शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
6
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
7
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
8
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
9
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
10
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
11
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
12
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
13
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
14
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
15
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
16
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
17
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
18
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
19
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
20
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार

२ भावांच्या मृत्यूची ह्दयस्पर्शी कहाणी; एकाच दिवशी दोघांनी सोडले प्राण, कुटुंबावर शोककळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2022 17:31 IST

डांगराली गावात रावताराम आणि हिराराम यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे

सिरोही – राजस्थानच्या सिरोहीमध्ये एक ह्द्रयद्रावक घटना घडली आहे. जी ऐकून अनेकांच्या डोळ्यात नकळत पाणी आले. याठिकाणी एकाच दिवशी दोन भाऊ मृत्यूवेळीही एकत्रच गेले. सध्या या दोन भावांच्या प्रेमाची चर्चा परिसरात सगळीकडे पसरली आहे. इतकचं नाही तर सोशल मीडियातही व्हायरल होत आहे. दोन भावांमधील हे प्रेमाचं नातं आणि अखेरच्या काळातही साथ न सोडणं याबद्दल लोकांना कौतुक वाटत आहे. नेमकं काय घडलं याबाबत आपण जाणून घेऊया.

राजस्थानच्या सिरोही येथील डांगराली गावात दोन वृद्ध भावांचा रावताराम आणि हिराराम देवासी यांना देवाज्ञा झाली. या दोघांचा जन्म भलेही काही वर्षाच्या अंतराने झाला असेल परंतु हे भाऊ आयुष्यभर एकत्रच राहिले. दोघांचं लग्नही एकाच दिवशी झालं त्याचसोबत या दोघांनी एकाच दिवशी जगाचा अखेरचा निरोप घेतला. रावताराम आणि हिराराम अखेरच्या श्वासही १५-२० मिनिटांच्या अंतराने घेतला. जन्मापासून आयुष्यभर या दोन भावांनी इतकी साथ निभावली की अनेकजण त्यांच्या नात्याचं उदाहरण देत होते.

डांगराली गावात रावताराम आणि हिराराम यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. घरातील दोन वृद्ध व्यक्ती एकाच वेळी मृत्युमुखी पडले. आता रावताराम यांचा मोठा मुलगा भिकाजी यांच्यावर कुटुंबाची जबाबदारी आली आहे. भिकाजीवर पिता रावताराम आणि काका हिराराम यांनी संपत्ती सांभाळण्याची जबाबदारी दिली आहे. दोन्ही कुटुंबात एकूण ११ भाऊ बहिणी आहेत.

मृत्यूच्या एक दिवस आधी काय घडलं?

भिकाजी यांनी मृत्यूपूर्वीचा किस्सा सांगताना भावूक झाले. ते म्हणाले की, वडील रावताराम आणि हिराराम यांच्या प्रेमाचे, भाऊबंदकीचे किस्से परिसरात प्रसिद्ध होते. आजही रावताराम आणि हिराराम एकाच दिवशी अशाप्रकारे कुटुंबाला सोडून गेले यावर विश्वास बसत नाही. मागील काही दिवसांपासून काका हिराराम अस्वस्थ होते. परंतु माझे वडील रावताराम एकदम निरोगी होते. २८ जानेवारीला सकाळपासून वडिलांनी काहीच खाल्ले नाही असं भिकाजीने सांगितले.

जेव्हा आईला कळालं वडिलांनी काही खाल्लं नाही तेव्हा तिने वडिलांना खाण्याचा आग्रह धरला. आईच्या सांगण्यावरुन वडिलांनी बिस्किट खाल्ले आणि काकाच्या तब्येतीची विचारपूस केली. त्यानंतर ते झोपले आणि पुन्हा उठलेच नाही. २९ जानेवारीला सकाळी ८ ते ९ दरम्यान वडिलांनी प्राण त्याग केला. तर दुसरीकडे हिराराम काकांना थंडी वाजायला लागली म्हणून बाहेर उन्हात काही वेळ झोपवले तेव्हा काही क्षणातच हिराराम यांनीही प्राण सोडला.