शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2025 18:24 IST

भारत-पाकिस्तान तणावादरम्यान, इंडिगो फ्लाइट '६ई ५२२७'मध्ये बॉम्ब असल्याची अफवा पसरल्याने कोलकात्याच्या नेताजी सुभाषचंद्र बोस विमानतळावर खळबळ उडाली.

भारत-पाकिस्तान तणावाच्या दरम्यान, मंगळवारी दुपारी कोलकात्याच्या नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळावर इंडिगोचे विमान मुंबईला निघण्यापूर्वी एका अज्ञात व्यक्तीने फोन करून विमानात बॉम्ब असल्याचा दावा केला. यानंतर, एअरलाइन व्यवस्थापनाने तातडीने विमानतळावरहाय अलर्ट जारी केला आणि कोलकाता-मुंबई इंडिगो फ्लाइट क्रमांक '६ई ५२२७' उड्डाण तत्काळ थांबवले.

या विमानातील सर्व प्रवाशांना खाली उतरवून एका सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले. यानंतर विमान देखील विमानतळाच्या आयसोलेशन बेमध्ये नेण्यात आले, जिथे बॉम्ब निकामी पथकाने त्याची कसून तपासणी केली. विमानतळाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, तपासात विमानात बॉम्ब नसल्याचे पुष्टी झाली, परंतु सुरक्षेच्या कारणास्तव सर्व प्रोटोकॉलचे पालन करण्यात आले.

विमानातून सर्व सामानही उतरवले!

प्रवाशांनी चेक इन केल्यानंतर हा निनावी फोन आला, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. विमान दुपारी १.३० वाजता उड्डाण करणार होते आणि ४.२० वाजता मुंबईत उतरणार होते. मात्र, हा अज्ञात फोन कॉल येताच आपत्कालीन नियमांनुसार सर्व १९५ प्रवाशांना विमानातून उतरण्यास सांगण्यात आले आणि विमानाला आयसोलेशन बेसमध्ये नेण्यात आले. विमानातून सर्व सामान उतरवण्यात आले. या घटनेनंतर विमानतळावर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (CISF) कर्मचाऱ्यांनी संपूर्ण विमानतळावर सुरक्षा कडक केली आहे. या प्रकरणी आता पोलीस तपास करत असून, तो फोन कुठून आला याचा शोध घेतला जात आहे.   

टॅग्स :AirportविमानतळBombsस्फोटकेHigh Alertहाय अलर्ट