शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
2
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
3
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
4
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
5
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
6
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
7
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
8
बापासमोरच दोन वर्षाच्या मुलाला जबड्यात धरून बिबट्या पसार; १५० जवानांकडून शोधमोहिम, मृतदेह सापडला
9
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
10
लवकरच बाजारात येतेय Toyota ची Mini Fortuner! महाराष्ट्रातल्या 'या' शहरात होणार उत्पादन; किती असू शकते किंमत? जाणून घ्या
11
तंत्रज्ञानाची किमया! सॅमसंगने AI Home केलं लाँच; आता घर होईल स्मार्ट, फक्त एक क्लिक अन्...
12
तांत्रिक बिघाड की मोसादचा हात? संयुक्त राष्ट्रांत पॅलेस्टाईनवर चर्चा होताच ४ बड्या नेत्यांचा माईक बंद  
13
पद्मश्री ज्येष्ठ लेखक एस. एल. भैरप्पा काळाच्या पडद्याआड; पंतप्रधान मोदींसह राष्ट्रपतींनी वाहिली श्रद्धांजली
14
लडाखमधील आंदोलनाला हिंसक वळण, जाळपोळ, लेहमध्ये ४ जणांचा मृत्यू, ७० जण जखमी 
15
हलगर्जीपणाचा कळस! सरकारी रुग्णालयात दुसऱ्याच पायाची सर्जरी, ऑक्सिजन मास्क काढला अन्...
16
"फायनलमध्ये बघून घेऊ’’, दोन वेळा मार खाल्यानंतर शाहीन शाह आफ्रिदीचं भारताला आव्हान    
17
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
18
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
19
समृद्धी महामार्गावर दुहेरी उत्पन्नाचा स्रोत; सौरऊर्जा निर्मिती करणारा देशातील पहिला 'एक्सप्रेसवे' !
20
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?

राहुल गांधींच्या केंब्रिजमधील भाषणाची हिमंता बिस्वा सरमांकडून चिरफाड, प्रत्येक आरोपाला दिलं उत्तर, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2023 10:48 IST

Himanta Biswa Sarma Vs Rahul Gandhi: भाजपाचे फायरब्रँड नेते, आसामचे मुख्यमंत्री आणि राहुल गांधींचे कडवे विरोधत हिमंता बिस्वा सरमा यांनी राहुल गांधींच्या केंब्रिजमधील भाषणावर जोरदार पलटवार केला आहे.

लंडनमधील केंब्रिज विद्यापीठामध्ये काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केलेल्या भाषणावरून आता वादाला तोंड फुटले आहे. त्यातच आता भाजपाचे फायरब्रँड नेते, आसामचे मुख्यमंत्री आणि राहुल गांधींचे कडवे विरोधत हिमंता बिस्वा सरमा यांनी राहुल गांधींच्या केंब्रिजमधील भाषणावर जोरदार पलटवार केला आहे. हिमंता बिस्वा सरमा यांनी राहुल गांधींच्या प्रत्येक आरोपाला घणाघाती भाषेत प्रत्युत्तर दिलं आहे.  आधी परकीय एजंट आम्हाला लक्ष्य करायचे, आता आमचेच लोक परदेशात जाऊन आम्हाला लक्ष्य करत आहेत, केंब्रिजमध्ये जाऊन राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रतिमेवर शिंतोडे उडवण्याचं काम केलं आहे, असा टोला हिमंता बिस्वा सरमा यांनी लगावला आहे. हिमंता बिस्वा सरमा यांनी ट्विट करून लिहिलं की, राहुल गांधी म्हणालेत लोकशाही धोक्यात आहे. त्यामुळे ते आपलं म्हणणं उघडपणे मांडू शकत नाहीत.  मात्र वास्तव हे आहे की, त्यांनी ४ हजार किमी यात्रा केली. मात्र यादरम्यान, त्यांच्यासोबत कुठेही कुठल्याही प्रकारची दुर्घटना झालेली नाही. मोदी सरकारने पुरवलेल्या सुरक्षेमुळे हे शक्य झाले. मात्र काँग्रेसच्या सत्ताकाळात भाजपा नेत्यांच्या यात्रेमध्ये काय व्हायचे याची आठवण राहुल गांधींना करून दिली पाहिजे.

यावेळी पेगाससवर बोलणाऱ्या राहुल गांधींवरही हिमंता बिस्वा सरमा यांनी निशाणा साधला. राहुल गांधी म्हणतात की, त्यांच्या फोनमध्ये पेगासस सॉफ्टवेअर होता. याबाबत त्यांना एका अधिकाऱ्याने इशारा दिला होता. मग त्यांनी त्यांचा फोन सुप्रीम कोर्टाने तपासासाठी मागितल्यावर जमा का केला नाही. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने पेगासस असल्याचे कुठलेही पुरावे नसल्याचा निकाल दिला होता.

दरम्यान, राहुल गांधींनी केलेल्या चीनच्या कौतुकावरूनही हिमंता बिस्वा सरमा यांनी निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, बीआरआय आज जगातील अनेक देशांमधील कर्जासाठी कारणीभूत आहे. अंकल पित्रोदा यांनी याबाबत सांगितलं नाही? राहुल गांधी यांनी लोकशाहीमध्ये मॅन्युफॅक्चरिंगबाबत प्रश्न उपस्थित केले. मात्र त्यांच्या आजी इंदिरा गांधी यांनी लोकशाहीच सस्पेंड करून ठेवली होती. तेव्हा खरोखरच मॅन्युफॅक्चरिंग वाढली नव्हती. मात्र आज नरेंद्र मोदींनी पीएलआय स्किम सुरू केली आहे. त्यामुळे ती वाढली आहे, असेही सरमा यांनी सांगितले.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपा