शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
2
अफगाणिस्तानला भारताचा मदतीचा हात! अटारी मार्गे केली विशेष मदत; पाकिस्तानला दाखवून दिले
3
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
4
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
5
‘सेलेबी’ला काम नको; आयबीचा होता इशारा, सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीती
6
भारत आता पाकिस्तानवर ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ करणार; ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती जगात पोहोचवणार
7
आगळीक करू नका, ‘ऑपरेशन सिंदूर’ हा फक्त ट्रेलर, गरज पडल्यास पूर्ण ‘पिक्चर’ दाखवू: राजनाथ सिंह
8
अफगाणिस्तानातून पाकची जलकोंडी होण्याची शक्यता; शाहतूत धरणास भारताचे आर्थिक, तांत्रिक सहकार्य
9
‘८६४७’ म्हणजे थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा संदेश? जेम्स कॉमी यांच्या पोस्टमुळे खळबळ
10
मध्य प्रदेशच्या मंत्र्यानंतर आता उपमुख्यमंत्र्यांचेही विधान चर्चेत; काँग्रेसची भाजपावर टीका
11
पाक समर्थक तुर्की, अझरबैजानशी  कोणताही व्यापार, पर्यटन नाही; भारतीय व्यापाऱ्यांचा बहिष्कार
12
“तणावाच्या पार्श्वभूमीवर तुर्की, अझरबैजानसोबत करार करू नका”; याआधीचे करार रद्द करायचा निर्णय
13
मुंबईत तळ ठोकून असणाऱ्या २५० बांगलादेशींना घरचा रस्ता; २ दिवसांत पोलिसांची मोठी धडक कारवाई
14
राजकीय नेत्यांना चढला महापालिका निवडणुकीचा ज्वर! स्थानिक प्रश्नांकडे लक्ष, भेटीगाठी सुरू
15
...आता सहपोलिस आयुक्त गुप्तवार्ता; आयपीएस डॉ. आरती सिंह यांच्याकडे जबाबदारी
16
तिन्ही मार्गावर मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’; पश्चिम, मध्य, हार्बरवरील वेळापत्रक कसे असेल?
17
मुंबई सेंट्रल स्थानकावर पहिले डिजिटल लाउंज; केवळ प्रवासी नाही तर नागरिकांनाही लाभ मिळणार
18
दारूच्या नशेत बेभान कंटेनर चालकाने वाहनांसह २० नागरिकांना उडविले; बीडमधील थरार, महिला ठार
19
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
20
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात

हॅलो 3- कुंकळ्ळीला प्रदूषणाचे ग्रहण

By admin | Updated: September 1, 2015 21:38 IST

आठ वर्षांपासून कचर्‍याचे ढिगारे; सरकारचे दुर्लक्ष

आठ वर्षांपासून कचर्‍याचे ढिगारे; सरकारचे दुर्लक्ष
कुंकळ्ळी : कुंकळ्ळीला प्रदूषणाच्या विळख्यातून मुक्ती केव्हा मिळणार, असा प्रश्न कुंकळ्ळीवासीय विचारत आहेत. कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीला लागलेले प्रदूषणाचे ग्रहण कधी सुटणार, अशा संतप्त प्रतिक्रिया नागरिकांकडून मिळत आहेत. मागील आठ वर्षांपासून कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीत सुमारे पंचावीस हजार टन घातक रासायनिक कचरा साठलेला आहे. मात्र, कचर्‍याच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी सरकारला यश आलेले नाही.
कुंकळ्ळीतील सनराईज झिंग नावाच्या कंपनीतर्फे टाकण्यात आलेला कचरा गेली आठ वर्षे उघड्यावर पडून आहे. या कचर्‍याबरोबरच कारखान्यांतील घातक रासायनिक कचर्‍याच्या ढिगार्‍यांमुळे दुर्गंधी पसरलेली आहे. शिवाय सभोवतालचा परिसर प्रदूषित झाला आहे. याप्रदूषणामुळे या भागातील जैविक संपत्ती व मानवीय जीवनाला धोका निर्माण झाला आहे.
कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीत सुमारे चाळीस हजार टन घातक रासायनिक घनकचरा साठवून ठेवला असून या कचर्‍यावर योग्य प्रक्रिया करण्यासाठी सरकारकडून कोणतीच हालचाल होत नसल्यामुळे लोक संतप्त झालेले आहेत. विधानसभेत या विषयावर चर्चाही झालेली होती. मात्र, सरकारच्या आश्वासनावर लोक समाधानी नसून आता पुन्हा एकदा कुंकळ्ळीत या घातक कचर्‍यावर नागरिकांकडून रोष व्यक्त होत आहे.

चौकट :
घातक रासायनिक पदार्थांचा समावेश..
निकेल, केडमियम, कोबाल्ट व इतर घातक रासायनिक पदार्थांमुळे या भागात रोगराईला निमंत्रण मिळत आहे. या भागातील सुमारे दोन किलोमीटर आवारातील नद्या, विहिरी प्रदूषित झालेल्या आहेत. गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळ, नेरी, जपानमधील तज्ज्ञ कंपनी व इतर अनेक तज्ज्ञांनी या भागातील प्रदूषणाचा अभ्यास करून ही भूमी पूर्णपणे प्रदूषित झाल्याचा अहवाल दिलेला आहे. या भागातील प्रदूषणाची दखल घेऊन तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर र्पीकर यांनी या प्रदूषणामुळे मानवीय जीवनाला धोका असल्याचे जाहीर वक्तव्य केले होते.

चौकट : माणसाच्या जनन प्रक्रि येवर विपरित परिणाम
या भागात तयार होणार्‍या घातक रसायनामुळे माणसामधील जनन प्रक्रियेवर विपरीत परिणाम होण्याचा धोका संभवत असल्याचे मतही तज्ज्ञांनी व्यक्त केले होते. सरकारने या घातक रासायनिक घनकचर्‍यावर तोडगा काढण्यासाठी जैविक पध्दतीचा वापर करण्याचे ठरविले असून यासाठी विश्व बँकेकडून मदत घेतली जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.

चौकट :
सोशल मीडियावरही चर्चा.
कुंकळ्ळीतील प्रदूषणाला जबाबदार कोण? यावर सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू असून काही राजकारणी या प्रदूषणाचे खापर एकमेकावर फोडत आहेत. सध्या कचर्‍यामुळे मोठे वादंग सुरू आहे. आता पालिकेच्या निवडणुका जवळ आल्यामुळे कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीतील घातक कचर्‍याचे राजकारण पुन्हा एकदा प्रकाशात येण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)

चौकट :
मासळी प्रकल्पांमुळे प्रदूषण
कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीत पूर्वी काँग्रेस सरकारने घातक रासायनिक कचरा निर्माण करणारे कारखाने आणून प्रदूषण फैलावले. तर आता भाजप सरकारने औद्योगिक वसाहतीत मासळी प्रकल्पाला मान्यता देऊन राहिलेली कसर पूर्ण केली. औद्योगिक वसाहतीत चार मासळी प्रक्रिया प्रकल्प आहेत. या प्रकल्पांकडून प्रदूषण नियंत्रण ठेवण्यात येत नसल्याचे उघड झालेले आहे. या कारखान्यामुळे या भागात उग्र दुर्गंधी पसरत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या प्रकल्पांना सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्याच्या कामाला सुरुवात होणार असल्याचे सरकारचे म्हणणे आहे.