शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राजा रघुवंशी हत्याकांडातील आरोपीला पाहताच राग अनावर, प्रवाशाने ऑन कॅमेरा सणसणीत लगावली, VIDEO व्हायरल
3
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
4
फ्लॅटची साईज वाढली पण कमी झाला कार्पेट एरिया; घर घेणाऱ्यांना होतंय डबल नुकसान, समजून घ्या
5
भाईजान इज बॅक! सलमान खानने ५९ व्या वर्षी घटवलं वजन, फोटो पाहून चाहतेही अवाक; म्हणाले, "हँडसम..."
6
Mumbai: उत्पन्नामुळं देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील 'त्या' रिक्षावाल्याच्या पोटावर पाय!
7
SSY नं किती श्रीमंत बनेल तुमची मुलगी; १०००, २०००, ३०००, ५००० आणि १०००० रुपयांच्या गुंतवणूकीवर किती रिटर्न?
8
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
9
मोठी बातमी! सोलापुरातील करमाळ्याचे माजी आमदार जयवंत जगताप एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत
10
"आम्ही ६-७ तास कचऱ्याच्या ढिगाऱ्यात होतो अन्....", धनुषने रश्मिकाबाबत केला अजब खुलासा
11
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
12
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
13
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
14
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
15
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
16
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
17
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
18
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
19
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
20
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय

दोन दिवसांपूर्वी सुरू झालेली "गोडसे ज्ञानशाळा" पोलिसांनी केली बंद; पोस्टर्स, साहित्य करण्यात आलं जप्त 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2021 10:54 IST

Hindu Mahasabha Godse Gyanshala : हिंदू महासभेने दौलतगंज स्थित आपल्या कार्यालयात 'गोडसे ज्ञानशाळा' सुरू केली होती. सोशल मीडियावर याला जोरदार विरोध केला जात होता.

ग्वाल्हेर – महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेचे नावाने ज्ञानशाळा उघडण्याची घटना घडली. मध्यप्रदेशातील ग्वाल्हेर येथे गोडसे ज्ञानशाळेचं उद्धाटन करण्यात आलं. या ज्ञानशाळेत गोडसे यांची विचारधारा युवकांना शिकवण्यात येणार होती. गोडसे ज्ञानशाळेत नथुराम गोडसे यांच्या नावाने जयजयकार करण्यात आला. तसेच उद्धाटनावेळी उपस्थित पाहुण्यांनी नथुराम गोडसेच्या देशभक्तीबद्दलचे किस्से लोकांना सांगितले. मात्र याता दोन दिवसांपूर्वी सुरू झालेली 'गोडसे ज्ञानशाळा' बंद करण्यात आली आहे. ज्ञानशाळेमुळे परिसरात तणावाचं वातावरण पसरलं होतं. 

ग्वाल्हेर जिल्हा प्रशासनाने हस्तक्षेप करत मंगळवारी ही गोडसे ज्ञानशाळा बंद केली आहे. हिंदू महासभेने दौलतगंज स्थित आपल्या कार्यालयात 'गोडसे ज्ञानशाळा' सुरू केली होती. सोशल मीडियावर याला जोरदार विरोध केला जात होता. याबाबत अधिक माहिती मिळाल्यानंतर प्रशासनाने महासभेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला. तसेच या भागात कलम 144 लागू करून कोणत्याही प्रकारे शांतता भंग होऊ न देण्याचे निर्देश दिले. प्रशासनाकडून हिंदू महासभेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांच्याशी चर्चा करण्यात आली. त्यानंतर हिंदू गोडसे ज्ञानशाळा बंद केल्याची माहिती मिळत आहे. 

साहित्य, पोस्टर्स आणि इतर साहित्य जप्त करण्यात आल्याची माहिती देखील अधिकाऱ्यांनी दिली आहे. हिंदू महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. जयवीर भारद्वाज यांनी "हिंदू महासभेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला की हिंदू महासभा भवन दौलतगंज ग्वाल्हेरमध्ये राष्ट्रभक्तांसाठी प्रेरणास्रोत आयोजन सुरू राहतील. गोडसे ज्ञानशाळा संचालित केली जाणार नाही" असं  म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. नथुराम गोडसे यांच्यासोबत अनेक महापुरुषांचे फोटोदेखील जोडण्यात आले, ग्वाल्हेरच्या दौलतगंज परिसरात हिंदू महासभेच्या कार्यालयात ही कार्यशाळा सुरू करण्यात आली होती. 

हिंदू महासभेने नथुराम गोडसेसोबत महाराणा प्रताप, महाराणी लक्ष्मीबाई, गुरू गोबिंद सिंह आणि लाला लजपत राय यांच्या प्रतिमाही लावल्या होत्या. मध्य प्रदेश आणि नथुराम गोडसे वादाचं सत्र अनेक वर्षापासून सुरू आहे, हिंदू महासभा ग्वाल्हेरमध्ये दरवर्षी नथुराम गोडसे जयंती साजरी करते, दोन वर्षापूर्वी भोपाळच्या खासदार साध्वी प्रज्ञा यांनी गोडसेला देशभक्त बोलल्याने वाद झाला होता, त्यानंतर साध्वी प्रज्ञा यांना संसदेत माफी मागावी लागली होती. यावेळी हिंदू महासभेचे उपाध्यक्ष जयवीर भारद्वाज यांनी या देशाचे कुणीही विभाजन करण्याचा प्रयत्न केला तर हिंदू महासभा त्याला प्रखरतेने विरोध करेल, ठोस उत्तर देईल, इतकचं नाही तर हिंदू महासभेकडून पुन्हा एकदा नथुराम गोडसे निर्माण करण्यात येईल असं म्हटलं होतं. 

30 जानेवारीला महात्मा गांधींची हत्या केली होती.

नथुराम गोडसेने 30 जानेवारी 1948 रोजी संध्याकाळी दिल्लीतील बिडला हाऊस येथे महात्मा गांधींची गोळी झाडून हत्या केली होती, त्यावेळी महात्मा गांधी संध्याकाळच्या प्रार्थनेसाठी जात होते, गोडसे त्यांच्या जवळ आला आणि जवळून महात्मा गांधींवर 3 गोळ्या झाडल्या. त्यात जागीच महात्मा गांधींचा मृत्यू झाला. त्यानंतर 15 नोव्हेंबर 1949 रोजी नथुराम गोडसेला अंबाला जेलमध्ये फाशी देण्यात आली.   

टॅग्स :Nathuram Godseनथुराम गोडसेMadhya Pradeshमध्य प्रदेशPoliceपोलिसMahatma Gandhiमहात्मा गांधी