शहरं
Join us  
Trending Stories
1
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
2
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
3
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
4
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
5
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
6
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
7
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!
8
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
9
बिहारमध्ये प्रचारादरम्यान वाद, गोळीबारात प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या नेत्याचा मृत्यू  
10
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
11
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
12
बीचवर स्टंट करणे तरुणाच्या अंगलट; 60 लाखांची मर्सिडीज समुद्रात अडकली, पाहा Video...
13
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
14
बाजारात 'ब्लॅक थर्सडे'! निफ्टी २६,००० च्या खाली; एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे १.८२ लाख कोटी बुडाले
15
सोनं १ लाखाच्या खाली येणार, चांदीही चमक गमावणार, ही ४ कारणं निर्णायक ठरणार
16
'मी का लोकांच्या शिव्या खाऊ; यापुढे रस्ता खराब झाला तर...', नितीन गडकरींचा मोठा निर्णय, जाणून घ्या
17
KKR: आयपीएल २०२६ पूर्वी केकेआरच्या संघात मोठा बदल, अभिषेक नायरवर मोठी जबाबदारी!
18
Mumbai Children Hostage: ओलीस मुलांची सुखरुप सुटका; अपहरणकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले 
19
जिओचा 'या' २ राज्यात दबदबा! दोन कोटी ५१ लाखांहून अधिक युजर्स; एअरटेल-व्हीआयला मोठा फटका
20
Mumbai Hostage: बिग ब्रेकिंग! मुंबईत एका क्लासमधील मुलांना ओलीस ठेवण्यात आले; पोलिसांनी इमारत घेरली  

West Bengal Assembly Elections 2021: बंगालमध्ये "अबकी बार 200 पार" कसा पोहोचणार भाजप? अमित शाहंनी समजून सांगितलं गणित

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2021 12:35 IST

अमित शाह यांनी हिंदुस्तान टाइम्ससोबत बोलताना सांगितले, की भाजप 200 पारची घोषणा कशा पद्धतीने यशस्वी करेल. अमित शाह म्हणाले, आम्ही 2019च्या लोकसभा निवडणुकीत 18 जागा जिंकल्या, तेव्हाही कुणाला विश्वास नव्हता. (West Bengal Assembly Elections 2021)

कोलकाता - पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने 'अबकी बार, 200 पार', अशी घोषणा दिली आहे. ओपीनियन पोल्समध्ये भाजपला अनपेक्षित यश मिळेल, असे सांगण्यात आले असले तरी, यात भाजपला 200च्या आकड्यापासून बरेच दूर ठेवले आहे. असे असताना भाजप या आकड्याच्या पुढे कसा जाईल? यावर खुद्द गृहमंत्री अमित शाह (Amit shah) यांनीच भाजपचा प्लॅन शेअर केला आहे. (Amit shah told how bjp will fulfill the slogan of abki baar 200 paar in bengal)

अमित शाह यांनी हिंदुस्तान टाइम्ससोबत बोलताना सांगितले, की भाजप 200 पारची घोषणा कशा पद्धतीने यशस्वी करेल. अमित शाह म्हणाले, आम्ही 2019च्या लोकसभा निवडणुकीत 18 जागा जिंकल्या, तेव्हाही कुणाला विश्वास नव्हता. त्या जागांवर आलेल्या निकालांचे रुपांतर विधानसभेत केले, तरी आम्ही 200च्या पुढे जातो. 

West Bengal Assembly Elections 2021 : 'रमजान अन् ख्रिसमसला आमचा विरोध नाही, मग सरस्वती, दुर्गा पूजाही व्हायलाच हवी'

बंगालमध्ये 200 प्लस जागांवर भाजपचा विजय -अमित शाह यांनी 294 विधानसभा जागा असलेल्या पश्चिम बंगालमध्ये आपल्या पक्षासाठी 200 प्लस जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे. यावर बोलताना, शाह म्हणाले, आमच्या या दाव्यावर कुणालाही शंका असेल तर ते 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीचे निकाल पाहू शकतात. जेथे आमचे दोन खासदार वाढून 18 झाले आणि व्होट शेअर तृणमूल काँग्रेसच्या जवळपास झाले आहे.

'आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये भाजपचा विजय निश्चित' -आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये भाजपचा विजय निश्चित असल्याचा अमित शाह यांना विश्वास आहे. याशिवाय तामिळनाडूतही भाजप-अन्नाद्रमूक युतीचा विजय होईल तसेच केरळ आणि पुदुचेरीमध्ये भाजपच्या जागा वाढतील. अशी आशा शाह यांनी यावेळी व्यक्त केली.

West Bengal Assembly Elections: पश्चिम बंगालचा ओपिनिअन पोल बदलला; भाजपा-ममतांमध्ये 'कांटे की टक्कर', काँग्रेस किंगमेकर

'टीएमसीचे कॅम्पेन कमकुवत' -आपण म्हटले आहे, की पश्चिम बंगालमध्ये भाजपला 200 हून अधिक जागा मिळतील. ते लक्ष्य साध्य करण्यासाठी आपण काय करत आहात? असा प्रश्न विचारला असता, शाह म्हणाले, पश्चिम बंगालमधील लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या राज्याच्या विकासाचा दृष्टिकोण स्वीकारला आहे. राज्यात 2019च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने 18 जागा जिंकल्या होत्या. आप भाजपची ही कामगिरी विधानसभांशी जोडली, तर आपल्याला सहज समजेल, की आम्ही हा आकडा कसा निर्धारित केला आहे. लोकसभेत 18 जागा जिंकल्यानंतर आमचा विश्वास वाढला आहे, की भाजप निश्चितपणे जिंकू शकतो. तसेच टीएमसीच्या अनेक नेत्यांनी पक्ष सोडल्याने त्यांचे कॅम्पेनदेखील कमकुवत झाले आहे, असेही शाह म्हणाले. 

टॅग्स :West Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१west bengalपश्चिम बंगालBJPभाजपाTrinamool Congressतृणमूल काँग्रेसAmit Shahअमित शहा