शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2025 18:24 IST

भारत-पाकिस्तान तणावादरम्यान, इंडिगो फ्लाइट '६ई ५२२७'मध्ये बॉम्ब असल्याची अफवा पसरल्याने कोलकात्याच्या नेताजी सुभाषचंद्र बोस विमानतळावर खळबळ उडाली.

भारत-पाकिस्तान तणावाच्या दरम्यान, मंगळवारी दुपारी कोलकात्याच्या नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळावर इंडिगोचे विमान मुंबईला निघण्यापूर्वी एका अज्ञात व्यक्तीने फोन करून विमानात बॉम्ब असल्याचा दावा केला. यानंतर, एअरलाइन व्यवस्थापनाने तातडीने विमानतळावरहाय अलर्ट जारी केला आणि कोलकाता-मुंबई इंडिगो फ्लाइट क्रमांक '६ई ५२२७' उड्डाण तत्काळ थांबवले.

या विमानातील सर्व प्रवाशांना खाली उतरवून एका सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले. यानंतर विमान देखील विमानतळाच्या आयसोलेशन बेमध्ये नेण्यात आले, जिथे बॉम्ब निकामी पथकाने त्याची कसून तपासणी केली. विमानतळाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, तपासात विमानात बॉम्ब नसल्याचे पुष्टी झाली, परंतु सुरक्षेच्या कारणास्तव सर्व प्रोटोकॉलचे पालन करण्यात आले.

विमानातून सर्व सामानही उतरवले!

प्रवाशांनी चेक इन केल्यानंतर हा निनावी फोन आला, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. विमान दुपारी १.३० वाजता उड्डाण करणार होते आणि ४.२० वाजता मुंबईत उतरणार होते. मात्र, हा अज्ञात फोन कॉल येताच आपत्कालीन नियमांनुसार सर्व १९५ प्रवाशांना विमानातून उतरण्यास सांगण्यात आले आणि विमानाला आयसोलेशन बेसमध्ये नेण्यात आले. विमानातून सर्व सामान उतरवण्यात आले. या घटनेनंतर विमानतळावर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (CISF) कर्मचाऱ्यांनी संपूर्ण विमानतळावर सुरक्षा कडक केली आहे. या प्रकरणी आता पोलीस तपास करत असून, तो फोन कुठून आला याचा शोध घेतला जात आहे.   

टॅग्स :AirportविमानतळBombsस्फोटकेHigh Alertहाय अलर्ट