शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
2
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
3
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
4
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
5
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
6
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
7
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
8
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
9
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
10
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
11
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
12
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
13
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
14
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
15
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
16
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
17
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
18
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
19
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
20
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!

२ भावांच्या मृत्यूची ह्दयस्पर्शी कहाणी; एकाच दिवशी दोघांनी सोडले प्राण, कुटुंबावर शोककळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2022 17:31 IST

डांगराली गावात रावताराम आणि हिराराम यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे

सिरोही – राजस्थानच्या सिरोहीमध्ये एक ह्द्रयद्रावक घटना घडली आहे. जी ऐकून अनेकांच्या डोळ्यात नकळत पाणी आले. याठिकाणी एकाच दिवशी दोन भाऊ मृत्यूवेळीही एकत्रच गेले. सध्या या दोन भावांच्या प्रेमाची चर्चा परिसरात सगळीकडे पसरली आहे. इतकचं नाही तर सोशल मीडियातही व्हायरल होत आहे. दोन भावांमधील हे प्रेमाचं नातं आणि अखेरच्या काळातही साथ न सोडणं याबद्दल लोकांना कौतुक वाटत आहे. नेमकं काय घडलं याबाबत आपण जाणून घेऊया.

राजस्थानच्या सिरोही येथील डांगराली गावात दोन वृद्ध भावांचा रावताराम आणि हिराराम देवासी यांना देवाज्ञा झाली. या दोघांचा जन्म भलेही काही वर्षाच्या अंतराने झाला असेल परंतु हे भाऊ आयुष्यभर एकत्रच राहिले. दोघांचं लग्नही एकाच दिवशी झालं त्याचसोबत या दोघांनी एकाच दिवशी जगाचा अखेरचा निरोप घेतला. रावताराम आणि हिराराम अखेरच्या श्वासही १५-२० मिनिटांच्या अंतराने घेतला. जन्मापासून आयुष्यभर या दोन भावांनी इतकी साथ निभावली की अनेकजण त्यांच्या नात्याचं उदाहरण देत होते.

डांगराली गावात रावताराम आणि हिराराम यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. घरातील दोन वृद्ध व्यक्ती एकाच वेळी मृत्युमुखी पडले. आता रावताराम यांचा मोठा मुलगा भिकाजी यांच्यावर कुटुंबाची जबाबदारी आली आहे. भिकाजीवर पिता रावताराम आणि काका हिराराम यांनी संपत्ती सांभाळण्याची जबाबदारी दिली आहे. दोन्ही कुटुंबात एकूण ११ भाऊ बहिणी आहेत.

मृत्यूच्या एक दिवस आधी काय घडलं?

भिकाजी यांनी मृत्यूपूर्वीचा किस्सा सांगताना भावूक झाले. ते म्हणाले की, वडील रावताराम आणि हिराराम यांच्या प्रेमाचे, भाऊबंदकीचे किस्से परिसरात प्रसिद्ध होते. आजही रावताराम आणि हिराराम एकाच दिवशी अशाप्रकारे कुटुंबाला सोडून गेले यावर विश्वास बसत नाही. मागील काही दिवसांपासून काका हिराराम अस्वस्थ होते. परंतु माझे वडील रावताराम एकदम निरोगी होते. २८ जानेवारीला सकाळपासून वडिलांनी काहीच खाल्ले नाही असं भिकाजीने सांगितले.

जेव्हा आईला कळालं वडिलांनी काही खाल्लं नाही तेव्हा तिने वडिलांना खाण्याचा आग्रह धरला. आईच्या सांगण्यावरुन वडिलांनी बिस्किट खाल्ले आणि काकाच्या तब्येतीची विचारपूस केली. त्यानंतर ते झोपले आणि पुन्हा उठलेच नाही. २९ जानेवारीला सकाळी ८ ते ९ दरम्यान वडिलांनी प्राण त्याग केला. तर दुसरीकडे हिराराम काकांना थंडी वाजायला लागली म्हणून बाहेर उन्हात काही वेळ झोपवले तेव्हा काही क्षणातच हिराराम यांनीही प्राण सोडला.