शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
7
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
8
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
9
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
10
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
11
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
12
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
13
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
14
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
15
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
16
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
17
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
18
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
19
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
20
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...

"हा हिंदुस्थान आहे, देश बहुमताच्या इच्छेनुसार चालेल"; हायकोर्टाच्या न्यायमूर्तींचे विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2024 13:11 IST

अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शेखर कुमार यादव यांनी केलेल्या वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.

Allahabad High Court : अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शेखर कुमार यादव यांनी रविवारी विहिंपच्या कार्यक्रमात केलेल्या विधानाची सर्वत्र चर्चा होत आहे. हा हिंदुस्थान आहे आणि तो बहुसंख्यांच्या इच्छेनुसार चालेल, असे म्हणण्यास मला अजिबात संकोच वाटत नाही, असं न्यायमूर्ती शेखर कुमार यादव यांनी म्हटलं.  अस्पृश्यता, सती आणि जौहर यांसारख्या प्रथा हिंदू धर्मातून संपुष्टात आल्या आहेत, तर मुस्लिम समाजात अनेक पत्नी ठेवण्याची प्रथा अजूनही सुरू आहे, असंही न्यायमूर्ती शेखर कुमार यादव यांनी आपल्या भाषणात म्हटलं.

विश्व हिंदू परिषदेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात न्यायमूर्ती यादव समान नागरी कायद्यावर बोलत होते. मुस्लिमांनी त्यांच्या संस्कृतीचे पालन करावे अशी हिंदूंची अपेक्षा नाही, तर त्यांनी तिचा अनादर करू नये, अशी त्यांची इच्छा आहे. न्यायमूर्ती शेखर यादव यापूर्वीही गोधर्मावर भाष्य करून चर्चेत आले होते. त्यानंतर आता बहुसंख्यांबाबत केलेल्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

"मला हे बोलायला अजिबात संकोच वाटत नाही की, हा हिंदुस्थान आहे आणि या देशात हिंदुस्थानात राहणाऱ्या बहुसंख्यांच्या इच्छेनुसार काम चालेल. हा कायदा आहे. तुम्ही हे म्हणू शकत नाही की, मी हायकोर्टाचा न्यायाधिश आहे म्हणून हे विधान करत आहे. खरंतर कायदा बहुमतानुसार काम करतो. त्याकडे कुटुंब किंवा समाजाच्या संदर्भात पहा. ज्यात बहुसंख्य लोकांचे कल्याण आणि आनंद आहे तेच स्वीकारले जाईल," असं न्यायमूर्ती शेखर कुमार यादव म्हणाले.

"शास्त्र आणि वेदांसारख्या हिंदू धर्मग्रंथांमध्ये स्त्रियांना देवी म्हणून पूजले जाते. तरीही समाजातील सदस्य अनेक बायका ठेवण्याचा, हलाला किंवा तिहेरी तलाकचा अधिकार मागतात. त्यामुळे आपल्या धर्मग्रंथांमध्ये आणि वेदांमध्ये देवी म्हणून मान्यता असलेल्या स्त्रीचा तुम्ही अपमान करू शकत नाही. तुम्ही चार बायका ठेवण्याचा, हलाला किंवा तिहेरी तलाकचा अधिकार मागू शकत नाही. तुम्ही म्हणाल, आम्हाला तिहेरी तलाक म्हणण्याचा अधिकार आहे आणि महिलांना पोटगी न देण्याचा अधिकार आहे. हे चालणार नाही. समान नागरी कायदा हा विश्व हिंदू परिषद, आरएसएस किंवा हिंदू धर्माचा पुरस्कार करणारी गोष्ट नाही. देशाचे सर्वोच्च न्यायालयही याबाबत बोललं आहे," असंही न्यायमूर्ती यादव म्हणाले. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशHigh Courtउच्च न्यायालयIndiaभारत