शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

२ भावांच्या मृत्यूची ह्दयस्पर्शी कहाणी; एकाच दिवशी दोघांनी सोडले प्राण, कुटुंबावर शोककळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2022 17:31 IST

डांगराली गावात रावताराम आणि हिराराम यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे

सिरोही – राजस्थानच्या सिरोहीमध्ये एक ह्द्रयद्रावक घटना घडली आहे. जी ऐकून अनेकांच्या डोळ्यात नकळत पाणी आले. याठिकाणी एकाच दिवशी दोन भाऊ मृत्यूवेळीही एकत्रच गेले. सध्या या दोन भावांच्या प्रेमाची चर्चा परिसरात सगळीकडे पसरली आहे. इतकचं नाही तर सोशल मीडियातही व्हायरल होत आहे. दोन भावांमधील हे प्रेमाचं नातं आणि अखेरच्या काळातही साथ न सोडणं याबद्दल लोकांना कौतुक वाटत आहे. नेमकं काय घडलं याबाबत आपण जाणून घेऊया.

राजस्थानच्या सिरोही येथील डांगराली गावात दोन वृद्ध भावांचा रावताराम आणि हिराराम देवासी यांना देवाज्ञा झाली. या दोघांचा जन्म भलेही काही वर्षाच्या अंतराने झाला असेल परंतु हे भाऊ आयुष्यभर एकत्रच राहिले. दोघांचं लग्नही एकाच दिवशी झालं त्याचसोबत या दोघांनी एकाच दिवशी जगाचा अखेरचा निरोप घेतला. रावताराम आणि हिराराम अखेरच्या श्वासही १५-२० मिनिटांच्या अंतराने घेतला. जन्मापासून आयुष्यभर या दोन भावांनी इतकी साथ निभावली की अनेकजण त्यांच्या नात्याचं उदाहरण देत होते.

डांगराली गावात रावताराम आणि हिराराम यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. घरातील दोन वृद्ध व्यक्ती एकाच वेळी मृत्युमुखी पडले. आता रावताराम यांचा मोठा मुलगा भिकाजी यांच्यावर कुटुंबाची जबाबदारी आली आहे. भिकाजीवर पिता रावताराम आणि काका हिराराम यांनी संपत्ती सांभाळण्याची जबाबदारी दिली आहे. दोन्ही कुटुंबात एकूण ११ भाऊ बहिणी आहेत.

मृत्यूच्या एक दिवस आधी काय घडलं?

भिकाजी यांनी मृत्यूपूर्वीचा किस्सा सांगताना भावूक झाले. ते म्हणाले की, वडील रावताराम आणि हिराराम यांच्या प्रेमाचे, भाऊबंदकीचे किस्से परिसरात प्रसिद्ध होते. आजही रावताराम आणि हिराराम एकाच दिवशी अशाप्रकारे कुटुंबाला सोडून गेले यावर विश्वास बसत नाही. मागील काही दिवसांपासून काका हिराराम अस्वस्थ होते. परंतु माझे वडील रावताराम एकदम निरोगी होते. २८ जानेवारीला सकाळपासून वडिलांनी काहीच खाल्ले नाही असं भिकाजीने सांगितले.

जेव्हा आईला कळालं वडिलांनी काही खाल्लं नाही तेव्हा तिने वडिलांना खाण्याचा आग्रह धरला. आईच्या सांगण्यावरुन वडिलांनी बिस्किट खाल्ले आणि काकाच्या तब्येतीची विचारपूस केली. त्यानंतर ते झोपले आणि पुन्हा उठलेच नाही. २९ जानेवारीला सकाळी ८ ते ९ दरम्यान वडिलांनी प्राण त्याग केला. तर दुसरीकडे हिराराम काकांना थंडी वाजायला लागली म्हणून बाहेर उन्हात काही वेळ झोपवले तेव्हा काही क्षणातच हिराराम यांनीही प्राण सोडला.