शहरं
Join us  
Trending Stories
1
"ऑफर देणारे, अटी ठेवणारेही तेच, त्यामुळे मी..."; राज-उद्धव एकत्र येण्यावर CM फडणवीसांनी व्यक्त केला आनंद
2
"जाऊ दे यार, कामाचं बोला"; राज-उद्धव एकत्र येण्याच्या प्रश्नावर एकनाथ शिंदे चिडले
3
"माय नेम इज खान"! LSG साठी आवेशची 'हिरोगिरी' यॉर्करचा मारा करत RR च्या हातून हिसकावून घेतला सामना
4
शेकापच्या संतोष पाटलांच्या दोन्ही मुलांचा वेळास बीचवर एकाच वेळी मृत्यू; बहिणीचा मुलगाही सुमद्रात बुडाला
5
रशिया-युक्रेन युद्ध थांबले; तीन दिवस युद्धविराम जाहीर, व्लादिमीर पुतिन यांची घोषणा
6
कॅनडात बस स्टॉपवर भारतीय तरुणीची गोळीबारात हत्या; हल्लेखोरांना दुसऱ्यावर चालवायची होती गोळी
7
Vaibhav Suryavanshi : "छोटा पॅक बडा धमाका"! पहिल्याच बॉलवर सिक्सर.. तेही लॉर्ड शार्दुल ठाकूरसमोर
8
IPL 2025 GT vs DC : बटलर इज बॉस! दिल्ली कॅपिटल्सला पराभूत करत गुजरात टायटन्सनं रचला इतिहास
9
"देशात धार्मिक युद्ध भडकवण्यासाठी सुप्रीम कोर्ट जबाबदार"; मर्यादेबाहेर जाताय म्हणत भाजप खासदाराची टीका
10
वाळूमाफियांची आता खैर नाही! नियमांचे उल्लंघन केल्यास थेट डेपो होणार रद्द, सर्वांना नोटीस जारी
11
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेवर मनसे नेते नाराज? म्हणाले, “त्यांनी आम्हाला दोनदा फसवलेय”
12
8व्या वेतन आयोगाबाबत मोठी बातमी; सरकार या 35 पदांवर करणार नवीन नियुक्त्या
13
IPL 2025 Video: भरमैदानात झाला राडा !! इशांत शर्मा भडकला, आशुतोषवर बोट रोखलं, नेमकं काय घडलं?
14
राज ठाकरेंशी युती झाल्यास उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर पडणार का?; संजय राऊत म्हणाले...
15
Big Breaking: तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात अखेर डॉ. सुश्रुत घैसास यांच्यावर गुन्हा दाखल
16
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षीय वैभव सूर्यवंशी पदार्पणासह रचणार इतिहास; जाणून घ्या सविस्तर
17
Video - अग्निकल्लोळ! एका ठिणगीमुळे बोटीला भीषण आग; १४८ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
18
“मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमुळे राज ठाकरेंची उपयुक्तता सर्वांना वाटत आहे”: छगन भुजबळ
19
“राहुल गांधींचा ‘डरो मत’ संदेश अमलात आणू, एकता, अखंडतेची मशाल घेऊन वाटचाल करू”: सपकाळ
20
IPL 2025 Video: 'सुपरमॅन' कॅच! विपराजला हवा होता चौकार, पण जोस बलटरने हवेत उडत घेतला भन्नाट झेल

जयपूरमध्ये व्यावसायिकाने ९ जणांना चिरडले; दारू पिऊन पळवली ७ किमी गाडी, पोलिसांच्या गाड्याही सोडल्या नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 13:00 IST

जयपुरमध्ये भीषण अपघाताची घटना समोर आली असून एका व्यापाऱ्याने नऊ जणांना चिरडले.

Jaipur Accident: राजस्थानच्या जयपूरमधून हादरवारी घडना समोर आली आहे. जयपूरमध्ये एका भरधाव एसयूव्ही कारने रस्त्यावर गोंधळ उडवला. दारूच्या नशेत कारखाना मालकाने शहरातील गर्दीच्या रस्त्यावर ७ किमीपर्यंत एसयूव्ही भरधाव वेगात चालवली. कार चालकाने नऊ जणांचा चिरडलं. या भीषण अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला असून सहा पादचारी गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मृतांमध्ये एक महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. या अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

जयपूरमध्ये अनियंत्रित कारने कारमध्ये नऊ जणांना चिरडले. या अपघातात एका महिलेसह तिघांचा मृत्यू झाला. तर सहा जण गंभीर जखमी आहेत. सोमवारी रात्री ९.३० च्या सुमारास ही घटना घडली. जयपूरमधील एमआय रोडवर एका भरधाव कारने वाहनांना धडक दिल्याची  माहिती मिळाली होती. यानंतर भरधाव गाडी शहरातील अरुंद रस्त्यांमध्ये शिरली. लोकांना चिरडल्यानंतर, कार एका अरुंद रस्त्यावर अडकली आणि स्थानिक लोकांच्या मदतीने पोलिसांनी आरोपीला पकडले. या घटनेनंतर मंगळवारी सकाळपासून लोक नाहरगड पोलिस ठाण्याबाहेर आंदोलन करत आहेत.

वीरेंद्र सिंग (४८), ममता कंवर (५०), मोनेश सोनी (२८), मोहम्मद जलालुद्दीन (४४), दीपिका सैनी (१७), विजय नारायण (६५) गोविंद (२४) आणि अवधेश पारीक (३७) यांना उपचारासाठी जखमी अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी ममता कंवर आणि अवधेश यांना मृत घोषित केले. मंगळवारी सकाळी वीरेंद्र सिंगचा मृत्यू झाला. नाहरगड रोडवर कारने धडक दिलेल्या ७ जखमींची प्रकृती गंभीर आहे. त्यांना सवाई मानसिंग रुग्णालयाच्या ट्रॉमा वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले आहे.

अतिरिक्त डीसीपी (उत्तर) बजरंग सिंह शेखावत म्हणाले की, आरोपी चालक उस्मान खान (६२) याने सुमारे ५०० मीटरच्या परिसरात लोकांना चिरडले. नाहरगड पोलीस स्टेशन परिसरातील संतोष माता मंदिराजवळ,आरोपी चालकाने आधी स्कूटर, बाईकला धडक दिली आणि नंतर रस्त्यावर पडलेल्या लोकांना चिरडून पळ काढला. आरोपी पोलिस ठाण्याबाहेर उभ्या असलेल्या वाहनांनाही धडक दिली. आरोपीने सुमारे एक तास भरधाव वेगाने गाडी चालवली.

पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने आरोपी उस्मान खान याला पकडलं. रात्री उशिरा आरोपी उस्मान खानचीही वैद्यकीय तपासणी करण्यात आली. पोलिस अधिकाऱ्यांच्या मते, तो मद्यधुंद होता. आरोपी हा जयपूरमधील शास्त्री नगर येथील राणा कॉलनीचा रहिवासी आहे. त्यांचा विश्वकर्मा औद्योगिक वसाहतीमध्ये त्याचा लोखंडी पलंग बनवण्याचा कारखाना आहे. मृतांच्या कुटुंबियांनी आरोपीविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. सोमवारी संध्याकाळी झालेल्या या अपघातानंतर स्थानिक लोकांमध्ये प्रचंड संताप असून लोक रस्त्यावर उतवरले आहेत.

बहुतेक लोक नाहरगड पोलीस स्टेशन परिसरात जखमी झाले आहेत. स्थानिक दिलेल्या माहितीनुसार उस्मानने नाहरगड पोलीस स्टेशनजवळ एका स्कूटरला धडक दिली. त्यावर बसलेले तीन जण जखमी झाले. त्यानंतर, त्याने २०० मीटर पुढे एका स्कूटर आणि एका बाईकला धडक दिली. त्यानंतर संतोषी माता मंदिराजवळ त्याने लोकांना चिरडले. अपघातानंतर लोक त्याची गाडी थांबण्यासाठी त्याचे मागे धावले. लोकांची गर्दी पाहून चालक उस्मानने पुन्हा गाडी पळवली. पोलिसांनी त्याला कारसह एक किलोमीटर अंतरावर असलेल्या संजय सर्कल येथे पकडले. 

टॅग्स :Rajasthanराजस्थानAccidentअपघातPoliceपोलिस