शहरं
Join us  
Trending Stories
1
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
2
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
3
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
4
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
5
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
6
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
7
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
8
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
9
युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त
10
99 टक्क्यांहूनही अधिकने घसरून थेट 60 पैशांवर आला होता हा पॉवर शेअर, आता 2857 टक्क्यांची तुफान तेजी!
11
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद
12
"पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट
13
Mumbai Local Accident: स्वप्नातंल घर घ्यायला बाहेर पडला अन्...; रेल्वे अपघातात आयटी इंजिनिअरचा दुर्दैवी अंत!
14
कमाल झाली! थ्रो मारला स्ट्राइक एन्डला अन् रन आउटची विकेट मिळाली नॉन स्ट्राइक एन्डला (VIDEO)
15
Sonam Raghuvanshi : राजाच्या चेहऱ्यावर हसू अन् सोनमच्या डोक्यात हत्येचं प्लॅनिंग? लग्नातला 'तो' Video तुफान व्हायरल
16
प्रियकर राज शिलाँगला गेलाच नाही! राजाच्या हत्येची सुपारी अन् सोनमसोबत गुपचूप फोनाफोनी...   
17
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
18
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
19
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 

उन्हाचा तडाखा ठरतोय जीवघेणा! बिहारमध्ये २०, ओडिशात १० तर...; जाणून घ्या कुठे किती जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2024 11:29 IST

गुरुवारी ४७.१ अंश तापमानासह बक्सर हे बिहारमधील सर्वात उष्ण ठिकाण ठरले. तर झारखंडमधील पलामू येथेही ४७.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

संपूर्ण देशभरात उन्हाचा कडाका कायम आहे. यामुळे देशातील काही भागांतून मृत्यूच्या घटनाही समोर येत आहेत. बिहार, झारखंड, राजस्थान आणि ओडिशा सारख्या राज्यांत उन्हाच्या तीव्रतेमुळे लोक दगावत आहेत. बिहारमधील औरंगाबादच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उष्णतेच्या लाटेमुळे १२ जणांचा मृत्यू झाला असून, २० हून अधिक लोक वेगवेगळ्या रुग्णालयांत दाखल आहेत. याशिवाय झारखंड, ओडिशा आणि राजस्थानातही मृत्यूच्या घटना घडल्याचे वृत्त आहे.

बिहारमध्ये उष्णतेच्या लाटेने २० जणांचा मृत्यू -बिहारमध्येही उन्हाने कहर केला आहे. येथील वेगवेगळ्या राज्यांतून मृत्यूचे वृत्त आहे. उष्णतेमुळे औरंगाबादमध्ये १२ जणांचा मृत्यू झाला. तर २० हून अधिक लोक वेगवेगळ्या रुग्णालयांत दाखल आहेत. बक्सरमध्ये दोन मतदान कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तर आरामध्ये आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू झाला आहे.

ओडिशामध्ये १० जणांचा मृत्यू - राउरकेला सरकारी रुग्णालयाचे (आरजीएच) प्रभारी संचालक (डीआयसी) डॉ सुधराणी प्रधान यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत्यू दुपारी २ वाजल्यापासून सहा तासांच्या आत झाले आहेत. रुग्णालयात पोहचेपर्यंत ८ जणांचा मृत्यू झाला होता. तर उरलेल्यांचा येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. या लोकांच्या शरीराचे तापमान जवळपास 103-104 डिग्री फॅरेनहाइट होते. जे हवामानाचा विचार करता खूप अधिक आहे. आणखीही काही लोकांवर उपचार सुरू आहेत.

झारखंडमध्ये ५ जणांचा मृत्यू - गेल्या २४ तासांत येथे पाच लोकांचा मृत्यू झाला. मेदिनीनगर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हमीदगंज येथील रहिवासी विकास कुमारचा (35) मृत्यू झाला. थकबाकीची रक्कम घेण्यासाठी विकास बुधवारी पंकी येथे गेला होता. सायंकाळी परतल्यानंतर तो कचहरी चौकाजवळ अचानक कोसळला. याशिवाय, उत्तर प्रदेशातील कानपूर येथून येणारा एक प्रवासी डालटनगंज रेल्वे स्थानकावर उष्णतेमुळे बेशुद्ध पडला, त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अनिल कुमार अवस्थी असे या प्रवाशाचे नाव आहे. तसेच, डाल्टनगंज रेल्वे स्थानक परिसरात एका अनोळखी महिलेचा आणि पाटण येथील मुनेश्वर भुईया यांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.

राजस्थानातही ५ जणांचा मृत्यू -राजस्थान सरकारने गुरुवारी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात उष्णतेच्या लाटेमुळे आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाचे संचालक डॉ. रविप्रकाश माथूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, उन्हाच्या लाटेतही राज्यातील परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे. आरोग्य विभागाने मार्चपासून आवश्यक तयारी सुरू केली होती. माथूर म्हणाले, राज्यात उष्णतेच्या लाटेमुळे आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला आहे.

काही दिवस कायम राहणार उन्हाची लाट -येथे काही दिवस बिहारच्या अनेक भागांत उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. गुरुवारी ४७.१ अंश तापमानासह बक्सर हे बिहारमधील सर्वात उष्ण ठिकाण ठरले. तर झारखंडमधील पलामू येथेही ४७.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. याशिवाय, ज्या ठिकाणी ४४ अंश सेल्सिअसपेक्षाही अधिक तापमानाची नोंद झाली, त्यांत औरंगाबाद (४६.१ अंश सेल्सिअस), डेहरी (४६ अंश सेल्सिअस), गया (४५.२ अंश सेल्सिअस), अरवाल (४४.८ अंश सेल्सिअस) आणि भोजपूर (४४.१ अंश सेल्सिअस) तसेच, पाटणा येथे कमाल तापमान ४०.७ अंश सेल्सिअसपर्यंत नोंदवण्यात आले आहे.

टॅग्स :Sun strokeउष्माघातDeathमृत्यूhospitalहॉस्पिटलBiharबिहारOdishaओदिशाJharkhandझारखंड