शहरं
Join us  
Trending Stories
1
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
2
बंगालच्या उपसागरात १६ दिवस चिनी जहाज लपून बसलेले; ओळख सांगणारी यंत्रणा चालू-बंद करत होते...
3
आजचे राशीभविष्य, १४ जुलै २०२५: नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल, भविष्यात लाभ होतील
4
इकडे चौकशी सुरू; तिकडे बाळाने मिटले डोळे, अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच रडलेले...
5
संपादकीय: गूढ उकलले की वाढले? एअर इंडियाच्या पायलटांवर संशय, बोईंगला वाचविण्याचे प्रयत्न...
6
पुढील महिन्यापासून संपूर्ण देशात मतदार याद्यांचे सखोल पुनरीक्षण
7
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
8
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
9
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार
10
विधिज्ञ उज्ज्वल निकम, आणखी तिघे राज्यसभेवर; श्रुंगला, सदानंदन, मीनाक्षी जैन यांचाही समावेश
11
बिहारमध्ये गुंडाराज: १३ दिवसांत ३० हत्या; नेते, अधिकाऱ्यांनाही सोडले नाही
12
उत्तर कोरियाच्या विरोधात जाऊ नका, रशियाचा अमेरिका-जपानला इशारा
13
शनैश्वर बनावट ॲप तयार करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल
14
छत्रपतींच्या किल्ल्यांकडे पाहण्याची नजर आता बदलेल?
15
आंदोलने मजेसाठी नसतात, लोकांचे हक्क महत्वाचे; मद्रास हायकोर्ट : पक्षाची मनमानी चालू शकत नाही
16
‘सुंदर’ फिरकीने भारताचा ‘रूट’ मोकळा; भारताला विजयासाठी १९३ धावांचे लक्ष्य
17
भारताचा पराभव, पण मालिका ३-२ ने जिंकली; शेफाली वर्माची अर्धशतकी खेळी व्यर्थ
18
बाजाराची चाल कंपन्यांचे निकाल ठरवणार; विक्रीचा मारा सुरूच
19
तुमच्यामुळे झाला महाराष्ट्र टॉपर! नागरिकांची यूपीआयला पसंती
20
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर

“सत्तेसाठी नितीश कुमार सोनिया गांधींच्या चरणी गेले, आता भाजपचे दरवाजे बंद”

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2023 14:54 IST

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नितीश कुमार यांच्यावर निशाणा.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शनिवारी बिहार दौऱ्यावर आले होते. त्यांनी बिहारमधील पश्चिम चंपारण जिल्ह्यातील एका जाहीर सभेला संबोधित केलं. “आज मी चंपारणच्या पवित्र भूमीवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. पूर्ण बहुमत असलेलं भाजप सरकारच बिहारला विकास आणि समृद्धीच्या मार्गावर नेऊ शकतं. अजलौरिया, पश्चिम चंपारण येथे आयोजित केलेल्या या विशाल जनसभेला संबोधित करताना खूप आनंद होत आहे,” असं अमित शाह यावेळी म्हणाले. 

“गेल्या विधानसभा निवडणुकीत जनतेनं भाजपला सर्वात मोठा पक्ष बनवलं होतं. डबल इंजिनचं सरकार चांगल्या प्रकारे चालावं, यासाठी आम्ही आमच्या शब्दानुसार नितीश कुमार यांना मुख्यमंत्री बनवलं. परंतु नितीश बाबूंना दर तीन वर्षांनी पंतप्रधान बनण्याचं स्वप्न पडतचं. ते जंगलराजचे प्रणेते लालू प्रसाद यादव यांच्यासह गेले. सत्तेसाठी नितीश कुमार काँग्रेसच्या सोनिया गांधींच्या चरणी गेले. अनेक वर्ष ‘आयाराम गयाराम’ केलं. पण आता भाजपचे दरवाजे तुमच्यासाठी आयुष्यभरासाठी बंद आहेत,” असं अमित शाह म्हणाले. 

सोनिया गांधींच्या चरणी गेले“मी बिहारच्या जनतेला आवाहन करण्यासाठी आलोय, जेदयूआणि आरजेडीची अपवित्र आघाडी पाणी आणि तेलासारखी आहे. यामध्ये जदयू पाणी आमि आरजेडी तेल आहे. हे दोन्ही कधी एकत्र मिसळू शकत नाहीत. नितीश कुमार यांनी बनावट मद्यावरही आपलं तोंड बंद केलंय,” असं ते म्हणाले.

बिहारमध्ये अराजकता“आज संपूर्ण बिहारमध्ये अराजकता निर्माण झाली आहे. गुन्हेगारी पुन्हा डोकं वर काढत आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होतोय. हत्या, अपहरण, बलात्कार, दरोड्यांसारखे गुन्हे वाढू लागलेत. यावेळी असा धडा शिकवा की बिहारमध्ये पक्ष बदलणारे शांत होतील. मोदींच्या नेतृत्वााखाली दोन तृतीयांश बहुमतानं भाजपचं सरकार बनवणं आणि मोदींना पंतप्रधान बनवणं हा यातून मुक्ती मिळवण्याचा मार्ग आहे,” असं अमित शाह यांनी स्पष्ट केलं.

टॅग्स :Amit Shahअमित शाहBiharबिहारNitish Kumarनितीश कुमारNarendra Modiनरेंद्र मोदी