शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

अग्निपथ योजनेविरोधातील सर्वच याचिकांवर सुनावणी, दिल्ली कोर्टातून निर्णय आला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2023 12:26 IST

केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेला आव्हान देणाऱ्या सर्वच याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळून लावल्या आहेत

केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेला मोठा विरोध झाला. ही योजना म्हणजे सैन्य भरतीचं कंत्राटीकरण असल्याचाही आरोप झाला. काँग्रेस नेते राहुल गांधींसह विरोधकांना या योजनेवरुन केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. मात्र, ही योजना सैन्य दलातील अधिकाऱ्यांनीच आखलेली असल्याचं सरकारने म्हटले. तसेच, ही योजना लागू करण्यात आली असून याअंतर्गत पहिल्या बॅचची भरतीही झाली आहे. आता, या योजनेसंदर्भात आव्हान देणाऱ्या दिल्लीउच्च न्यायालयातील याचिकांवर सुनावणी झाली. त्यात, न्यायालयाने या सर्वच याचिका फेटाळून लावल्या आहेत. 

केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेला आव्हान देणाऱ्या सर्वच याचिका दिल्लीउच्च न्यायालयाने फेटाळून लावल्या आहेत. या योजनेला लागू करण्याचा उद्देश हा आपल्या सैन्य दलास बळकटी देण्याचा आहे, हा निर्णय देशहिताचा आहे, असे मत न्यायालयाने नोंदवले आहे. दरम्यान, जुन्याच पद्धतीने सैन्य दलातील भरती प्रक्रिया राबविण्यात यावी, अशी मागणी याचिकेद्वारे केली होती, ही मागणी उचित नसल्याचं कोर्टाने म्हटलं आहे. 

देशातील अनेक राज्यात अग्निपथ योजनेला विरोध करत आव्हान देणाऱ्या याचिका न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत. त्यामुळे, हे प्रकरण दिल्लीच्या सर्वोच्च न्यायलायात पोहोचले. त्यानंतर, सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली उच्च न्यायालयात या याचिकांवर सुनावणी घेण्याचे सांगितले. दिल्ली उच्च न्यायालयात आज मुख्य न्यायाधीश न्या. सतीश चंद्र शर्मा आणि सुब्रमण्यम प्रसाद यांनी याचिकांवरील सुनावणी पूर्ण केली. यावेळी, सैन्य दलातील अग्निपथ योजना ही सैन्य भरती प्रक्रियेतील मोठा बदल आहे, नितीगत बदलांचा एक मोठा भाग आहे, असा प्रतिवाद केंद्र सरकारने या याचिकेदरम्यान केला होता. त्यावर, न्यायालयाने सर्वच याचिका फेटाळल्या आहेत.  

टॅग्स :Agneepath Schemeअग्निपथ योजनाHigh Courtउच्च न्यायालयdelhiदिल्लीDefenceसंरक्षण विभागIndian Armyभारतीय जवान