शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

वडिलांनी पोराच्या शिक्षणासाठी शेत विकलं, पठ्ठ्यानं IPS बनून दाखवलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2020 11:53 IST

एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या इंद्रजीत यांच्या गावात गेल्या 5 दशकात कुणीही आयएएस किंवा आयपीएस अधिकारी झाले नव्हते.

ठळक मुद्दे एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या इंद्रजीत यांच्या गावात गेल्या 5 दशकात कुणीही आयएएस किंवा आयपीएस अधिकारी झाले नव्हतेशाळेत शिकत असताना, जिल्हा प्रशासन या धड्यासंदर्भात त्यांनी शिक्षकांना प्रश्न केला. जिल्ह्याचे सर्वात मोठे साहेब कोण, असा प्रश्न इंद्रजीत यांनी विचारला.

नवी दिल्ली - लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवणे म्हणजे स्वप्न साकार करणेच होय. स्वत:चे व आई-वडिलांचे स्वप्न सत्यात उतरवणे म्हणजे आयएएस किंवा आयपीएस अधिकारी बनने होय. नुकतेच राज्यसेवा परीक्षेचा निकाल जाहीर झाला, त्यामध्ये ग्रामीण भागातील तरुणांनी मोठ्या कष्टाने आणि जिद्दीने अधिकारीपदाची खुर्ची काबिज केली. ग्रामीण भागातील तरुणांसाठी हेच अधिकारी उद्यासाठी प्रेरणा ठरतात. इंद्रजीत महथा यांची सत्यकथाही अशीच प्रेरणादायी आहे. देशाच्या ग्रामीण भागातील तरुणांना, स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना एक ऊर्जा देणारी आहे. 

एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या इंद्रजीत यांच्या गावात गेल्या 5 दशकात कुणीही आयएएस किंवा आयपीएस अधिकारी झाले नव्हते. मात्र, इंद्रजीत यांनी आपल्या गावातून युपीएससी परीक्षा पास होऊन गावच्या इतिहासात विक्रमाची नोंद केली. झारखंड राज्याच्या बोकारो जिल्ह्यातील साबरा नावाच्या एका खेड्यात राहणाऱ्या इंद्राने युपीएससी परीक्षेत जीत मिळवली. गावातच, मातीने बांधलेल्या कौलारू घरातच ते आपल्या कुटुंबासमवेत राहत होते. घराची अवस्था बिकट होती, घर पडायला आलं तेव्हा आई व बहिणी मामाकडे गेल्या. मात्र, इंद्रजीत यांनी आपल्या शिक्षणामुळे त्याच घरात राहणे पसंत केले. इंद्रजीत यांच्या मदतीने वडिलांनी घराची डागडुजी करुन घेतली. ते विटा द्यायचे तर वडिल रचून ते बांधकाम करायचे. 

शाळेत शिकत असताना, जिल्हा प्रशासन या धड्यासंदर्भात त्यांनी शिक्षकांना प्रश्न केला. जिल्ह्याचे सर्वात मोठे साहेब कोण, असा प्रश्न इंद्रजीत यांनी विचारला. त्यावर, शिक्षकांनी जिल्हाधिकारी असं उत्तर दिलं. तेव्हापासून जिल्हाधिकारी कोण, त्याचे अधिकार काय, या सर्वांची माहिती घेण्याचं काम इंद्रजीत यांनी केलं आणि भविष्यात आपणासही जिल्हाधिकारीच बनायचंय, असं स्वप्न त्यांनी बाळगलं. शाळेत शिकताना नवीन पुस्तकं विकत घ्यायचीही परिस्थिती नव्हती. त्यामुळेच जुनीच पुस्तके रद्दीच्या दुकानातून विकत घेऊन शिक्षण पूर्ण केलं.

इंद्रजीत यांनी पदवीनंतर पुढील शिक्षणासाठी दिल्ली गाठली, येथूनच त्यांच्या युपीएससी परीक्षेच्या तयारीला सुरुवात झाली. मुलाच्या दिल्लीतील शिक्षणाचा खर्च कुटुंबाला परवडणार नव्हता. त्यामुळे, वडिलांनी गावात असलेल्या जमिनीचा 80 टक्के भाग विकला. वडिलांनी आपल्या शिक्षणासाठी जमिन विकल्याची जाणीव इंद्रजीत यांना होती. मात्र, पहिल्या प्रयत्नात इंद्रजीत यांना युपीएससी परीक्षेत अपयश आले, त्यावेळीही वडिलांनी धीर देऊन त्यांचं मनोबल वाढवलं. त्यावेळी वडिलांनी वापरलेलं वाक्य इंद्रजीत यांना खूप काही सांगून गेलं. आता फक्त शेत विकलंय, तुला शिकविण्यासाठी मी किडनीही विकू शकतो, असे इंद्रजीत यांच्या वडिलांनी म्हटले. वडिलांचे हे वाक्य ऐकून इंद्रजीत यांचे डोळे पाणावले पण आत्मविश्वास अधिक वाढला. त्यानंतर, इंद्रजीत यांनी पुन्हा जोमाने अभ्यास सुरु केला अन् दुसऱ्या प्रयत्नात आयपीएस अधिकारी बनून दाखवलं. इंद्रजीत यांची ही प्रेरक सक्सेस स्टोरी गरीब घरातील विद्यार्थ्याचा आत्मविश्वास वाढवणारी आहे.  

टॅग्स :upscकेंद्रीय लोकसेवा आयोगFarmerशेतकरीJharkhandझारखंडPoliceपोलिस