शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

उन्हाचा तडाखा ठरतोय जीवघेणा! बिहारमध्ये २०, ओडिशात १० तर...; जाणून घ्या कुठे किती जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2024 11:29 IST

गुरुवारी ४७.१ अंश तापमानासह बक्सर हे बिहारमधील सर्वात उष्ण ठिकाण ठरले. तर झारखंडमधील पलामू येथेही ४७.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

संपूर्ण देशभरात उन्हाचा कडाका कायम आहे. यामुळे देशातील काही भागांतून मृत्यूच्या घटनाही समोर येत आहेत. बिहार, झारखंड, राजस्थान आणि ओडिशा सारख्या राज्यांत उन्हाच्या तीव्रतेमुळे लोक दगावत आहेत. बिहारमधील औरंगाबादच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उष्णतेच्या लाटेमुळे १२ जणांचा मृत्यू झाला असून, २० हून अधिक लोक वेगवेगळ्या रुग्णालयांत दाखल आहेत. याशिवाय झारखंड, ओडिशा आणि राजस्थानातही मृत्यूच्या घटना घडल्याचे वृत्त आहे.

बिहारमध्ये उष्णतेच्या लाटेने २० जणांचा मृत्यू -बिहारमध्येही उन्हाने कहर केला आहे. येथील वेगवेगळ्या राज्यांतून मृत्यूचे वृत्त आहे. उष्णतेमुळे औरंगाबादमध्ये १२ जणांचा मृत्यू झाला. तर २० हून अधिक लोक वेगवेगळ्या रुग्णालयांत दाखल आहेत. बक्सरमध्ये दोन मतदान कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तर आरामध्ये आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू झाला आहे.

ओडिशामध्ये १० जणांचा मृत्यू - राउरकेला सरकारी रुग्णालयाचे (आरजीएच) प्रभारी संचालक (डीआयसी) डॉ सुधराणी प्रधान यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत्यू दुपारी २ वाजल्यापासून सहा तासांच्या आत झाले आहेत. रुग्णालयात पोहचेपर्यंत ८ जणांचा मृत्यू झाला होता. तर उरलेल्यांचा येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. या लोकांच्या शरीराचे तापमान जवळपास 103-104 डिग्री फॅरेनहाइट होते. जे हवामानाचा विचार करता खूप अधिक आहे. आणखीही काही लोकांवर उपचार सुरू आहेत.

झारखंडमध्ये ५ जणांचा मृत्यू - गेल्या २४ तासांत येथे पाच लोकांचा मृत्यू झाला. मेदिनीनगर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हमीदगंज येथील रहिवासी विकास कुमारचा (35) मृत्यू झाला. थकबाकीची रक्कम घेण्यासाठी विकास बुधवारी पंकी येथे गेला होता. सायंकाळी परतल्यानंतर तो कचहरी चौकाजवळ अचानक कोसळला. याशिवाय, उत्तर प्रदेशातील कानपूर येथून येणारा एक प्रवासी डालटनगंज रेल्वे स्थानकावर उष्णतेमुळे बेशुद्ध पडला, त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अनिल कुमार अवस्थी असे या प्रवाशाचे नाव आहे. तसेच, डाल्टनगंज रेल्वे स्थानक परिसरात एका अनोळखी महिलेचा आणि पाटण येथील मुनेश्वर भुईया यांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.

राजस्थानातही ५ जणांचा मृत्यू -राजस्थान सरकारने गुरुवारी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात उष्णतेच्या लाटेमुळे आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाचे संचालक डॉ. रविप्रकाश माथूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, उन्हाच्या लाटेतही राज्यातील परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे. आरोग्य विभागाने मार्चपासून आवश्यक तयारी सुरू केली होती. माथूर म्हणाले, राज्यात उष्णतेच्या लाटेमुळे आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला आहे.

काही दिवस कायम राहणार उन्हाची लाट -येथे काही दिवस बिहारच्या अनेक भागांत उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. गुरुवारी ४७.१ अंश तापमानासह बक्सर हे बिहारमधील सर्वात उष्ण ठिकाण ठरले. तर झारखंडमधील पलामू येथेही ४७.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. याशिवाय, ज्या ठिकाणी ४४ अंश सेल्सिअसपेक्षाही अधिक तापमानाची नोंद झाली, त्यांत औरंगाबाद (४६.१ अंश सेल्सिअस), डेहरी (४६ अंश सेल्सिअस), गया (४५.२ अंश सेल्सिअस), अरवाल (४४.८ अंश सेल्सिअस) आणि भोजपूर (४४.१ अंश सेल्सिअस) तसेच, पाटणा येथे कमाल तापमान ४०.७ अंश सेल्सिअसपर्यंत नोंदवण्यात आले आहे.

टॅग्स :Sun strokeउष्माघातDeathमृत्यूhospitalहॉस्पिटलBiharबिहारOdishaओदिशाJharkhandझारखंड