शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
4
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
5
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
6
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
7
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
8
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
9
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
10
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
12
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
13
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
14
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
15
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
16
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
17
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
18
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
19
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
20
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!

"वाद निर्माण करणे आणि सनसनाटी पसरवणे त्यांची सवय..."; केदारनाथ मंदिर समितीचे अध्यक्ष शंकराचार्यांवर बरसले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2024 11:58 IST

Swami Avimukateshwaranand: "त्यांनी (शंकराचार्य) यासंदर्भात पुरावे सादर करावेत. वाद निर्माण करणे आणि सनसनाटी पसरवणे ही स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांची सवय आहे," असे अजय यांनी म्हटले आहे.

उत्तराखंडमधील केदारनाथ धामसंदर्भात बोलतानना शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी मोठा दावा केला आहे. येथून 228 किलो सोने गायब झाले आहे. हा मोठा घोटाळा आहे, मात्र यावर कुणीच बोलत नाही, असे स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी म्हटले आहे. यानंतर, श्री बद्रीनाथ-केदारनाथमंदिर समितीचे अध्यक्ष अजेंद्र अजय यांनीची प्रतिक्रिया आली आहे. "त्यांनी (शंकराचार्य) यासंदर्भात पुरावे सादर करावेत. वाद निर्माण करणे आणि सनसनाटी पसरवणे ही स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांची सवय आहे," असे अजय यांनी म्हटले आहे.

'वाद निर्माण करणे, सनसनाटी पसरवणे स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांची सवय' -श्री बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितिचे अध्यक्ष अजेंद्र अजय म्हणाले, केदारनाथ धाममध्ये असे (228 किलो सोनं गायब झालं) झाल्याचे बोलणे, अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. यासंदर्भात शंकराचार्यानी पुरावे सादर करायला हवेत, अशी विनंतीही त्यानी केली. एवढेच नाही तर, "मी स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांचा आदर करतो. मात्र, ते दिनभर प्रेस कॉन्फ्रन्स करत राहतात. वाद निर्माण करणे, सनसनाटी पसरवणे आणि चर्चेत राहणे, ही स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांची सवय आहे."

केदारनाथच्या प्रतिष्ठेला धक्का लावण्याचा अधिकार नाही - एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, मंदिर समितीचे अध्यक्ष म्हणाले, "केदारनाथ धाममधील सोने गायब झाल्यासंदर्भातील स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांचे विधान अत्यंत दुर्दैवी आहे. मी त्यांना विनंती करतो आणि आव्हानही करतो की त्यांनी तथ्य आणि पुरावे समोर आणावेत. त्यानी अधिकाऱ्यांकडे जायला हवे, पुरावे सादर करायला हवेत. अन्यथा अनावश्यक वाद निर्माण करून केदारनाथच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवण्याचा त्याना कसलाही अदिकार नाही."

काय म्हणाले होते शंकराचार्य? -शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद म्हणाले होते, केदारनाथमध्ये सोन्याचा घोटाळा झाला आहे. तो मुद्दा का उपस्थित केला गेला नाही. तिथे घोटाळा केल्यानंतर आता दिल्लीमध्ये केदारनाथ मंदिर बांधलं जाईल, तिथे पुन्हा एकदा घोटाळा होईल. 

गेल्या वर्षी केदरनाथ मंदिरातील एका वरिष्ठ पुजाऱ्याने केदारनाथ मंदिरामध्ये सोनाच्याचा मुलामा लावण्याच्या कामामध्ये १२५ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप केला होता. तसेच या कामात सोन्याऐवजी पितळाचा मुलामा दिल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र मंदिर समितीने हा आरोप फेटाळून लावला होता. यासंदर्भात शंकराचार्य म्हणाले, केदारनाथमधील २२८ किलो सोनं गायब आहे. कुठलाही तपास झालेला नाही. त्यासाठी कोण जबाबदार आहे? आता ते म्हणताहेत की दिल्लीमध्ये केदारनाथ मंदिर बनवणार आहोत. हे होणार नाही.

टॅग्स :KedarnathकेदारनाथTempleमंदिरGoldसोनं