्याचे आश्वासन दिल्यानंतर चंद्राबाबू नायडू यांचा रालोआतून बाहेर पडण्याचा विचार बदलला. मंत्र्यांच्या राजीनाम्यापुरताच असंतोषाचा आवाका त्यांनी मर्यादित ठेवला.

टॅग्स :BJPभाजपाAndhra Pradeshआंध्र प्रदेशPoliticsराजकारण