शहरं
Join us  
Trending Stories
1
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
2
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
3
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
4
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
5
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
6
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
7
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
8
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
9
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
10
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
11
डाव्यांच्या गडाला हादरे! माजी आयपीएस आर. श्रीलेखा तिरुवनंतपुरमच्या महापौर होण्याची शक्यता, केरळमध्ये भाजपला मोठे यश  
12
इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की...
13
मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे यांचे संघस्थानी नमन, अजित पवार गटासह काही आमदार-मंत्र्यांची मात्र दांडी
14
हवा बिघडली अन् वारे फिरले; धुराने कोंडला मुंबईकरांचा श्वास! धूळ, धुके, धुराच्या संयुक्त मिश्रणाने प्रदूषणात वाढ
15
'१९ डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होणार, भारताचा पंतप्रधान मराठी माणूस बनणार', पृथ्वीराज चव्हाणांचे भाकीत!
16
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
Daily Top 2Weekly Top 5

जीवघेणी गरमी; इलेक्शन ड्युटीवर गेलेल्या 22 कर्मचाऱ्यांचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक....

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2024 22:02 IST

यूपी-बिहारमध्ये गेल्या 24 तासात 22 कर्मचाऱ्यांच्या मृत्यूमुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे.

Heat Wave Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यासाठी उद्या, म्हणजेच 1 जून रोजी मतदान होत आहे. या टप्प्यात एकूण 57 जागांवर मतदान होणार आहे, ज्यात उत्तर प्रदेशातील लोकसभेच्या 13 आणि बिहारमधील 8 जागांचा समावेश आहे. यासाठी सरकारी यंत्रणा सज्ज असून, अधिकारी आपापल्या बूथकडे रवाना झाले आहेत. पण, अशातच कडक उन्हाळ्यामुळे कर्मचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये तर गेल्या 24 तासांत एकूण 22 जणांचा मृत्यू झाला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेसातील मिर्झापूर जिल्ह्यात शुक्रवारी संध्याकाळी तीन कर्मचाऱ्यांसह सहा होमगार्ड जवानांचा मृत्यू झाला, तर 17 जवान रुग्णालयात दाखल आहेत. सोनभद्र जिल्ह्यातदेखील तीन मतदान कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे, बिहारमध्ये उन्हाने 10 मतदान कर्मचाऱ्यांचा जीव घेतला. या सर्वांचा मृत्यू कसा झाला याबाबत डॉक्टरांनी अद्याप काहीही सांगितले नसले तरी उष्माघाताने मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सध्या यूपी, बिहार, झारखंड, राजस्थान, दिल्ली आणि मध्य प्रदेशसह इतर अनेक राज्ये प्रचंड उष्णतेची लाट आहे. सकाळी सुरू झालेली उष्णतेची लाट अगदी संध्याकाळ आणि रात्रीदेखील जाणवत आहे. निवडणूक आयोगाने मतदानाची सर्व तयारी पूर्ण केली असली तरी 45 ते 48 अंश कडक उन्हात कर्मचाऱ्यांना मोठा त्रास सहान करावा लागत आहे. सध्या प्रशासनाने सर्वांना उन्हापासून वाचण्यासाठी योग्य त्या सूचना दिल्या आहेत. तसेच, प्रशासनाकडूनही योग्य ती पाऊले उचलली जात आहेत.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Heat Strokeउष्माघातUttar Pradeshउत्तर प्रदेशBiharबिहार