शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

हिमाचल प्रदेशमध्ये पोलिसांच्या वाहनाला भीषण अपघात; 7 जणांचा मृत्यू, 5 जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2023 14:29 IST

पोलिसांच्या वाहनाला भीषण अपघात झाला. या अपघातात 7 पोलिसांचा मृत्यू झाला.

हिमाचल प्रदेशातील चंबा जिल्ह्यात एक मोठी दुर्घटना घडली आहे. पोलिसांच्या वाहनाला भीषण अपघात झाला. या अपघातात 7 पोलिसांचा मृत्यू झाला. तीसा बैरागड रोडवरील तरवाई पुलाजवळ त्यांची कार येत असताना हा अपघात झाला. अपघात झाला त्यावेळी गाडीत 12 जण प्रवास करत होते. अपघाताची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि लोकप्रतिनिधी घटनास्थळी रवाना झाले आहेत.

कॅबिनेट मंत्री मुकेश अग्निहोत्री यांनी या अपघातावर शोक व्यक्त केला आहे. "चंबा जिल्ह्यातील तीसा येथे पोलीस दलाच्या वाहन अपघातात 7 पोलीस कर्मचार्‍यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे, तर 5 जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेत जखमी झालेले इतर पोलीस लवकरात लवकर बरे व्हावेत" असं अग्निहोत्री यांनी म्हटलं आहे. 

शिमला, भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष आणि आमदार हंसराज यांनी सांगितले की, आज सकाळी चंबा येथे एक दुर्घटना घडली आहे. भाजपाच्या म्हणण्यानुसार सरकार आणि पीडब्ल्यूडीचे एक्सईएन यांचेा निष्काळजीपणा समोर आला आहे. आम्ही शासनाकडे सातत्याने विनवणी करून हा रस्ता बंद करून घेतला होता, मात्र शासनाने हा रस्ता पुन्हा सुरू केला. याची माहिती आम्ही सरकारला यापूर्वी दिली होती, मात्र सरकार गप्प बसलं. सतत डोंगर कोसळत होता, जनता पाहत होती, पण सरकारने काहीच कारवाई केली नाही.

पीडब्ल्यूडीमध्ये काम करणाऱ्या जोगिंदर शर्मा यांच्यावर तातडीने एफआयआर दाखल करण्यात यावा, अशी भाजपाची मागणी आहे. त्यांच्या निष्काळजीपणामुळे आज चंबा येथे एवढी मोठी दुर्घटना घडली आहे. याबाबत आम्ही सरकारला सोशल मीडिया आणि लेखी माध्यमातून सातत्याने माहिती दिली होती. मात्र, हा अपघात रोखण्यासाठी सरकारने कोणतीही कारवाई केली नाही. संपूर्ण राज्यात सरकारचे दुर्लक्ष सातत्याने दिसून येत आहे. या प्रकाराला आळा घातला नाही तर हिमाचलच्या जनतेला नेहमीच धोका असेल. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी समितीही स्थापन करावी. सरकारने आपली बाजू जनतेसमोर मांडली पाहिजे असंही म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

टॅग्स :Himachal Pradeshहिमाचल प्रदेशPoliceपोलिसAccidentअपघात