शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

हृदयद्रावक! गरिबीमुळे मजुराचा मृतदेह गावी नेता न आल्याने कुटुंबाने प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून केले अंत्यसंस्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2020 16:06 IST

लॉकडाऊनमुळे अनेकांना आपल्या निकटवर्तीयांच्या सुख-दुःखात सहभागी होणे अशक्य झाले आहे.  दरम्यान, असाच एक हृदयद्रावक प्रकार समोर आला आहे.

नवी दिल्ली - कोरोना विषाणूच्या संसर्ग रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. मात्र जवळपास गेल्या महिनाभरापासून सुरू असलेले लॉकडाऊन गोरगरीबांसाठी दुहेरी संकट ठरत आहे. लॉकडाऊनमुळे अनेक मजूर विविध ठिकाणी अडकून पडले आहेत. तर अनेकांना आपल्या निकटवर्तीयांच्या सुख-दुःखात सहभागी होणे अशक्य झाले आहे.  दरम्यान, असाच एक हृदयद्रावक प्रकार समोर आला आहे. कांजण्या होऊन दिल्लीतमृत्यू झालेल्या एका मजुराचा मृतदेह गावी आणता न आल्याने त्याची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्याची वेळ कुटुंबीयांवर आली. 

हा प्रकार उत्तर प्रदेशमधील गोरखपूर जिल्ह्यात घडला. येथील सुनील मजूर दिल्लीत मोलमजुरी करून उदरनिर्वाह करत होता. दरम्यान, 37 वर्षीय सुनीलचा कांजण्या होऊन मृत्यू झाला. मात्र प्रचंड गरिबीमुळे त्याच्या कुटुंबाला त्याचा मृतदेह गावी आणण्याची व्यवस्था करता आली नाही. त्यामुळे अखेरीस त्याच्या कुटुंबाने प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून त्याच्यावर अंत्यसंस्कार केले. 

याबाबत सुनीलची पत्नी पूनम हिने सांगितले की, सुरुवातीला आम्ही सुनीलचा मृतदेह परत आणण्यासाठी खूप प्रयत्न केले, पण ते शक्य झाले नाही. त्यानंतर गावच्या सरपंचांना सांगून आम्ही दिल्ली पोलिसांना फोन करून त्यांच्यावर दिल्लीतच अंत्यसंस्कार करण्याची विनंती केली. माझी लहान मुले आहेत. सध्या रेल्वे बंद आहेत. खासगी गाडीचे भाडे परवडणारे नाही. लॉकडाऊन आणि आर्थिक अडचणीमुळे आम्ही मृतदेह आणण्यासाठी दिल्लीत येऊ शकत नाही, असे मी पोलिसांना सांगितले.'दरम्यान, दिल्ली पोलिसांनी सुनीलवरच्या अंत्यसंस्काराची औपचारिकता पूर्ण केलेली नाही. अंत्यसंस्कारासाठी कुटुंबियांकडून उत्तर प्रदेश सरकारच्या परवानगीची वाट ते पाहत आहेत. आता सुनीलच्या पत्नीने परवानगी पत्रावर सह्या केल्या असून, हा अर्ज लवकरच दिल्ली पोलिसांपर्यंत पोहोचेल असे त्याच्या गावाच्या सरपंचाने सांगितले.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशdelhiदिल्लीDeathमृत्यूcorona virusकोरोना वायरस बातम्या