शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली"; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
2
काँग्रेसला आणखी एक धक्का! पक्षानं फंडिंग न दिल्यानं निवडणूक लढण्यास उमेदवाराचा नकार
3
Video - मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी महुआ मोइत्रांसोबत निवडणूक रॅलीत केला डान्स
4
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
5
EPF Claim: किती दिवसांत मिळतो EPFO कडून क्लेम? ईपीएफनं म्हटलं, कमीतकमी लागतात 'इतके' दिवस
6
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
7
'नाच गं घुमा'मध्ये नम्रताचं काम पाहून प्राजक्ता माळी भारावली, म्हणाली -"हास्यजत्रेत ती गेली साडेपाच वर्ष..."
8
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
9
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
10
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
11
Sara Tendulkar : सारा तेंडुलकर आता कोरियन ब्युटी ब्रँडची ॲम्बेसेडर; कोणत्या प्रोडक्टची करणार जाहिरात?
12
राणीमुळे झाला होता करण-काजोलमध्ये टोकाचा वाद; 'कुछ कुछ होता हैं' च्या सेटवर झालेलं भांडण
13
संविधान बदलणार बाेलले अन् पक्षाने तिकीट कापले; विश्वेवर हेगडे-कागेरी यांना उमेदवारी
14
मोबाइल चोरी नाहीच; पण, मृत्यूचे गूढ कायम; विशाल पवार संशयास्पद मृत्यू प्रकरण
15
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
16
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
17
भाजप अन् काँग्रेससमोर ‘पिंचहिटर’चे आव्हान ; पठाणच्या ‘एन्ट्री’मुळे देशाच्या नजरा
18
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
19
अमेठीत २५ वर्षांत प्रथमच मैदानात नसेल गांधी घराणे; बालेकिल्ल्यातून काॅंग्रेसने उमेदवार बदलला, भाजप नेत्यांचे टीकास्त्र
20
Akshaya Tritiya 2024: चैत्रगौरीला निरोप देताना कुंकवाची पावलं काढा आणि 'पुनरागमनायच' म्हणा; कारण...

कर्तव्यनिष्ठेला सलाम..."मला १५०० जवानांची काळजी घ्यायचीय, कुटुंब तू सांभाळ!"

By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2020 8:02 AM

काश्मीरच्या हंदवाड्यात दहशतवाद्यांशी दोन हात करताना कर्नल आशुतोष शर्मा यांना वीरमरण

श्रीनगर: आमचं कुटुंब आशुतोष यांना कायम त्यांच्या धैर्यासाठी लक्षात ठेवेल, अशी भावना काश्मीरच्या हंदवाडामधील चकमकीत शहीद झालेले कर्नल आशुतोष शर्मांच्या पत्नीनं व्यक्त केली. आशुतोष यांचं त्यांच्या गणवेशावर प्रेम होतं. त्यांनी कायमच त्यांच्या युनिटला प्राधान्य दिलं. त्यांच्या जाण्यानं माझं खूप मोठं नुकसान झालं. ते कधीही भरुन येणार नाही. स्वत:च्या सहकाऱ्यांच्या, देशाच्या नागरिकांच्या संरक्षणसाठी माझ्या पतीनं केलेल्या कार्याचा मला सार्थ अभिमान आहे, असं शर्मा यांच्या पत्नी पल्लवी आशुतोष म्हणाल्या. काल हंदवाड्यात दहशतवाद्यांशी दोन हात करताना शर्मा यांच्यासह एक मेजर आणि दोन जवान शहीद झाले.आशुतोष यांनी कायम त्यांच्या युनिटला प्राधान्य दिलं. त्यांच्या युनिटमधील सहकाऱ्यांची तंदुरुस्ती, त्यांना मिळणारं जेवण याबद्दल ते कायम सजग होते. एक अधिकारी म्हणून त्यांनी कायम त्यांच्या सहकाऱ्यांची काळजी घेतली, अशा शब्दांत पल्लवी यांनी पतीच्या आठवणींना उजाळा दिला. मी दहशतवाद्यांना कंठस्नान घालेन आणि घरी परत येईन, असं ते कायम म्हणायचे. होय, ते परत येत आहेत. पण तिरंग्यात लपेटून येत आहेत, अशा हृदयद्रावक भावना त्यांनी व्यक्त केली.काही महिन्यांपूर्वीच एका वृत्तवाहिनीनं करवाचौथच्या दिवशी आपली मुलाखत घेतल्याचं पल्लवी यांनी सांगितलं. 'त्यावेळी कर्नल आशुतोष शर्मा कर्तव्य बजावत होते. मी त्यांच्यासाठी करवाचौथचा उपवास केला होता. त्यावेळी वृत्तवाहिन्यांचे कॅमेरे घरी आले होते. आज पुन्हा वृत्तवाहिन्यांचे कॅमेरे आमच्या घरी आले आहेत. मात्र तेव्हाच्या आणि आताच्या परिस्थितीत मोठा फरक आहे,' असं पल्लवी म्हणाल्या. मी घराची जबाबदारी समर्थपणे सांभाळेन, असा त्यांना ठाम विश्वास होता. त्यांच्या अनुपस्थितीत मी कुटुंबाची काळजी घेईन, याबद्दल ते कायम निश्चिंत असायचे. मला दीड हजार सहकाऱ्यांची काळजी घ्यायची आहे. तू कुटुंबाची नीट काळजी घेशील याची मला खात्री आहे, असं त्यांनी मला अनेकदा म्हटलं होतं, असं पल्लवी यांनी सांगितलं. २७ फेब्रुवारीला काश्मीरच्या उधमपूरमध्ये सेना पदक वितरण सोहळ्यात पल्लवी आणि आशुतोष यांची अखेरची भेट झाली. मात्र ही भेट केवळ दोन दिवसांची होती.  

टॅग्स :Martyrशहीद