शहरं
Join us  
Trending Stories
1
मुलगा शिवसेनेचा आमदार! नारायण राणे म्हणतात, बाळासाहेब होते तोपर्यंतच शिवसेना होती, आजची...
2
निवडणूक बिहारमध्ये, चर्चा महाराष्ट्राच्या एकनाथ शिंदेंची; एनडीएला डिवचण्यासाठी विरोधकांकडून 'शिंदे मॉडेल'चा उल्लेख
3
ट्रम्प यांनी केलेला युद्धविराम हमासने तोडला की इस्रायलने? हवाई हल्ले, रणगाड्यांच्या तोफांनी गाझा हादरला, १८ ठार
4
क्रूरतेची सीमा ओलांडली! श्वास थांबेपर्यंत चिमुकल्याचा गळा दाबला; मृतदेह घाटावर फेकला! मन सुन्न करणारी घटना!
5
सोने-चांदीचे दर कोसळले! विक्रमी उच्चांकावरून सोने १३,०००, तर चांदी २९,००० रुपयांपर्यंत स्वस्त
6
सौरभ चौघुलेपासून विभक्त झाल्याच्या चर्चांवर अखेर योगिता चव्हाणनं सोडलं मौन, म्हणाली...
7
रश्मिका मंदानाला व्हायचंय आई, आतापासूनच पडली प्रेमात; म्हणाली, "ठराविक वयात..."
8
प्रकट दिन २०२५: स्वामी अन् शंकर महाराजांची भेट कशी झाली? ब्रह्मांडनायक गुरुचा अद्भूत शिष्य
9
Video - "मी तुमच्या मुलीवर उपचार करणार नाही..."; डॉक्टरची रुग्णाच्या वडिलांना मारहाण
10
Vastu Shastra: वास्तु शास्त्रानुसार घराच्या 'या' भागात ठेवा मोरपीस, आयुष्यात भरतील नवे रंग!
11
मायक्रोसॉफ्टने नोकियानंतर या कंपनीवर तगडा पैसा लावला; Ai च्या इतिहासातील सर्वात मोठी डील, फळणार का?
12
प्रकट दिन: कैलास का रहनेवाला, स्वामींचे दैवी परमशिष्य; विलक्षण अवलिया असलेले शंकर महाराज
13
१३८ दिवसांनी शनि मार्गी: ७ राशींची चंगळ, वरदानाचा काळ; यश-पैसा, सुख लाभेल, साडेसाती संपेल?
14
पाकिस्तान क्रिकेटमध्ये मोठ्ठा राडा !! मोहम्मद रिझवान पाक क्रिकेट बोर्डाला नडला... काय घडलं?
15
किरकोळ तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात; सेन्सेक्स ८५,००० अंकांच्या आणि निफ्टी २६,००० अंकांच्या जवळ
16
PPF ला साधं समजू नका! पती-पत्नी मिळून बनवू शकता ₹१.३३ कोटींचा फंड, तोही टॅक्स फ्री
17
'तो' प्रवास ठरला शेवटचा! कुटुंबीयांसमोरच वडील आणि मुलीचा होरपळून मृत्यू; १० जण जखमी
18
ब्राझीलमध्ये रेड कमांडोविरोधात युद्ध सुरु; रिओमध्ये मोठ्या अड्ड्यावर हेलिकॉप्टरद्वारे हल्ला, माफियांकडून ड्रोन हल्ल्याने प्रत्यूत्तर
19
भयानक! ब्राझीलच्या रियो डी जेनेरियोमध्ये पोलीस कारवाईत ६४ जणांचा मृत्यू, ८१ जणांना अटक
20
Ramkesh Murder Case: बदल्याची आग! मोबाईल डेटा, हार्ड ड्राइव्ह, अश्लील...; २० वर्षीय मुलीने का केली पार्टनरची हत्या?

विजयाची हॅट्रीक केल्यानंतर चौथ्यांदा न लढताच भाजपानं 'ही' जागा गमावली होती, कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2024 16:05 IST

अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील सरकार एका मताने पडल्यानंतर १९९९ मध्ये पुन्हा एकदा लोकसभा निवडणुका झाल्या.

सुलतानपूर - आगामी लोकसभा निवडणूक २०२४ ची घोषणा झाली असून सगळेच राजकीय पक्ष प्रचारात उतरलेत. याआधीही आपल्याकडे अनेक लोकसभा निवडणुका झाल्यात. प्रत्येक वेळच्या निवडणुकीचा काही ना काही इतिहास आहे. असाच एक किस्सा १९९९ च्या निवडणुकीत घडला होता. विजयाची हॅट्रिक करणाऱ्या भाजपाने १९९९ मध्ये सुलतानपूर लोकसभेची जागा चौथ्यांदा न लढवता गमावली होती.  

भाजपाचे उमेदवार उमेदवारी अर्जाच्या शेवटच्या क्षणापर्यंत अर्ज भरण्यासाठी पोहचले नाहीत. त्यामुळे विहित मुदतीनंतर दाखल केलेले त्यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांनी फेटाळला. राज्यात कल्याण सिंह यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे सरकार असताना हा प्रकार घडला. १९९१ मध्ये पहिल्यांदा भाजपाने रामलहरमधील सुलतानपूर लोकसभा मतदारसंघात विजय मिळवला होता. त्यानंतर पक्षाने रामजन्मभूमी आंदोलनाशी संबंधित अयोध्या संत विश्वनाथ दास शास्त्री यांना उमेदवारी दिली होती. १९९६ मध्ये पक्षाने त्यांना संधी दिली नव्हती. त्यांच्या जागी वादग्रस्त वास्तू पाडल्याच्या वेळी फैजाबादचे (आताचे अयोध्या) वरिष्ठ पोलीस अधीक्षक असलेले देवेंद्र बहादूर राय यांना उमेदवारी देण्यात आली.

राय यांनी १९९६ आणि १९९८ मध्ये पक्षाची ही जागा कायम राखली. अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील सरकार एका मताने पडल्यानंतर १९९९ मध्ये पुन्हा एकदा लोकसभा निवडणुका झाल्या. यामध्ये पक्षाने पुन्हा उमेदवार बदलला. १९९९ च्या निवडणुकीत गोंडा येथील रहिवासी असलेले पक्षाचे ज्येष्ठ नेते सत्यदेव सिंह येथून उमेदवार होते. शेवटच्या दिवशी त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. तत्कालीन जिल्हा दंडाधिकारी/निवडणूक अधिकारी अनुराग श्रीवास्तव यांनी विलंबाच्या कारणास्तव तो फेटाळला होता. या मुद्द्यावरून बराच वाद झाला होता. मात्र अधिकाऱ्यांनी त्यांची भूमिका ठाम ठेवली. विहित मुदतीत अर्ज न आल्याने भाजपाच्या उमेदवाराचा अर्ज रद्द झाला. 

बसपाला झाला फायदा

भाजपा उमेदवार मैदानात नसल्याने त्याचा फायदा बसपाने उचलला. इथं बसपा उमेदवार जयभद्र सिंह यांनी विरोधी पक्षातील रामलखन वर्मा यांना हरवलं. सुलतानपूरच्या जागेवर पहिल्यांदाच बसपाचा उमेदवार विजयी झाला. त्यानंतर २००४, २००९ मध्येही बसपाच जिंकली. परंतु २०१४ च्या मोदी लाटेत याठिकाणाहून वरूण गांधी आणि २०१९ ला मेनका गांधी यांना उमेदवार बनवून भाजपाने ही जागा पुन्हा जिंकली. 

टॅग्स :BJPभाजपाsultanpur-pcसुल्तानपुरlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४