शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

हृदयद्रावक! आई-वडील, मुलगा मुलगी, एकाच चितेवर चौघांवर अंत्यसंस्कार, त्या अपघातानं संपूर्ण कुटुंबच संपवलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2021 16:17 IST

Accident News: मध्य प्रदेशमधील सतनाजवळ झालेल्या भीषण अपघातामध्ये संपूर्ण कुटुंबाचाच अंत झाला आहे. एका भरधाव ट्रकने कारला दिलेल्या टक्करीमुळे झालेल्या भीषण अपघातामध्ये कारमधील पती पत्नी आणि त्यांच्या दोन लहान मुलांचा मृत्यू झाला आहे.

भोपाळ - मध्य प्रदेशमधील सतनाजवळ झालेल्या भीषण अपघातामध्ये संपूर्ण कुटुंबाचाच अंत झाला आहे. एका भरधाव ट्रकने कारला दिलेल्या टक्करीमुळे झालेल्या भीषण अपघातामध्ये कारमधील पती पत्नी आणि त्यांच्या दोन लहान मुलांचा मृत्यू झाला आहे. हे कुटुंब जमताल येथीर राहणारे होते. तसेच एका विवाह सोहळ्यामध्ये उपस्थिती लावून हे कुटुंब माघारी परतत होते. त्यादरम्यान रात्री उशिरा हा अपघात झाला. दरम्यान, या संपूर्ण कुटुंबाला एकाच चितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सतना जिल्ह्यातील मेहरमधील जीतनगरजवळ हा अपघात झाला. भरधाव वेगाने जात असलेल्या ट्रकने कारला समोरून धडक दिली. ही घडक एवढी जोरात होती की त्यामुळे आई-वडील आणि मुलीचा जागीच मृत्यू झाला. तर मुलाचा जबलपूरमधील रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला.दरम्यान, पोलिसांना ट्रकचालकाला ताब्यात घेतले आहे.

मैहर पोलीस ठाण्याच्या क्षेत्रातील जीतनगर गावाजवळ हा अपघात झाला. भरधाव ट्रकने मारुती स्विफ्टला धडक दिली. ही टक्कर होती की त्यामुळे एक मोठा आवाज झाला आणि काही वेळातच सारे काही संपले. या अपघातात जमताल येथील सत्यम उपाध्याय  (४० वर्षे), त्यांची पत्नी मोनिका (३५ वर्षे), मुलगी इशानी ८ वर्षे आणि मुलगा स्नेह (१० वर्षे) यांचा मृत्यू झाला.

मृत सत्यम उपाध्याय यांचे मोबाईल फोनचे दुकान होते. तसेच ते कुटुंबासह एखा विवाह सोहळ्यामध्ये गेले होते. त्यांच्या मृत्यूबाबत मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दु:ख व्यक्त केले आहे. सत्यम यांच्या गावात त्यांच्या मृत्यूची माहिती मिळताच खळबळ उडाली. दरम्यान, या सर्वांवर एकाच चितेवर ठेऊन अंत्यसंस्कार करण्यात आले.  

टॅग्स :AccidentअपघातFamilyपरिवारMadhya Pradeshमध्य प्रदेश