शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

केरळमध्ये महापूर पण उर्वरित दक्षिण भारत दुष्काळाच्या छायेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2018 16:24 IST

केरळमध्ये पुरस्थिती आली असताना दुसरीकडे उर्वरित दक्षिण भारत मात्र दुष्काळाच्या छायेत आहे.

तिरुवनंतपुरम - केरळमध्ये मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. त्यामुळे गेल्या शंभर वर्षातील सर्वात भीषण महापुराचा सामना केरळला करावा लागला आहे.  केरळमध्ये पुरस्थिती आली असताना दुसरीकडे उर्वरित दक्षिण भारत मात्र दुष्काळाच्या छायेत आहे. केरळ आणि आंध्र प्रदेशचा काही भाग वगळता उर्वरित दक्षिण भारताला दुष्काळाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. तामिळनाडू, कर्नाटक, तेलंगाणा आणि रायलसीमा या भागातील 95 जिल्ह्यांपैकी  47 जिल्ह्यात यावेळी सरासरीच्या सुमारे 20 टक्क्यांपर्यंत कमी पाऊस झाला आहे. तर पाच जिल्ह्यांमध्ये 60 टक्क्यांहून कमी पाऊस झाला आहे. या संपूर्ण भागात मिळून सरासरीपेक्षा  42 टक्क्यांपर्यंत कमी पाऊस झाला आहे. हे प्रमाण पश्चिम राजस्थानपेक्षाही कमी आहे.  तामिळनाडूतील 32 पैकी 22 जिल्ह्यात सरासरी पेक्षा कमी पाऊस झाला आहे. तर कर्नाटकच्या अंतर्गत भागातही 21 टक्क्यांपर्यंत कमी पाऊस झाला आहे. याउलट केरळच्या किनारपट्टीवरील जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडला आहे. कर्नाटकमध्ये पर्जन्यमान सरासरीपेक्षा अधिक दिसत असले तरी राज्यातील निम्म्या जिल्ह्यांमध्ये कमी पाऊस पडला आहे. कर्नाटकमधील कोडगूसह 15 जिल्ह्यात अधिक पाऊस पडला आहे. तर 15 जिल्ह्यात सरासरीपेक्षा पाऊस कमी झाला आहे.  तेलंगाणा आणि आंध्र प्रदेशमध्ये मात्र पर्जन्यमान चांगले झाले आहे. तेलंगाणातील 31 पैकी केवळ 6 जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. तर आंध्र प्रदेशच्या किनारी जिह्ल्यांमध्येही सरासरीपेक्षा 21 टक्के अधिक पाऊस झाला आहे. केरळमध्ये सरासरी पेक्षा 40 टक्के अधिक पाऊस झाला आहे. तर मध्य भारतात गुजरात वगळता अन्यत्र सरासरीपेक्षा थोडा कमी पाऊस झाला आहे. संपूर्ण देशात मिळून सरासरीपेक्षा 7 टक्के कमी पाऊस पडला आहे.  

टॅग्स :monsoon 2018मान्सून 2018RainपाऊसKeralaकेरळfloodपूरdroughtदुष्काळ