शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

विजयाची हॅट्रीक केल्यानंतर चौथ्यांदा न लढताच भाजपानं 'ही' जागा गमावली होती, कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2024 16:05 IST

अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील सरकार एका मताने पडल्यानंतर १९९९ मध्ये पुन्हा एकदा लोकसभा निवडणुका झाल्या.

सुलतानपूर - आगामी लोकसभा निवडणूक २०२४ ची घोषणा झाली असून सगळेच राजकीय पक्ष प्रचारात उतरलेत. याआधीही आपल्याकडे अनेक लोकसभा निवडणुका झाल्यात. प्रत्येक वेळच्या निवडणुकीचा काही ना काही इतिहास आहे. असाच एक किस्सा १९९९ च्या निवडणुकीत घडला होता. विजयाची हॅट्रिक करणाऱ्या भाजपाने १९९९ मध्ये सुलतानपूर लोकसभेची जागा चौथ्यांदा न लढवता गमावली होती.  

भाजपाचे उमेदवार उमेदवारी अर्जाच्या शेवटच्या क्षणापर्यंत अर्ज भरण्यासाठी पोहचले नाहीत. त्यामुळे विहित मुदतीनंतर दाखल केलेले त्यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांनी फेटाळला. राज्यात कल्याण सिंह यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे सरकार असताना हा प्रकार घडला. १९९१ मध्ये पहिल्यांदा भाजपाने रामलहरमधील सुलतानपूर लोकसभा मतदारसंघात विजय मिळवला होता. त्यानंतर पक्षाने रामजन्मभूमी आंदोलनाशी संबंधित अयोध्या संत विश्वनाथ दास शास्त्री यांना उमेदवारी दिली होती. १९९६ मध्ये पक्षाने त्यांना संधी दिली नव्हती. त्यांच्या जागी वादग्रस्त वास्तू पाडल्याच्या वेळी फैजाबादचे (आताचे अयोध्या) वरिष्ठ पोलीस अधीक्षक असलेले देवेंद्र बहादूर राय यांना उमेदवारी देण्यात आली.

राय यांनी १९९६ आणि १९९८ मध्ये पक्षाची ही जागा कायम राखली. अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील सरकार एका मताने पडल्यानंतर १९९९ मध्ये पुन्हा एकदा लोकसभा निवडणुका झाल्या. यामध्ये पक्षाने पुन्हा उमेदवार बदलला. १९९९ च्या निवडणुकीत गोंडा येथील रहिवासी असलेले पक्षाचे ज्येष्ठ नेते सत्यदेव सिंह येथून उमेदवार होते. शेवटच्या दिवशी त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. तत्कालीन जिल्हा दंडाधिकारी/निवडणूक अधिकारी अनुराग श्रीवास्तव यांनी विलंबाच्या कारणास्तव तो फेटाळला होता. या मुद्द्यावरून बराच वाद झाला होता. मात्र अधिकाऱ्यांनी त्यांची भूमिका ठाम ठेवली. विहित मुदतीत अर्ज न आल्याने भाजपाच्या उमेदवाराचा अर्ज रद्द झाला. 

बसपाला झाला फायदा

भाजपा उमेदवार मैदानात नसल्याने त्याचा फायदा बसपाने उचलला. इथं बसपा उमेदवार जयभद्र सिंह यांनी विरोधी पक्षातील रामलखन वर्मा यांना हरवलं. सुलतानपूरच्या जागेवर पहिल्यांदाच बसपाचा उमेदवार विजयी झाला. त्यानंतर २००४, २००९ मध्येही बसपाच जिंकली. परंतु २०१४ च्या मोदी लाटेत याठिकाणाहून वरूण गांधी आणि २०१९ ला मेनका गांधी यांना उमेदवार बनवून भाजपाने ही जागा पुन्हा जिंकली. 

टॅग्स :BJPभाजपाsultanpur-pcसुल्तानपुरlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४