शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
3
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
4
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
5
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
6
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
8
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
9
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
10
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
11
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
12
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
13
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
14
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
15
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
16
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
17
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
18
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
19
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
20
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?

शिक्षणासाठीच 20 वर्षापूर्वी गाव सोडलं, शेतकऱ्याचं पोरगं UPSC परीक्षेत देशात पहिलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2020 02:07 IST

आयएएस, आयपीएस, आयएफएस : जतीन किशोर द्वितीय, प्रतिभा वर्मा तृतीय

नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा (यूपीएससी २०१९) निकाल घोषित करण्यात आला असून, भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस), भारतीय पोलीस सेवा (आयपीएस) आणि भारतीय परराष्टÑ सेवेसह (आयएफएस) प्रतिष्ठित नागरी सेवेसाठी ८२९ उमेदवार पात्र झाले असून, देशभरातून भारतीय महसूल सेवेतील (आयआरएस) अधिकारी प्रदीप सिंह यांनी प्रथम स्थान पटकावले आहे.

पहिल्या तीन अग्रणी उमेदवारांत प्रदीप सिंह, जतीन किशोर आणि प्रतिभा वर्मा यांचा समावेश आहे. सिंह हे हरयाणाचे आहेत, तर जतीन किशोर दिल्लीचे आणि वर्मा उत्तर प्रदेशच्या आहेत. जतीन किशोर हे भारतीय आर्थिक सेवेतील (आयईएस) अधिकारी असून, सध्या ते ग्रामीण विकास मंत्रालयात सहायक संचालक आहेत. प्रतिभा वर्मा आयआरएस अधिकारी आहेत.

प्रतिष्ठित नागरी सेवेसाठी निवड झालेल्या ८२९ उमेदवारांना मिळालेले गुण पंधरा दिवसानंतर यूपीएसीच्या वेबसाईटवर जारी केले जाणार आहेत. कोरोनाच्या साथीमुळे परीक्षा, मुलाखतीसोबत निकाल घोषित करण्यास १८ महिने लागले. यापैकी १८० जणांची आयएएस, २४ जणांची आयएफएस आणि १५० उमेदवारांची आयपीएससाठी निवड झाली आहे. ४३९ ग्रुप ए, १३५ जण ग्रुप बी सेवेसाठी पात्र ठरले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व यशस्वी उमेदवारांचे अभिनंदन केले आहे.

एकूण यशस्वी उमेदवारांत ३०४ सर्वसाधारण प्रवर्गातील असून, ७८ आर्थिकदृष्ट्या दुर्बल, २५१ इतर मागासवर्गीय, १२९ अनुसूचित जाती आणि ६७ अनुसूचित जमाती प्रवर्गातील आहेत. अन्य १८२ उमेदवारांना राखीव यादीत ठेवण्यात आले असून, ११ उमेदवारांचा निकाल रोखण्यात आला आहे.आयएएस परीक्षेत देशभरातून द्वितीय क्रमांक मिळाल्याचा खूप आनंद आहे. हा माझा दुसरा प्रयत्न होता. शिक्षण आणि पर्यावरण क्षेत्रावर माझा भर राहीन, असे जतीन किशोर यांनी सांगितले. आयएएस अधिकारी होण्याची माझी बालपणापासूनच इच्छा होती. कोणत्याही संकटात आयएएस अधिकारी सर्वात आघाडीवर असतात. त्यामुळे आयआरएससाठी निवड झाल्यानंतर मी आयएएस होण्यासाठी परीक्षेची तयारी करण्याचा निर्णय घेतला, असे प्रतिभा वर्मा म्हणाल्या.सुखद आश्चर्य -प्रदीप सिंहच्हे स्वप्नच साकार झाल्यासारखेच आहे. माझ्यासाठी हे सुखद आश्चर्य आहे. आयएएस अधिकारी होण्याची इच्छा होती. समाजातील उपेक्षित घटकांसाठी मी काम करीन, अशी भावना प्रदीप सिंह यांनी व्यक्त केली. शिक्षण आणि कृषी क्षेत्रात सुधारणा करण्यावर भर असेल. आयएएससाठी मी माझ्या राज्याची (हरयाणा) निवड केली आहे. शिक्षणासाठी २० वर्षांपूर्वी तेवडी गाव सोडून सोनिपतला राहायला आलो, त्याचे आज सार्थक झाले.च्प्रदीप सिंह यांचे वडील सुखबीर सिंह हे शेतकरी आहेत. मोठा अधिकारी होण्याचे मुलाचे स्वप्न होते; परंतु परीक्षेत त्याने पहिला क्रमांक पटकावला, ही गौरवाची बाब आहे, अशी भावना सुखबीर सिंह यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.

टॅग्स :upscकेंद्रीय लोकसेवा आयोगexamपरीक्षाFarmerशेतकरी