शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

अयोध्या वादामुळे लटकली मराठा आरक्षणाची सुनावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2019 6:15 AM

सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश अन्य कामात व्यस्त

विशेष प्रतिनिधी ।लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मराठा समाजास सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाचा दर्जा देऊन त्यांना सरकारी नोकऱ्या व शिक्षणामध्ये आरक्षण देण्याचा राज्य सरकारने केलेला कायदा वैध ठरविणाºया उच्च न्यायालयाच्या निकालाविरुद्ध केल्या गेलेल्या अपिलांची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात अयोध्या वादामुळे लटकली आहे. या अपिलांची सुनावणी करणाºया खंडपीठावरील सरन्यायाधीशांसह तिन्ही न्यायाधीश अयोध्या प्रकरणाच्या दैनंदिन सुनावणीत व्यस्त आहे. अयोध्येची ही सुनावणी केव्हा संपेल याची खात्री नसल्याने मराठा आरक्षणाचा विषयही तोपर्यंत लटकत राहणार आहे.

एकूण सहा अपिले सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. ती १२ जुलै रोजी सरन्यायाधीश न्या. रंजन गोगोई यांच्या खंडपीठापुढे सर्वप्रथम आली तेव्हा प्रतिवादींना नोटिसा काढल्या गेल्या. खंडपीठाने उच्च न्यायालयाच्या निकालास अंतरिम स्थगिती दिली नाही मात्र तशी स्थगिती द्यायची की नाही यावर दोन आठवड्यांनी विचार करण्याचे ठरविले होते.

त्यानुसार अंतरिम स्थगितीवर विचार करण्यासाठी ही अपिले जुलैच्या तिसºया आठवड्यात न्यायालयापुढे यायला हवी होती. परंतु त्यानंतर एक महिना उलटला तरी सुनावणीला मुहूर्त लागलेला नाही. २० जुलै रोजी ही अपिले रजिस्ट्रार सुरिंदर राठी यांच्यापुढे आली तेव्हा त्यांनी प्रतिवादींना चार आठवड्यांत प्रतिज्ञापत्रे करण्यास सांगून थेट २९ नोव्हेंबरची पुढील तारीख दिली होती.

अयोध्येची सुनावणी सुरु झाल्यानंतर एका अपिलकर्त्याच्या वकिलाने अन्य एका खंडपीठापुढे जाऊन ही परिस्थिती लक्षात आणून दिली तेव्हा सुयोग्य खंडपीठापुढे ही प्रकरणे लावली जावीत, असे निर्देश झाले. तेव्हापासून ही अपिले सरन्यायाधीश न्या. गोगोई, न्या. अशोक भूषण व न्या. एस. अब्दुल नझीर यांच्या खंडपीठाच्या बोर्डावर दाखविली जात आहेत. परंतु हे तिन्ही न्यायाधीश अयोध्या सुनावणी करणाºया घटनापीठावरही असल्याने या खंडपीठाचे काम स्वतंत्रपणे होत नाही.

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाSupreme Courtसर्वोच्च न्यायालय