शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य तळपतोय! उष्णतेचा प्रकोप ठरतोय जीवघेणा; उत्तर प्रदेशमध्ये ३३ जणांचा मृत्यू
2
"मी स्वत:च नकार दिला..."; मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळताच भाजपा नेत्याचा मोठा खुलासा
3
एमएचटी-सीईटीचा निकाल जाहीर: ३७ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल; यंदा नऊ अधिक
4
Modi 3.0 Budget : पहिल्या अर्थसंकल्पात नोकऱ्यांवर भर देण्याची शक्यता; PLI स्कीम, लघु उद्योगांना मिळणार प्रोत्साहन
5
गुरपतवंत सिंग पन्नूनच्या हत्येचा कट रचणाऱ्या आरोपीचे प्रत्यार्पण, चेक रिपब्लिकमधून निखिल गुप्ता अमेरिकेत
6
Weather Forecast: पावसाबाबत महत्त्वाची बातमी: कोकण, मराठवाड्यात यलो अलर्ट; असा आहे हवामान अंदाज
7
Success Story : एकेकाळी ₹२५० साठी करायचे काम, १२वी मध्ये दोनदा अपयश; आता उभी केली ₹१ लाख कोटींची कंपनी
8
'अभिनेत्री' आलिया भट झाली 'लेखिका', स्वतःच्या पहिल्या पुस्तकाचं केलं प्रकाशन! काय आहे विषय?
9
ईव्हीएमवरून गदारोळ; इलॉन मस्क यांनी व्यक्त केली चिंता; भारताच्या निवडणूक आयुक्तांनी काय उत्तर दिलं?
10
आजचे राशीभविष्य, १७ जून २०२४ : कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील, मानसिक स्वास्थ्य लाभेल
11
आइस्क्रीममध्ये मानवी बोट; उत्पादन करणाऱ्या डेअरीला अखेर FDAचा दणका
12
Upcoming IPOs: पैसे तयार ठेवा! या आठवड्यात उघडणार ३ नवे आयपीओ, पाहा संपूर्ण डिटेल्स
13
नवीन मालिका सुरु होत असताना शिवानी सुर्वेने चाहत्यांना केलं आवाहन, म्हणाली - "१२ वर्षांपुर्वी..."
14
निवृत्तीचे वय ६० करण्यास राज्य सरकार सकारात्मक
15
संयुक्त पत्रकार परिषदेनंतर आता तीनही पक्षांची चाचपणी सुरू; विधानसभा जागावाटपाचा 'असा' असेल फॉर्म्युला
16
नीटची संस्था ‘नीट’ करणार; घोळ करणाऱ्यांना सोडणार नाही: सरकार उचलणार कठाेर पाऊल
17
यू-ट्यूब व्हिडीओद्वारे सलमानला धमकावणाऱ्याला राजस्थानातून अटक
18
विशेष लेख: ‘नीट’ परीक्षेतील ‘नटवरलाल’ नक्की कोण?
19
होर्डिंग दुर्घटनेतील आरोपींच्या कोठडीत वाढ
20
वायकरांच्या मतदारसंघातील मतमोजणीवरून वादंग; निवडणूक आयोगाने EVMबाबत दिलं 'हे' स्पष्टीकरण

विजयाची हॅट्रीक केल्यानंतर चौथ्यांदा न लढताच भाजपानं 'ही' जागा गमावली होती, कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2024 4:04 PM

अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील सरकार एका मताने पडल्यानंतर १९९९ मध्ये पुन्हा एकदा लोकसभा निवडणुका झाल्या.

सुलतानपूर - आगामी लोकसभा निवडणूक २०२४ ची घोषणा झाली असून सगळेच राजकीय पक्ष प्रचारात उतरलेत. याआधीही आपल्याकडे अनेक लोकसभा निवडणुका झाल्यात. प्रत्येक वेळच्या निवडणुकीचा काही ना काही इतिहास आहे. असाच एक किस्सा १९९९ च्या निवडणुकीत घडला होता. विजयाची हॅट्रिक करणाऱ्या भाजपाने १९९९ मध्ये सुलतानपूर लोकसभेची जागा चौथ्यांदा न लढवता गमावली होती.  

भाजपाचे उमेदवार उमेदवारी अर्जाच्या शेवटच्या क्षणापर्यंत अर्ज भरण्यासाठी पोहचले नाहीत. त्यामुळे विहित मुदतीनंतर दाखल केलेले त्यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांनी फेटाळला. राज्यात कल्याण सिंह यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे सरकार असताना हा प्रकार घडला. १९९१ मध्ये पहिल्यांदा भाजपाने रामलहरमधील सुलतानपूर लोकसभा मतदारसंघात विजय मिळवला होता. त्यानंतर पक्षाने रामजन्मभूमी आंदोलनाशी संबंधित अयोध्या संत विश्वनाथ दास शास्त्री यांना उमेदवारी दिली होती. १९९६ मध्ये पक्षाने त्यांना संधी दिली नव्हती. त्यांच्या जागी वादग्रस्त वास्तू पाडल्याच्या वेळी फैजाबादचे (आताचे अयोध्या) वरिष्ठ पोलीस अधीक्षक असलेले देवेंद्र बहादूर राय यांना उमेदवारी देण्यात आली.

राय यांनी १९९६ आणि १९९८ मध्ये पक्षाची ही जागा कायम राखली. अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील सरकार एका मताने पडल्यानंतर १९९९ मध्ये पुन्हा एकदा लोकसभा निवडणुका झाल्या. यामध्ये पक्षाने पुन्हा उमेदवार बदलला. १९९९ च्या निवडणुकीत गोंडा येथील रहिवासी असलेले पक्षाचे ज्येष्ठ नेते सत्यदेव सिंह येथून उमेदवार होते. शेवटच्या दिवशी त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. तत्कालीन जिल्हा दंडाधिकारी/निवडणूक अधिकारी अनुराग श्रीवास्तव यांनी विलंबाच्या कारणास्तव तो फेटाळला होता. या मुद्द्यावरून बराच वाद झाला होता. मात्र अधिकाऱ्यांनी त्यांची भूमिका ठाम ठेवली. विहित मुदतीत अर्ज न आल्याने भाजपाच्या उमेदवाराचा अर्ज रद्द झाला. 

बसपाला झाला फायदा

भाजपा उमेदवार मैदानात नसल्याने त्याचा फायदा बसपाने उचलला. इथं बसपा उमेदवार जयभद्र सिंह यांनी विरोधी पक्षातील रामलखन वर्मा यांना हरवलं. सुलतानपूरच्या जागेवर पहिल्यांदाच बसपाचा उमेदवार विजयी झाला. त्यानंतर २००४, २००९ मध्येही बसपाच जिंकली. परंतु २०१४ च्या मोदी लाटेत याठिकाणाहून वरूण गांधी आणि २०१९ ला मेनका गांधी यांना उमेदवार बनवून भाजपाने ही जागा पुन्हा जिंकली. 

टॅग्स :BJPभाजपाsultanpur-pcसुल्तानपुरlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४