शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

अग्निपथ योजनेविरोधातील सर्वच याचिकांवर सुनावणी, दिल्ली कोर्टातून निर्णय आला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2023 12:26 IST

केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेला आव्हान देणाऱ्या सर्वच याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळून लावल्या आहेत

केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेला मोठा विरोध झाला. ही योजना म्हणजे सैन्य भरतीचं कंत्राटीकरण असल्याचाही आरोप झाला. काँग्रेस नेते राहुल गांधींसह विरोधकांना या योजनेवरुन केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. मात्र, ही योजना सैन्य दलातील अधिकाऱ्यांनीच आखलेली असल्याचं सरकारने म्हटले. तसेच, ही योजना लागू करण्यात आली असून याअंतर्गत पहिल्या बॅचची भरतीही झाली आहे. आता, या योजनेसंदर्भात आव्हान देणाऱ्या दिल्लीउच्च न्यायालयातील याचिकांवर सुनावणी झाली. त्यात, न्यायालयाने या सर्वच याचिका फेटाळून लावल्या आहेत. 

केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेला आव्हान देणाऱ्या सर्वच याचिका दिल्लीउच्च न्यायालयाने फेटाळून लावल्या आहेत. या योजनेला लागू करण्याचा उद्देश हा आपल्या सैन्य दलास बळकटी देण्याचा आहे, हा निर्णय देशहिताचा आहे, असे मत न्यायालयाने नोंदवले आहे. दरम्यान, जुन्याच पद्धतीने सैन्य दलातील भरती प्रक्रिया राबविण्यात यावी, अशी मागणी याचिकेद्वारे केली होती, ही मागणी उचित नसल्याचं कोर्टाने म्हटलं आहे. 

देशातील अनेक राज्यात अग्निपथ योजनेला विरोध करत आव्हान देणाऱ्या याचिका न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत. त्यामुळे, हे प्रकरण दिल्लीच्या सर्वोच्च न्यायलायात पोहोचले. त्यानंतर, सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली उच्च न्यायालयात या याचिकांवर सुनावणी घेण्याचे सांगितले. दिल्ली उच्च न्यायालयात आज मुख्य न्यायाधीश न्या. सतीश चंद्र शर्मा आणि सुब्रमण्यम प्रसाद यांनी याचिकांवरील सुनावणी पूर्ण केली. यावेळी, सैन्य दलातील अग्निपथ योजना ही सैन्य भरती प्रक्रियेतील मोठा बदल आहे, नितीगत बदलांचा एक मोठा भाग आहे, असा प्रतिवाद केंद्र सरकारने या याचिकेदरम्यान केला होता. त्यावर, न्यायालयाने सर्वच याचिका फेटाळल्या आहेत.  

टॅग्स :Agneepath Schemeअग्निपथ योजनाHigh Courtउच्च न्यायालयdelhiदिल्लीDefenceसंरक्षण विभागIndian Armyभारतीय जवान