शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
2
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
3
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
4
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
5
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
6
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
7
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
8
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
9
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
10
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
11
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
12
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
13
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
14
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
15
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
16
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
17
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
18
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
19
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
20
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी

'गृहमंत्री' अमित शहा लागले कामाला; जम्मू-काश्मीरचा राजकीय नकाशाच बदलणार? 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2019 7:16 PM

जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभेच्या एकूण 111 जागा आहेत.

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्रालयाचा पदभार स्वीकारल्यानंतर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा कामाला लागले आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीरमध्ये सीमांकन आयोगाची स्थापना करण्याचा विचार गृहमंत्री अमित शहा करत आहेत. त्यामुळे जम्मू-काश्मीरचा राजकीय नकाशाच अमित शहा बदलणार की काय, असा सवाल सध्या उपस्थित होत आहे.

तत्कालीन राज्यपाल जगमोहन यांच्या आदेशानुसार 1995 साली जम्मू-काश्मीरमध्ये 87 जागांचे सीमांकन (फेररचना) करण्यात आले होते. जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभेच्या एकूण 111 जागा आहेत. मात्र, 24 जागा रिक्त ठेवण्यात आल्या आहेत. जम्मू-काश्मीरच्या संविधानमधील सेक्शन 47 नुसार पाकव्याप्त काश्मीरसाठी या 24 जागा रिकामी ठेवण्यात आल्या आहेत. तर बाकीच्या 87 जागांवर निवडणुका घेतल्या जातात. विशेष म्हणजे जम्मू-काश्मीरचे वेगळे संविधान आहे.

जम्मू-काश्मीरच्या संविधानानुसार, दर दहा वर्षानंतर मतदारसंघांचे सीमाकंन केले पाहिजे. यानुसार, जम्मू-काश्मीरमध्ये 2005 मध्ये मतदारसंघांसाठी सीमांकन केले पाहिजे होते. मात्र, फारुक अब्दुल्ला सरकारने 2002 मध्ये याला 2026 पर्यंत थांबविले होते. अब्दुल्ला सरकारने जम्मू-काश्मीर जनप्रतिनिधित्व कायदा, 1957 आणि जम्मू-काश्मीरच्या संविधानात बदल करतेवेळी हा निर्णय घेतला होता.

जाणून घ्या, कशी आहे जम्मू-काश्मीर विधानसभेची संरचना2011 च्या जणगणनेनुसार जम्मू-काश्मीरमध्ये जम्मू विभागातील लोकसंख्या 53,78,538 आहे. ही राज्यातील 42.89 टक्के लोकसंख्या आहेत. तर, जम्मू-काश्मीरचे 25.93 टक्के क्षेत्रफळ जम्मू विभागाच्या अंतर्गत येते. विधासभेसाठी या भागात एकूण 37 जागा आहेत. दुसरीकडे, काश्मीर घाटीत 68,88,475 लोकसंख्या आहे. ही राज्यातील 54.93 टक्के लोकसंख्या आहे. काश्मीर घाटीतून विधानसभेवर एकूण 46 आमदार निवडणूक जातात. याशिवाय, लडाखमध्ये चार जागा आहेत. लडाखमधून चार आमदार निवडले जातात.   

एससी-एसटी आरक्षणसाठी होणार सीमांकन (फेररचना)सुत्रांच्या माहितीनुसार, केंद्र सरकार जम्मू-काश्मीरमध्ये सीमांकन करण्यासाठी प्रयत्नशील आहे. कारण, एससी आणि एसटी समुदायासाठी जागांच्या आरक्षणाची नवीन व्यवस्था लागू करण्यात येईल. घाटीत कोणत्याही जागांवर आरक्षण नाही. मात्र, याठिकाणी 11 टक्के गुर्जर बकरवाल आणि गद्दी जनजाति समुदायाचे लोक आहेत. जम्मू विभागात 7 जागा एससीसाठी आरक्षित आहेत. जागांची अदला-बदली सुद्धा झाली नाही. त्यामुळे जम्मू-काश्मीरमध्ये नवीन सीमांकन केल्यास सामाजिक समीकरणांवर सुद्धा प्रभाव पडण्याची शक्यता आहे.  

टॅग्स :Amit Shahअमित शहाJammu Kashmirजम्मू-काश्मीर