शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

कोरोनावरून जनतेत भ्रम निर्माण करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न, अमित शाह यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2020 20:44 IST

काँग्रेसाध्यक्ष सोनिया गांधी यांनी नुकताच, सरकारवर लॉकडाऊन करण्यापूर्वी कुठल्याही प्रकारचे नियोजन केले नव्हते, यामुळे अनेकांना त्रास सहन करावा लागला, असा आरोप केला होता. हाच धागा पकडत शाह यांनी काँग्रेसवर टीका केली आहे.

ठळक मुद्देकाँग्रेसाध्यक्ष सोनिया गांधींनी लॉकडाऊनपूर्वी सरकारने येग्य नियोजन केले नसल्याचे म्हटले होतेशाह यांनी ट्वट करत काँग्रेसवर आरोप केला आहेकोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी आज सर्व मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला

नवी दिल्ली - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गुरूवारी काँग्रेसवर निषाणा साधला. विरोधी पक्ष कोरोना व्हायरसच्या मुद्यावरून क्षुद्र राजकारण करत आहे. त्यांनी जनतेच्या मनात भ्रम निर्माण करण्यापेक्षा देशाच्या हिताचा विचार करायला हवा, असे शाह यांनी म्हटले आहे.

काँग्रेसाध्यक्षसोनिया गांधी यांनी नुकताच, सरकारवर लॉकडाऊन करण्यापूर्वी कुठल्याही प्रकारचे नियोजन केले नव्हते, यामुळे अनेकांना त्रास सहन करावा लागला, असा आरोप केला होता. हाच धागा पकडत शाह यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. शाह यांनी ट्वट करून केला आरोप -यासंदर्भात गृहमंत्री अमित शाह यांनी ट्विट करत म्हटले आहे, की 'पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या नेतृत्वात कोरोना व्हायरसविरोधातील लढ्याचे देश आणि जागतीक पातळीवर कौतुक होत आहे. 130 कोटी भारतीय कोरोनावर मात करण्यासाठी एकत्र आले आहेत.  असे असतानाही, काँग्रेस क्षुद्र राजकारण करत आहे. त्यांनी देश हिताचा विचार करावा आणि लोकांमध्ये भ्रम निर्माण करणे सोडावे.'

पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांशी साधला संवाद -देशात वाढत असलेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. यावेळी मोदींनी कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून सुरू असलेल्या प्रयत्नांबाबत चर्चा केली. तसेच पंतप्रधानांनी यावेळी काही सल्लेही दिले.

यावेळी मोदींनी देशातील लॉकडाऊनच्या स्थितीविषयी चिंता व्यक्त केली. राज्यांनी जनतेकडून लॉकडाऊनची कठोरपणे पालन करून घ्या, अशी सूचना त्यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना दिली. तसेच लोकांना जीवनावश्यक वस्तूंची टंचाई भासणार नाही याची काळजी राज्यांनी घ्यावी. तसेच ज्या व्यक्तींमध्ये कोरोनाची लक्षणे दिसतील, अशा व्यक्तींना आयसोलेशन वॉर्डमध्ये पाठवावे, तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्यांना क्वारंटईन करावे. क्वारंटाईन वॉर्ड वाढवावे लागले तर वाढवावेत, अशा सूचना यावेळी मोदींनी सर्व मुख्यमंत्र्यांना दिल्या आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAmit Shahअमित शहाSonia Gandhiसोनिया गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपाNational Congress Partyनॅशनल काँग्रेस पार्टीNarendra Modiनरेंद्र मोदी