शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
2
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
5
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
6
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
7
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
8
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
9
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
10
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
11
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
12
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
13
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
14
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
15
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
16
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
17
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
18
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
19
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
20
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान

Himanta Biswa Sarma : "राहुल गांधी हे राजकारणासाठी योग्य नाहीत; त्यांना जबाबदारीशिवाय सत्ता, अधिकार हवेत"

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2022 3:39 PM

Himanta Biswa Sarma And Congress Rahul Gandhi : राहुल यांना कोणत्याही जबाबदारीशिवाय सत्ता आणि अधिकार हवे आहेत असं म्हणत शर्मा यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा (Himanta Biswa Sarma) यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Congress Rahul Gandhi) यांच्यावर बोचरी टीका केली आहे. "राहुल गांधी हे राजकारणासाठी योग्य नाहीत, त्यांना गांभीर्यच नाही. राहुल यांना कोणत्याही जबाबदारीशिवाय सत्ता आणि अधिकार हवे आहेत" असं म्हणत शर्मा यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष नाहीत. मात्र ते पक्षाचे सर्व निर्णय घेतात असंही म्हटलं आहे. 

"राहुल गांधी हे एखादी बैठक सुरू असताना मध्येच निघून जातात. खोलीत गेल्यानंतर ते अर्धा-अर्धा तास परत येत नाहीत. बैठक सुरू असताना ते मध्येच व्यायाम करण्यासाठी निघून जातात. त्यांच्यामध्ये विषय़ाचं गांभीर्य नाही. त्यांनी 2019 साली काँग्रेसच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारली आणि काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीमाना दिला. मात्र अजूनही पक्षाला कोण चालवत आहे? भारत जोडो यात्रेचे नेतृत्व कोण करत आहे. म्हणजेच राहुल गांधी यांना कोणतीही जबाबदारी न स्वीकारता सत्ता आणि अधिकार हवे आहेत."

"पक्ष राहुल गांधी यांच्या पाठीमागे का उभा राहतो?"

"लोकशाहीमध्य जेव्हा एखाद्या व्यक्तीला कोणत्याही जबादारीशिवाय सत्ता आणि अधिकार हवे असतील तर ते खूप घातक असते" असं म्हणत हिमंता बिस्वा शर्मा यांनी निशाणा साधला आहे. राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष नाहीत. मात्र ते पक्षाचे सर्व निर्णय घेतात. पराभवाची जबाबदारी घेत काँग्रेसचे अध्यक्षपद सोडलेले असूनही सर्व पक्ष राहुल गांधी यांच्या पाठीमागे का उभा राहतो? गांधी कुटुंबीय गरीब लोकांकडे जात आहेत. मात्र गरीब लोक कधीतरी गांधी कुटुंबाकडे गेलेले पाहिले आहे का? गांधी कुटुंबीय जेथे जेवतात तेथेच एखादी गरीब व्यक्ती जेवल्याचे तुम्ही पाहिलेले आहे का? असे सवालही शर्मा यांनी केला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

मल्लिकार्जुन खर्गे यांची अध्यक्षपदाच्या निवडणुकीत एन्ट्री

काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यासाठी आजचा शेवटचा दिवस आहे. अशातच आज या निवडणुकीमध्ये एक नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे. अगदी कालपर्यंत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह उमेदवारीचा अर्ज दाखल करणार हे निश्चित होतं. पण आज सकाळी दिग्विजय सिंह यांनीही निवडणुकीतून माघार घेतली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि गांधी परिवाराशी एकनिष्ठ असलेल्या मल्लिकार्जुन खर्गे यांची अध्यक्षपदाच्या निवडणुकीत एन्ट्री झाली आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसAssamआसामPoliticsराजकारण