शहरं
Join us  
Trending Stories
1
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
2
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
3
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
4
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
5
Kapil Dev On Gautam Gambhir : गौतम गंभीर कोच नव्हे मॅनेजर! कपिल देव यांनी संदर्भासह दिलं स्पष्टीकरण
6
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
7
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
8
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
9
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
11
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
12
२०० फूट खोल दरीत कोसळला ट्रक; २४ तास आतमध्ये अडकला ड्रायव्हर, GPS ने वाचवला जीव
13
विश्वास बसणार नाही, पण फक्त ५६ हजार लोकांकडे जगातील ७५ टक्के संपत्ती
14
Leopard: भाईंदरमध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या ७ तासांच्या अथक प्रयत्नानंतर जेरबंद!
15
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
16
मतदानापूर्वीच EVM मध्ये २५ हजार मते कशी असू शकतात?; कारण त्यात 'इतक्या'च मतांचे असते सेटिंग
17
नवीन ड्रोन्स, क्षेणास्त्रे, एअर डिफेन्स सिस्टिम अन्..; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर संरक्षण बजेट वाढणार
18
श्रीमंत व्हायचंय? मग वयानुसार करा SIP! तज्ज्ञांनी सांगितला प्रत्येक वयोगटासाठी गुंतवणुकीचा फॉर्म्युला
19
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
20
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
Daily Top 2Weekly Top 5

"आम्ही बॅग आणि साड्यांमध्ये लोकांचे अवयव ठेवले"; अपघातानंतर मदत करणाऱ्याने सांगितली आपबिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 16:47 IST

अहमदाबाद अपघातानंतर तिथे कशी परिस्थिती होती याची माहिती एका मदत करणाऱ्या व्यक्तीने दिली.

Ahmedabad Air India Plane Crash: अहमदाबाद विमान अपघाताच्या धक्क्यातून लोक अद्यापही सावरलेले नाहीत. अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान उड्डाणानंतर काही सेकंदांमध्येच कोसळलं आणि हाहाकार उडाला. आतापर्यंत २७५ लोक या अपघातात मृत्यूमुखी पडले आहेत. यातील २४१ हे विमानातील प्रवासीच होते. विमानात मोठ्या प्रमाणात इंधन असल्याचे स्फोटाची व्याप्ती जास्त होती. हा स्फोट इतका मोठा होता की सर्वच प्रवासी त्यात होरपळून निघाले. यासोबत आजूबाजूच्या परिसराचेही मोठं नुकसान झालं. या दुर्घटनेनंतर सर्वात आधी स्थानिकांनी बचावकार्याला सुरुवात केली. यावेळी लोकांनी प्रवाशांच्या शरीराचे अवयव मिळेल त्या गोष्टींमधून एकत्र करण्यास सुरुवात केली होती.

अहमदाबादमध्ये विमान कोसळून दोन दिवस पूर्ण झाले आहेत. आता विमानाचा ढिगारा हटवण्याचे काम पूर्ण करण्यात येत आहे. स्फोटाची तीव्रता जास्त असल्याने बचाव पथकात सहभागी असलेल्या लोकांना अनेक अडचणींना सामोरे जावं लागलं. मेघाणी नगरमध्ये पसरलेल्या ढिगाऱ्यातून लोकांचे सामान उचलणे हा एक अतिशय वेदनादायक अनुभव ठरत आहे. एक स्थानिक व्यक्ती जेवणासाठी घरी परतत होती. मात्र अपघातस्थळावरील दृष्य पाहून त्याने मृतदेह आणि ढिगारा गोळा करण्यास मदत करण्यास सुरुवात केली. आता घटनास्थळावरून सामान काढण्याचे काम सुरू आहे. सैनिक आणि तज्ञांव्यतिरिक्त स्थानिक लोक स्वयंसेवक म्हणून या कामात मदत करत आहेत.

५६ वर्षीय राजेश पटेल हे या भागातील रहिवासी आहेत. ते रिअल इस्टेट व्यावसायिक म्हणून काम करतात. जेव्हा ही घटना घडली तेव्हा राजेश पटेल जेवणासाठी घरी येत होते. पण घरी पोहोचण्याऐवजी ते पुढील सात तास घटनास्थळी मदत करत राहिले. "हा स्फोट इतका भयानक होता की कोणीही घटनास्थळी लवकर पोहोचू शकले नाही. घटनास्थळी परिस्थिती खूपच वाईट होती. मृतांचे शरीराचे अवयव सर्वत्र विखुरलेले होते. आम्ही बॅग आणि कपड्यांमध्ये मृतदेहांचे अवयव उचलण्यास सुरुवात केली. नंतर आम्ही साड्या वापरल्या. रात्री ९ वाजेपर्यंत बचावकार्य सुरू राहिले. या काळात मी स्वतः सुमारे ५० मृतदेह गोळा केले," असं राजेश पटेल यांनी सांगितले.

दरम्यान, केंद्र आणि राज्य सरकारी संस्थांव्यतिरिक्त, अहमदाबादमधील एअर इंडिया विमान अपघातस्थळी राष्ट्रीय सुरक्षा रक्षकची एक टीम तैनात करण्यात आली आहे. एनएसजी टीम मदत कार्यात इतर यंत्रणांना मदत करण्यासाठी घटनास्थळी पोहोचली आहे. गुरुवारी दुपारी लंडनला जाणारे एअर इंडियाचे बोईंग ७८७ ड्रीमलायनर विमान उड्डाणानंतर काही वेळातच मेघनानगर परिसरातील मेडिकल कॉलेज कॅम्पसमध्ये कोसळले. या अपघातात सुमारे २७५ जणांचा मृत्यू झाला.  

टॅग्स :Plane Crashविमान दुर्घटनाahmedabadअहमदाबादAir Indiaएअर इंडियाAccidentअपघात