शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
2
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
3
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
4
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
5
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
6
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
7
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
8
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
9
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
10
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
11
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
12
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
13
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
14
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
15
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक
16
चीनमधून MBBS अन् तयार केले खतरनाक विष; गुजरातमध्ये पकडलेल्या ३ दहशतवाद्यांचा प्लॅन काय होता?
17
सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला...
18
मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत सरकार देतं आर्थिक मदत! 'या' वर्गातील कुटुंबांसाठी चालवली जाते योजना
19
गेल्या २४ तासांत जपानमध्ये भूकंपाचे धक्के, सर्वात मोठा भूकंप ६.८ रिश्टर स्केलचा; त्सुनामीचा इशारा जारी
20
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?

इतिहासाची पाने... राजीव गांधी यांच्या हत्येने देश हादरला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2019 05:05 IST

पंतप्रधान चंद्रशेखर यांचा पाठिंबा काँग्रेसने मागे घेतल्याने मुदतपूर्व निवडणुकांशिवाय पर्याय नव्हता. देश दुसऱ्यांदा मुदतपूर्व निवडणुकांना सामोरे जात होता. मार्च ते मे या काळात मतदान होणार होते.

- वसंत भोसले

पंतप्रधान चंद्रशेखर यांचा पाठिंबा काँग्रेसने मागे घेतल्याने मुदतपूर्व निवडणुकांशिवाय पर्याय नव्हता. देश दुसऱ्यांदा मुदतपूर्व निवडणुकांना सामोरे जात होता. मार्च ते मे या काळात मतदान होणार होते. मंदिर-मशीद वाद, मंडल आयोगाचा वाद आणि शाहबानो प्रकरणाचे पडसाद अशा तणावपूर्ण वातावरणात निवडणुका चालू होत्या. तीन टप्पे पूर्णही झाले होते. राजीव गांधी यांचा १९ मे १९९१ रोजी महाराष्टÑ दौरा होता. कागल (कोल्हापूर), पेठनाका (सांगली) आणि कºहाड (सातारा) येथे त्यांच्या सभा झाल्या. रात्री पुणेमार्गे ते नवी दिल्लीला रवाना झाले. त्यांचा तामिळनाडू दौरा २१ मे रोजी सुरू झाला. चेन्नईपासून ४० किलोमीटर अंतरावरील श्रीपेरुंबुदूर येथील मैदानावर त्यांची सभा होती. राजीव गांधी अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत होते. अनेकवेळा ते रोड शो करीत रस्त्यावरच उतरत असत. जमावात जाऊन मिसळत. तसा प्रकार त्यांनी तेथील सभा रात्री १० वाजल्यानंतर केला. श्रीलंकेतील सिंहली-तामिळ वांशिक दंगलीत भारताने शांतिसेना पाठवून श्रीलंका सरकारला मदत केली होती. त्याचा सूड घेण्याच्या भावनेतून मानवी बॉम्बद्वारे राजीव गांधी यांच्यावर सभेच्या व्यासपीठाशेजारी १० वाजून २१ मिनिटांनी स्फोट घडवून आणण्यात आला. तामिळ अतिरेक्यांनी या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. तीन महिलांकरवी हा मानवी बॉम्बस्फोट करण्यात आला. त्यात राजीव गांधी यांची भीषण हत्या झाली. इंदिरा गांधी यांची हत्या सात वर्षांपूर्वी खलिस्तानच्या मागणीवरून झालेल्या हिंसाचारातून झाली होती. जवळपास तशीच हत्या तामिळ अतिरेक्यांकडून राजीव गांधी यांची करण्यात आली.लोकसभेच्या दहाव्या निवडणुकीला हा हादराच होता. कॉँग्रेसला चांगला प्रतिसाद मिळत होता. प्रमुख विरोधी पक्षाच्या भूमिकेत भाजप आव्हान उभे करीत असताना, कॉँग्रेस मात्र नेतृत्वाविना पोरकी झाली. प्रथमच नेहरू-गांधी घराण्यातील नेतृत्वासाठी कोणी पुढे आले नाही.राजीव गांधी यांच्या हत्येपूर्वी तीन टप्प्यांतील मतदानही झाले होते. निवडणूक आयोगाने उर्वरित टप्पे पूर्ण करून, १६ मे रोजी निकाल घोषित केला. एकूण ४८७ जागा लढविणाऱ्या कॉँग्रेसला २३२ जागा मिळाल्या. भाजपने ४६८ लढवून १२० जिंकल्या. जनता दलास ५९, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला ३५, तर भारतीय कम्युनिस्टांना १४ जागा मिळाल्या. पुन्हा एकदा कोणत्याच पक्षाला बहुमत न मिळता त्रिशंकू अवस्था निर्माण झाली. महाराष्ट्रात चांगले यश मिळवून काँग्रेसने ३८ जागा जिंकल्या. शिवाय कर्नाटक (२३), तामिळनाडू (२८), मध्य प्रदेश (२७), आंध्र प्रदेश (२५) या राज्यांमध्ये चांगले यश मिळाले. उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये मात्र कॉँग्रेसचा सफाया झाला. भाजपने उत्तर प्रदेशात ५१ जागा जिंकल्या. जनता दलाने बिहारमध्ये ३१ जागा तर उत्तर प्रदेशात २२ जागा जिंकल्या. या दोन्ही राज्यांतील १३९ जागांपैकी कॉँग्रेसला केवळ सहा जागा मिळाल्या. त्यात राजीव गांधी यांची एक होती.कॉँग्रेसला आता अनेक छोट्या पक्षांची गरज होती. प्रादेशिक पक्षांना ५० जागा मिळाल्या होत्या, तर ९ ठिकाणी अपक्ष निवडून आले होते. त्यांचा पाठिंबा घेण्याचा प्रयत्न झाला. भाजप-जनता दल एकत्र येऊनही बहुमत होणार नव्हते. भाजपला मार्क्सवादी कम्युनिस्ट पाठिंबा देणार नव्हता. अशा परिस्थितीत कॉँग्रेसच्या नेतेपदी ज्येष्ठ नेते पी. व्ही. नरसिंह राव यांची निवड झाली. महाराष्टÑाचे तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार नेतृत्वाच्या स्पर्धेत उतरले; पण त्यांना यश आले नाही. नरसिंह राव यांनी पाठिंबा मिळवून, बहुमतापर्यंत जाण्याचा यशस्वी प्रयत्न केला. ते सत्तेवर आले खरे, पण देशाची व सरकारची आर्थिक स्थिती गंभीर होती. परकीय गंगाजळी संपतच आली होती. सोने गहाण ठेवून व्यवहार चालू होते. अशा स्थितीत राव व डॉ. मनमोहन सिंग यांनी देशाच्या आर्थिक धोरणांना नवे वळण देण्याचे ऐतिहासिक कार्यकेले. 

टॅग्स :Rajiv Gandhiराजीव गांधीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक