शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

जीव धोक्यात घालून यमुना नदी पार केली, पोलिसांनी काठ्या मारुन परत पाठवलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2020 15:43 IST

मुंबई, पुणे, दिल्ली येथून मोठ्या संख्येने मजूर उत्तर प्रदेश आणि बिहार येथे जात आहेत. लॉकडाऊनमुळे ट्रान्सपोर्ट सेवा बंद असल्याने हे मजूर गावी जाण्यासाठी पायपीठ करत आहेत. यातून अपघाताच्या घटना घडताना दिसत आहेत.

लखनौ - रस्त्यावर मजूर पाहून कोरोनावर मात करण्यासाठी लागू करण्यात आलेली यंत्रणा फेल झाल्यासारखे वाटते, असे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे. कोरोना आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर अरविंद केजरीवाल यांनी रविवारी पत्रकार परिषद घेऊन आपलं मत व्यक्त केलं. तसेच, देशातील अनेक राज्यांमधून मजूरांचे होणारे स्थलांतर पाहता, सरकारी यंत्रणा फोल ठरल्याचे दिसून येत आहेत. हजारो किलो मीटरचा प्रवास करुन मजूर, कामगार आणि स्थलांतरीत नागरिक गावाची वाट धरत आहेत. अनेक अडचणींचा सामना करत हे मजूर गावी पोहोचण्यासाठी धडपडत आहेत. मात्र, चेकपोस्टवरील पोलिसांकडून काहींना परतीच्या प्रवासाच्या सूचना देण्यात येत आहेत  

मुंबई, पुणे, दिल्ली येथून मोठ्या संख्येने मजूर उत्तर प्रदेश आणि बिहार येथे जात आहेत. लॉकडाऊनमुळे ट्रान्सपोर्ट सेवा बंद असल्याने हे मजूर गावी जाण्यासाठी पायपीठ करत आहेत. यातून अपघाताच्या घटना घडताना दिसत आहेत. औरंगाबाद येथे झालेल्या रेल्वे दुर्घटनेत १५ मजूरांचा मृत्यू झाला. या घटनेनं देशातील मजूरांच्या स्थलांतराचे भीषण वास्तव जगासमोर आले आहे.  त्यानंतर, सर्वच राज्यातील नेत्यांकडून मजूरांना चालत न जाण्याची विनंती करण्यात येत आहे. मजुरांनी दिल्ली सोडून जाऊ नये, अशी मी त्यांना विनंती करतो. जर तुम्ही अडकले आहात आणि तुमची घरी जाण्याची इच्छा आहे, तर आम्ही ट्रेनची व्यवस्था करीत आहोत. बिहार, मध्य प्रदेशला रेल्वेगाड्या गेल्या आहेत. अजून थोडावेळ वाट पाहा, पण पायी चालत जाऊ नका.", असे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटले. मात्र, मजूरांची पायपीट काही केल्या बंद होताना दिसत नाही. 

परिस्थितीपुढे मजबूर झालेला मजूर काहीही करत आपलं घर गाठत आहे. मात्र, त्याला आर्थिकसोबतच अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. हरियाणातून एक गरीब, स्थलांतरीत मजूर चक्क यमुना नदी पार करुन उत्तर प्रदेशात पोहोचला होता. मात्र, उत्तर प्रदेश पोलिसांनी त्याला अडवून पुन्हा परतीचा प्रवास करायला भाग पाडले. मी जीव धोक्यात घालून यमुना नदी पार केली, एवढं मोठं पाणी नदीला आलेलं आहे. तरीही, मी यमुना पार करुन आलो. पण, पोलिसांनी मला अडवून काठीनं मारलं. त्यानंतर, मला इथं सोडून ते निघून गेले, असे भावनिकतेनं सांगतानाचा एका गरीब मजूराच व्हिडीओ व्हायरल झाला आहे. सामाजिक कार्यकर्ते योगेंद्र यादव यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर केला आहे.  

दरम्यान, पतंप्रधान नरेंद्र मोदींसमवेत आज सर्वच राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक होत असून लॉकडाऊन शिथिलता आणि कोरोनाच्या महामारीच सामना कसा करायचा, याबाबत चर्चा होणार आहे. 

आणखी वाचा

'राज्यात दारुची ऑलनाईन बुकिंग अन् होम डिलिव्हरी करण्याचा सरकारचा विचार'

'राज्यातील स्थलांतरीत अन् विद्यार्थ्यांनाही मोफत प्रवासाचे तात्काळ आदेश द्या'

 

 

टॅग्स :Labourकामगारcorona virusकोरोना वायरस बातम्याUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिस