शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

हिमाचल प्रदेशमध्ये पोलिसांच्या वाहनाला भीषण अपघात; 7 जणांचा मृत्यू, 5 जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2023 14:29 IST

पोलिसांच्या वाहनाला भीषण अपघात झाला. या अपघातात 7 पोलिसांचा मृत्यू झाला.

हिमाचल प्रदेशातील चंबा जिल्ह्यात एक मोठी दुर्घटना घडली आहे. पोलिसांच्या वाहनाला भीषण अपघात झाला. या अपघातात 7 पोलिसांचा मृत्यू झाला. तीसा बैरागड रोडवरील तरवाई पुलाजवळ त्यांची कार येत असताना हा अपघात झाला. अपघात झाला त्यावेळी गाडीत 12 जण प्रवास करत होते. अपघाताची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि लोकप्रतिनिधी घटनास्थळी रवाना झाले आहेत.

कॅबिनेट मंत्री मुकेश अग्निहोत्री यांनी या अपघातावर शोक व्यक्त केला आहे. "चंबा जिल्ह्यातील तीसा येथे पोलीस दलाच्या वाहन अपघातात 7 पोलीस कर्मचार्‍यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे, तर 5 जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेत जखमी झालेले इतर पोलीस लवकरात लवकर बरे व्हावेत" असं अग्निहोत्री यांनी म्हटलं आहे. 

शिमला, भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष आणि आमदार हंसराज यांनी सांगितले की, आज सकाळी चंबा येथे एक दुर्घटना घडली आहे. भाजपाच्या म्हणण्यानुसार सरकार आणि पीडब्ल्यूडीचे एक्सईएन यांचेा निष्काळजीपणा समोर आला आहे. आम्ही शासनाकडे सातत्याने विनवणी करून हा रस्ता बंद करून घेतला होता, मात्र शासनाने हा रस्ता पुन्हा सुरू केला. याची माहिती आम्ही सरकारला यापूर्वी दिली होती, मात्र सरकार गप्प बसलं. सतत डोंगर कोसळत होता, जनता पाहत होती, पण सरकारने काहीच कारवाई केली नाही.

पीडब्ल्यूडीमध्ये काम करणाऱ्या जोगिंदर शर्मा यांच्यावर तातडीने एफआयआर दाखल करण्यात यावा, अशी भाजपाची मागणी आहे. त्यांच्या निष्काळजीपणामुळे आज चंबा येथे एवढी मोठी दुर्घटना घडली आहे. याबाबत आम्ही सरकारला सोशल मीडिया आणि लेखी माध्यमातून सातत्याने माहिती दिली होती. मात्र, हा अपघात रोखण्यासाठी सरकारने कोणतीही कारवाई केली नाही. संपूर्ण राज्यात सरकारचे दुर्लक्ष सातत्याने दिसून येत आहे. या प्रकाराला आळा घातला नाही तर हिमाचलच्या जनतेला नेहमीच धोका असेल. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी समितीही स्थापन करावी. सरकारने आपली बाजू जनतेसमोर मांडली पाहिजे असंही म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

टॅग्स :Himachal Pradeshहिमाचल प्रदेशPoliceपोलिसAccidentअपघात