शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
2
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
3
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
4
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
5
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
6
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
7
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
8
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
9
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
10
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
11
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
12
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
13
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
14
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
15
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
16
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
17
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
18
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
19
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
20
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य

West Bengal Assembly Elections 2021: बंगालमध्ये "अबकी बार 200 पार" कसा पोहोचणार भाजप? अमित शाहंनी समजून सांगितलं गणित

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2021 12:35 IST

अमित शाह यांनी हिंदुस्तान टाइम्ससोबत बोलताना सांगितले, की भाजप 200 पारची घोषणा कशा पद्धतीने यशस्वी करेल. अमित शाह म्हणाले, आम्ही 2019च्या लोकसभा निवडणुकीत 18 जागा जिंकल्या, तेव्हाही कुणाला विश्वास नव्हता. (West Bengal Assembly Elections 2021)

कोलकाता - पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने 'अबकी बार, 200 पार', अशी घोषणा दिली आहे. ओपीनियन पोल्समध्ये भाजपला अनपेक्षित यश मिळेल, असे सांगण्यात आले असले तरी, यात भाजपला 200च्या आकड्यापासून बरेच दूर ठेवले आहे. असे असताना भाजप या आकड्याच्या पुढे कसा जाईल? यावर खुद्द गृहमंत्री अमित शाह (Amit shah) यांनीच भाजपचा प्लॅन शेअर केला आहे. (Amit shah told how bjp will fulfill the slogan of abki baar 200 paar in bengal)

अमित शाह यांनी हिंदुस्तान टाइम्ससोबत बोलताना सांगितले, की भाजप 200 पारची घोषणा कशा पद्धतीने यशस्वी करेल. अमित शाह म्हणाले, आम्ही 2019च्या लोकसभा निवडणुकीत 18 जागा जिंकल्या, तेव्हाही कुणाला विश्वास नव्हता. त्या जागांवर आलेल्या निकालांचे रुपांतर विधानसभेत केले, तरी आम्ही 200च्या पुढे जातो. 

West Bengal Assembly Elections 2021 : 'रमजान अन् ख्रिसमसला आमचा विरोध नाही, मग सरस्वती, दुर्गा पूजाही व्हायलाच हवी'

बंगालमध्ये 200 प्लस जागांवर भाजपचा विजय -अमित शाह यांनी 294 विधानसभा जागा असलेल्या पश्चिम बंगालमध्ये आपल्या पक्षासाठी 200 प्लस जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे. यावर बोलताना, शाह म्हणाले, आमच्या या दाव्यावर कुणालाही शंका असेल तर ते 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीचे निकाल पाहू शकतात. जेथे आमचे दोन खासदार वाढून 18 झाले आणि व्होट शेअर तृणमूल काँग्रेसच्या जवळपास झाले आहे.

'आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये भाजपचा विजय निश्चित' -आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये भाजपचा विजय निश्चित असल्याचा अमित शाह यांना विश्वास आहे. याशिवाय तामिळनाडूतही भाजप-अन्नाद्रमूक युतीचा विजय होईल तसेच केरळ आणि पुदुचेरीमध्ये भाजपच्या जागा वाढतील. अशी आशा शाह यांनी यावेळी व्यक्त केली.

West Bengal Assembly Elections: पश्चिम बंगालचा ओपिनिअन पोल बदलला; भाजपा-ममतांमध्ये 'कांटे की टक्कर', काँग्रेस किंगमेकर

'टीएमसीचे कॅम्पेन कमकुवत' -आपण म्हटले आहे, की पश्चिम बंगालमध्ये भाजपला 200 हून अधिक जागा मिळतील. ते लक्ष्य साध्य करण्यासाठी आपण काय करत आहात? असा प्रश्न विचारला असता, शाह म्हणाले, पश्चिम बंगालमधील लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या राज्याच्या विकासाचा दृष्टिकोण स्वीकारला आहे. राज्यात 2019च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने 18 जागा जिंकल्या होत्या. आप भाजपची ही कामगिरी विधानसभांशी जोडली, तर आपल्याला सहज समजेल, की आम्ही हा आकडा कसा निर्धारित केला आहे. लोकसभेत 18 जागा जिंकल्यानंतर आमचा विश्वास वाढला आहे, की भाजप निश्चितपणे जिंकू शकतो. तसेच टीएमसीच्या अनेक नेत्यांनी पक्ष सोडल्याने त्यांचे कॅम्पेनदेखील कमकुवत झाले आहे, असेही शाह म्हणाले. 

टॅग्स :West Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१west bengalपश्चिम बंगालBJPभाजपाTrinamool Congressतृणमूल काँग्रेसAmit Shahअमित शहा