शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

जीवघेणी गरमी; इलेक्शन ड्युटीवर गेलेल्या 22 कर्मचाऱ्यांचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक....

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2024 22:02 IST

यूपी-बिहारमध्ये गेल्या 24 तासात 22 कर्मचाऱ्यांच्या मृत्यूमुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे.

Heat Wave Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यासाठी उद्या, म्हणजेच 1 जून रोजी मतदान होत आहे. या टप्प्यात एकूण 57 जागांवर मतदान होणार आहे, ज्यात उत्तर प्रदेशातील लोकसभेच्या 13 आणि बिहारमधील 8 जागांचा समावेश आहे. यासाठी सरकारी यंत्रणा सज्ज असून, अधिकारी आपापल्या बूथकडे रवाना झाले आहेत. पण, अशातच कडक उन्हाळ्यामुळे कर्मचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये तर गेल्या 24 तासांत एकूण 22 जणांचा मृत्यू झाला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेसातील मिर्झापूर जिल्ह्यात शुक्रवारी संध्याकाळी तीन कर्मचाऱ्यांसह सहा होमगार्ड जवानांचा मृत्यू झाला, तर 17 जवान रुग्णालयात दाखल आहेत. सोनभद्र जिल्ह्यातदेखील तीन मतदान कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे, बिहारमध्ये उन्हाने 10 मतदान कर्मचाऱ्यांचा जीव घेतला. या सर्वांचा मृत्यू कसा झाला याबाबत डॉक्टरांनी अद्याप काहीही सांगितले नसले तरी उष्माघाताने मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सध्या यूपी, बिहार, झारखंड, राजस्थान, दिल्ली आणि मध्य प्रदेशसह इतर अनेक राज्ये प्रचंड उष्णतेची लाट आहे. सकाळी सुरू झालेली उष्णतेची लाट अगदी संध्याकाळ आणि रात्रीदेखील जाणवत आहे. निवडणूक आयोगाने मतदानाची सर्व तयारी पूर्ण केली असली तरी 45 ते 48 अंश कडक उन्हात कर्मचाऱ्यांना मोठा त्रास सहान करावा लागत आहे. सध्या प्रशासनाने सर्वांना उन्हापासून वाचण्यासाठी योग्य त्या सूचना दिल्या आहेत. तसेच, प्रशासनाकडूनही योग्य ती पाऊले उचलली जात आहेत.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Heat Strokeउष्माघातUttar Pradeshउत्तर प्रदेशBiharबिहार